Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

लग्नाशी संबंधित प्रश्नांवरून सोनाक्षी सिन्हा कपिल शर्मावर नाराज? म्हणाली ‘तुला चांगलं माहित आहे’…
सनी देओल आणि बॉबी देओलनंतर कपिल शर्मा लवकरच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे आपल्या शोमध्ये स्वागत करणार आहे. केवळ सोनाक्षीच नाही तर नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हीरामंडी‘ या वेब सीरिजचे अनेक स्टार्स ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’चा भाग होणार आहेत. आणि यावेळी सोनाक्षी सिन्हा आणि कपिल शर्मा यांची मजेदार तू तू मैं मैं आपल्याला पाहायला मिळणार आहेत.(The Great Indian Kapil Sharma Show)

नेटफ्लिक्सचा कॉमेडी कार्यक्रम ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ चा प्रत्येक एपिसोडच्या शेवटी नव्या शोचा प्रोमो रिलीज केला जातो. संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी‘ या वेब सीरिजची टीम पुढच्या आठवड्यात या शोमध्ये येणार आहे. सोनाक्षी सिन्हा, संजीदा शेख, अदिती राव हैदरी, मनीषा कोईराला आणि ऋचा चढ्ढा कपिल शर्माच्या फन शोमध्ये सहभागी होणार आहेत. कपिल आणि त्याच्या टीमने तयार केलेल्या नेटफ्लिक्स एअरपोर्टवर हीरामंडीचे हे स्टार्स खूप गदारोळ करताना दिसणार आहेत. यावेळी प्रेक्षकांना कपिल आणि सोनाक्षी यांच्यातील गमतीशीर संभाषण ही पाहायला मिळणार आहे.

खरं तर सोनाक्षी सिन्हाशी संवाद साधताना कपिल तिला चिडवणार आहे या दरम्यान तो तिला म्हणेल की, आता आलिया भट्टचं लग्न झालंय, कियारानेही लग्न केलं आहे, आता तू लग्न कधी करणार आहेस? मात्र, कपिल आणखी प्रश्न विचारून सोनाक्षीचा पाय खेचण्याआधीच शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी लगेच त्याला अडवून म्हणणार,”हो, तू माझ्या जळलेल्या जखमेवर मीठ टाकलंस आणि मग ती अर्चना पूरण सिंहकडे कपिल शर्मा तक्रार करेल, “कपिलला चांगलंच माहित आहे की मला कीती जोरात लग्न करावसं वाचतयं.”तिचं हे वाक्य ऐकून सगळ्यांनाच खूप हसू येईल. (The Great Indian Kapil Sharma Show)
==============================
हे देखील वाचा: Pushpa 2 The Rule सिनेमाचे पहिले गाणे ‘पुष्पा पुष्पा’ अखेर रिलीज
==============================
या सिरिजचा पहिला भाग जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा सिरीजच्या नव्या दुनियेला याच्या सेटला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील हे पाहून टीम खूप नर्व्हस झाली होती. पण सुदैवाने मालिकेच्या सेटला चांगला प्रतिसाद मिळाला. कॉमेडियन कपिल शर्माचा नवा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ आणि सेट खूप आवडला जात आहे, ज्या सेटच्या तयारीसाठी तीन महिन्यांहून अधिक काळ लागला. या सिरीजच्या पहील्या भागेत रणबीर कपूर, त्याची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर यांना हजेरी लावली होती.