
Ranbir Kapoor-Alia Bhatt : बॉलिवूड कलाकारांचे रिलेशनशिप्स आणि….
बॉलिवूडचे कलाकार त्यांच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक जीवनामुळे जास्त चर्चेत असतात… शिवाय सेलिब्रटींच्या फॅन्सना शाहरुख, आलिया किंवा दीपिकाचा कोणता नवा चित्रपट येणारे यापेक्षा त्यांच्या वैयक्तिक जीवनात नेमंक चाललंय तरी काय हे जाणून घेण्याची curiosity अधिक असते…बरं सोशल मिडियामुळे एक बरं झालंय की सकाळी उठल्यावर कोणत्या सेलिब्रिटीचं ब्रेकअप झालंय किंवा कुणाचं सुत नव्याने कुणाशी जुळलंय हे कळतं… आज मी तुम्हाला बॉलिवूडमधल्याच टॉप सेलिब्रिटींजच्या Past Relationships बद्दलचं गॉसिप सांगणारे… चला तर मग…(Bollywood News)

सगळ्यात आधी वळूयात अशा जोडीकडे ज्यांचं रिलेशन संपून २०-२५ वर्षांचा काळ लोटलाय, पण ज्यावेळी bollywood celebrities च्या अफेअर्सची चर्चा होते तेव्हा या जोडीच्या नाव आलंच पाहिजे.. ते म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय.. early 2000 मध्ये हे दोघं एकमेकांना डेट करत होते… पण नंतर सलमानचा स्वभाव आणि एकूणच त्यांच्यात काहीच ऑल वेल नसल्याचं जाणवलं असंही सांगितलं गेलं होतं की सलमान ऐश्वर्यावर हातही उचलत होता.. अखेर ऐश्वर्याने त्या toxic रिलेशनशिपमधून काढता पाय घेतला… त्यानंतर ती अभिनेता विवेक ऑबरॉयला डेट करत होती… पण काही वर्षांनी ते नातंही तुटलं आणि अखेर तिने बॉलिवूडच्या रईस घराण्याची सून होण्याचा म्हणजेच अभिषेक अमिताभ बच्चन याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि rest is history…

आता अभिषेक बच्चनचं (Abhishek Bachchan) नाव घेतलंय तर त्याचं आणि करिश्मा कपूरचं नातं इतकं पुढे गेलं होतं की जया बच्चन यांनी public programmes किंवा award functions मध्ये माझी होणारी सून करिश्मा (Karishma Kapoor) असं तिचं इंट्रोडक्शनही दिलं होतं.. पण काहीतरी बिनसलं आणि अभिषेक-करिश्माचं नातं संपलं… करिश्मा अजय देवगण यालाही डेट करत होती… तर झालं असं की अजय देवगण आणि करिश्मा ‘जिगर’ चित्रपटात एकत्र काम करत होते.. आणि त्यावेळी दोघांमध्ये जवळीक वाढली आणि ते दोघं प्रेमात पडले..असंही म्हटलं जातं की करिश्मासोबत रिलेशनमध्ये येण्याआधी अजय रवीना टंडन हिला डेट करत होता.. पण करिश्मासोबत राहता यावं म्हणून अजयने रवीनाला डिच्चू दिला.. काही काळानंतर अजय देवगणचा काजोल सोबत हलचल चित्रपट येणार होता आणि त्यावेळी अजय काजोलमध्ये ‘कुछ कुछ होता है’ झालं आणि करिश्मा-अजयची lovestory ubruptly फेड होत गेली…

कपूर सिस्टर्सबद्दल बोलतोय तर करिना कपूर आणि शाहिद कपूरच्या love story ला विसरुन चालेल तरी कसं… २००४ मध्ये साधारण ते एकमेकांना डेट करत होते… त्यावेळी कायम newspapers मध्ये पेज ३ वर करिना-शाहिद या कपलबद्दल काहीनाकाही छापून येतंच होतं.. इतकंच काय hardcore Punjabi आणि मांसाहार करणारी करिना चक्क शाहिदच्या प्रेमात शाकाहारी झाली होती.. अखेर २००७ मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं.. त्यांच्या ब्रेकअपचं खरं कारण अजून कुणालाच नीट माहित नाहीये पण असं म्हणतात की त्यांच्या कुटुंबात दोघांच्या रिलेशनमुळे वाद झाले आणि ते वेगळे झाले..

तर DNA ला शाहिदच्या एका मित्राने इंटरव्ह्यू देताना असं सांगितलं होतं की शाहिदसोबत commitment असूनही करिना शुटसाठी म्हणून तिच्या एका सहकलाकारासोबत परदेशी गेली आणि तिथून परत आल्यावर काही झालंच नाही असं ती वागत होती.. पण हे शाहिदला मान्य नव्हतं आणि त्याला तिने cheat केलं असं कारण सांगून दोघं वेगळे झाले.. बरं पण तो co-star दुसरा तिसरा कुणी नसून सैफ अली खान होता.. त्यावेळी दोघं टशन चित्रपटात एकत्र काम करत होते.. आणि नंतर बऱ्याच मुलाखतीत करिनाने Tashan चित्रपटावेळीच सैफ आणि ती relation मध्ये आल्याचं म्हटलं होतं..

आता असा एक कलाकार ज्याने बॉलिवूडच्या दोन leading अभिनेत्रींना डेट केलं होतं.. तो म्हणजे रणबीर कपूर… रणबीर दीपिका पादूकोणला २००७ मध्ये डेट करत होता.. पण रणबीरने दीपिकाला कॅटरिना कैफमुळे cheat केलं आणि त्यांच्यातील नातं संपलं.. कॉफी विथ करणच्या एका एपिसोडमध्ये रणबीरसोबत झालेल्या breakup मधून बाहेर पडणं फार कठीण असल्याचं दीपिका बोलली होती.. कारण मुंबईत त्यावेळी ती नवी असल्यामुळे रणबीरचं तिचं जग होता.. त्यामुळे स्वत:ची ओळख दीपिका तयार करणार त्याआधीच तिला धोका मिळाला आणि दीपिका-रणबीरच्या फॅन्सनाही त्यांच्या ब्रेकअपमुळे धक्का लागला… त्यानंतर रणबीर कपूर कॅटरिना कैफ सोबत रिलेशनमध्ये आला..

बरं हे दोघे रिलेशनमध्ये येण्याआधी रणबीर दीपिकासोबत तर होताच पण कॅटरिना सलमानसोबत होती असं म्हटलं जातं.. पण २००९ मध्ये ‘अजब प्रेम की गजब कहाणी’ आला आणि कॅटरिनाने त्या प्रेमला सोडून या प्रेमचा म्हणजे रणबीरचा हात पकडला.. हे नातंही फार काळ टिकलं नाहीच… मात्र कॅटरिनाने एका मुलाखतीमध्ये रणबीरसोबत लग्न करण्याची भीती होती असं म्हटलेलं.. शिवाय त्याच्या कुटुंबासोबत तिची फारशी attachment नसल्यामुळेही पुढे नात florished होईल असं तिला वाटलं नव्हतं… पुन्हा एकदा बॉलिवूडच्या high profile couple चं रिलेशन संपलं आणि रणबीरने आलिया भट्टशी आणि कॅटरिनाने विकी कौशलशी लग्नगाठ बांधली…

Huhh.. लिस्ट खुप मोठीच आहे म्हणा पण आता जरा आटपतं घेऊयात… जाता जाता काही महिन्यांपूर्वीच ब्रेकअप झालेल्या अर्जून कपूर आणि मलायका अरोराबद्दल बोललो नाही तर कसं चालेल… अर्जून कपूर मलायकासोबत रिलेशनमध्ये येण्याआधी सलमान खानची बहिण अर्पिता खान हिला डेट करत होता.. मैने प्यार क्यु किया चित्रपटावेळी त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती पण त्यावेळी अर्जून over weight असल्यामुळे अर्पिताने त्याला Dump केलं.

मग काय अर्जूनने थेट सलमान खानची वहिनी मलायका अरोरा हिलाच डेट केलं..events, award funtions, outing सगळीकडे पॅप्स मलायका आणि अर्जूनला एकत्र स्पॉट करायचे.. पण एकेदिवशी अचानक सोशल मिडियावर त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली आणि चाहते अवाक् चं झाले.. ब्रेकअपचं नेमकं कारण जरी दोघांनी announce केलं नसलं तरी त्यांच्यातील नात्याचं भविष्य नेमकं काय असणार यावरुन दोघांमध्ये मतभेद झाल्याचं सांगितलं गेलं..
================================
हे देखील वाचा: बॉलिवूडचं Spy Universe!
=================================
असो…. बॉलिवूडचं पोट सध्या चित्रपटांपेक्षा याच relation किंवा affairsच्या गॉसिप्सवर सुरु आहे असंच दिसतंय… मात्र, रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) किंवा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासारखे फार कमी कलाकार आहेत ज्यांनी ज्या co-star ला डेट केलं आणि त्यांच्याशीच लग्न केलं… तर तुम्हाला हे बॉलिवूडचं गॉसिप कसं वाटलं आणि अजून कोणत्या विषयांवरील व्हिडिओ आम्ही करावेत असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा…