Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Jai Jai Swami Samarth मालिकेत निर्णायक वळण; भावनिक अध्यायाची होणार सुरुवात!

 Jai Jai Swami Samarth मालिकेत निर्णायक वळण; भावनिक अध्यायाची होणार सुरुवात!
Jai Jai Swami Samarth Serial
टीव्ही वाले मिक्स मसाला

Jai Jai Swami Samarth मालिकेत निर्णायक वळण; भावनिक अध्यायाची होणार सुरुवात!

by Team KalakrutiMedia 24/01/2026

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ ( Jai Jai Swami Samarth Serial) सध्या कथानकाच्या अतिशय निर्णायक आणि भावनिक वळणावर येऊन पोहोचली आहे. स्वामी समर्थांच्या जीवनातील अत्यंत गूढ आणि आध्यात्मिक टप्प्याला या मालिकेत सुरुवात होत असल्याचं चित्रण प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. एका रात्री अचानक स्वामी समर्थ स्थानावरून अदृश्य होतात. त्यांची चिंता करत शोध घेणाऱ्या सेवेकऱ्यांना ते स्मशानभूमीत आढळतात. सुंदरा जेव्हा व्याकुळ होऊन कारण विचारते, तेव्हा स्वामींची उत्तरं अधिकच गूढ ठरतात. “आता वेळ आली आहे, पुढे जाण्याची” असे सूचक शब्द ऐकून सेवेकऱ्यांच्या मनात भीती आणि अस्वस्थता दाटून येते. हे शब्द स्वामींच्या महानिर्वाणाकडे इशारा करत आहेत का, हा प्रश्न सर्वांनाच पडतो.(Jai Jai Swami Samarth Serial)

Jai Jai Swami Samarth Serial
Jai Jai Swami Samarth Serial

स्वामींच्या वागण्यात येणारे बदल, त्यांचा नवा निवासस्थानाचा उल्लेख आणि भक्तांपासून थोडं दूर राहण्याचा निर्णय यामुळे कथानक अधिकच गहन होतं. आगामी भागांमध्ये स्वामी जमिनीवर शयन करतात, भक्तांची नोंद तयार करतात आणि अचानक प्रकट झालेल्या शिवलिंगाशी संवाद साधतात. या साऱ्या घटना मालिकेला गूढ आणि थरारक स्वरूप देतात. सुंदरा, कपिला आणि इतर सेवेकऱ्यांमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होतो. त्याचवेळी पुण्यातील शिवभक्त नंदराम गवंडी यांची कथा उलगडते. आजारपण, स्वामींचा अंगारा आणि घडणाऱ्या लीलांमुळे या प्रवासाला आध्यात्मिक उंची प्राप्त होते. स्वामी मल्लिकार्जुन रूपात दर्शन देतात, तर दुसरीकडे गोडधोडाचा त्याग जाहीर करून वैराग्याचा मार्ग अधोरेखित करतात.

Jai Jai Swami Samarth Serial
Jai Jai Swami Samarth Serial

या सर्व घडामोडींमधून स्वामींचा देहापलीकडील प्रवास, मृत्यूचं सत्य आणि भक्तांसाठी दिलेला संदेश प्रकर्षाने समोर येतो. महानिर्वाण म्हणजे अंत नसून, तो केवळ एका अवस्थेतील परिवर्तन आहे, हे स्वामी आपल्या लीलांमधून समजावून सांगतात.मालिकेच्या सुरुवातीपासून आजच्या या अंतिम टप्प्यापर्यंत ‘जय जय स्वामी समर्थ’ने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. स्वामींचे विचार, त्यांच्या शिकवणी आणि भक्तांशी असलेलं नातं यामुळे ही मालिका केवळ मनोरंजन न राहता आत्मिक समाधान देणारी ठरली आहे. (Jai Jai Swami Samarth Serial)

==========================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6 : राकेश आणि अनुश्री यांच्यात पुन्हा वाद; कोणाची होणार बोलती बंद?

==========================

आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात माणूस अनेकदा निराश होतो, रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेतो. अशा वेळी स्वामींचा संदेश स्पष्ट आहे की, कर्म शुद्ध ठेवा, मन निर्मळ ठेवा आणि हेतू प्रामाणिक ठेवा. “मी तुझ्या पाठीशी आहे” हे शब्द केवळ धीर देणारे नाहीत, तर भक्तांना दिलेलं आश्वासन आहे. स्वामी देहाने नसले, तरी त्यांची ऊर्जा, त्यांची कृपा आणि त्यांचा आधार आजही भक्तांना जाणवत राहतो.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment Jai Jai Swami Samarth Jai Jai Swami Samarth Colors Marathi Jai Jai Swami Samarth emotional episode Jai Jai Swami Samarth latest twist Jai Jai Swami Samarth serial update Swami Samarth final chapter Swami Samarth story
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.