‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Sridevi यांनी नकार दिलेल्या ‘या’ चित्रपटामुळे माधुरीला मिळाला धकधक गर्लचा टॅग!
बॉलिवूडमध्ये एका कलाकाराने दुसऱ्या कलाकारला रिप्लेस करणं हे फार कॉमन झालं आहे… किंवा एखाद्या कलाकाराने रिजेक्ट केलेला चित्रपट दुसऱ्याच कलाकाराचं नशीबच बदलून टाकतो अशी बरीच उदाहरणं इंडस्ट्रीत आहेत… असंच एक उदाहरण म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांनी नाकारलेल्या एका चित्रपटामुळे माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिचं चक्क आयुष्यच बदलून गेलं होतं… तो चित्रपट नेमकी कोणता होता जाणून घेऊयात…(Bollywood News)

१९८४ साली आलेल्या ‘अबोध’ (Abhodh Movie) चित्रपटातून बॉलिवूडला एक उत्तम नायिका आणि डान्सर भेटली… एकीकडे बॉलिवूडमध्ये माधुरी आपलं Empire उभं करत होती तर दुसरीकडे श्रीदेवी यांनी ऑलरेडी आपलं अढळ स्थान निर्माण केलं होतं… ९०च्या दशकात Establish झालेल्या श्रीदेवी निवडक पण बेस्ट भूमिका आणि चित्रपटच करत होत्या… त्या काळात श्रीदेवी यांनी एका चित्रपटाला नकार दिला होता आणि त्यात माधुरीची वर्णी लागली आणि एका रात्रीत ती स्टार बनली होती… तो चित्रपट होता ‘बेटा’ (Beta Movie) …(Entertainment Tadaka)

१९९२ मध्ये आलेल्या ‘बेटा’ चित्रपटात अनिल कपूरसोबत (Anil Kapoor) श्रीदेवी यांनी काम करावं अशी बोनी कपूर यांची इच्छा होती.. पण श्रीदेवींनी हा चित्रपट रिजेक्ट केला आणि त्यानंतर इंदर कुमारने चित्रपटाचे तमिळ हक्क घेत माधुरी दीक्षितला मुख्य अभिनेत्री म्हणून साईन केलं. असं देखील काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलं होतं की,ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान, शर्मिला टागोर आणि माला सिन्हा यांना सासूच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलेलं पण त्यांच्याही नकारानंतर अरुणा इराणी (Aruna Irani) यांनी ही निगेटीव्ह भूमिका साकारली होती. बेटा हा चित्रपट माधुरी दीक्षित आणि अरुणा इरानी या दोघींच्याही सिने कारकिर्दितला लाईफ चेंजींग चित्रपट ठरला होता…फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जो कदाचित श्रीदेवींना मिळाला असता तो माधुरीला मिळाला होता.. इतकंच नाही तर अरुणा इराणी यांनाही सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता…(Latest Entertainment News)
================================
हे देखील वाचा: Ranbir Kapoor-Alia Bhatt : बॉलिवूड कलाकारांचे रिलेशनशिप्स आणि….
=================================

१९९२ मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट त्या वर्षातील Highest Crossing चित्रपट ठरला होता… ६ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.. इतकंच नाही तर या चित्रपटातील धक धक करने लगा हे गाणं सुपरहिट झालं होतं… आणि याच गाण्यामुळे माधुरी दीक्षितला धकधक गर्ल हा टॅग दिला गेला होता… ‘बेटा’ चित्रपटाच्या यशानंतर पुढे माधुरीने ‘खलनायक’, ‘राजा’, ‘हम आपके है कौन?’, ‘दिल तो पागल है’, ‘लज्जा’, ‘देवदास’ असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आणि तिच्या या चित्रपटांचा सिलसिला अजूनही सुरुच आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi