
“अच्छा चलता हुं दुवाओं में याद रखना”; Arijit Singhने जाहिर केली पार्श्वगायनातून निवृत्ती
हार्ट ब्रेक झालं असेल तर अरिजीत सिंगची (Arijit Singh) गाणी ऐकणं हे समीकरण ठरलेलं आहे. पण आता भविष्यात त्याची गाणी त्याच्या चाहत्यांना ऐकायला मिळणार नाही आहेत. हो अगदी बरोबर वाचलंत. अरिजीत सिंगने गायनातून निवृत्ती घेण्याची घोषणा सोशल मिडियावर केली आहे. त्याच्या या पोस्टमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. नेमकी त्याने काय पोस्ट केली आहे जाणून घेऊयात… (Arijit Singh Retirement)

अरिजीत सिंगने २७ जानेवारीला त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट करत लिहिलं की, “हॅलो, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. इतकी वर्षे श्रोते म्हणून तुम्ही मला दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद. मी आनंदाने जाहीर करतोय की यापुढे पार्श्वगायक म्हणून मी कोणतेही नवीन काम घेणार नाही. मी निवृत्ती घेतोय. हा प्रवास खूप सुंदर होता”… अरिजीतने पार्श्वगायनातून निवृत्ती घेतल्याती ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि लोकांनी कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली. (Bollywood)

२०१३ मध्ये आलेल्या ‘आशिकी २’ चित्रपटातील ‘तुम ही हो’ या गाण्यामुळे अरिजीत सिंगला प्रसिद्धी मिळाली. पुढे Emotional गाण्यांसाठी त्याची ओळख बॉलिवूडमध्ये निर्माण झाली. हिंदीसह बंगाली आणि मराठी गाणी देखील अरिजीतने गायली आहेत. मुळात तो बंगाली असून राष्ट्रीय पुरस्कारावरही त्याने आपलं नाव कोरलं आहे. (Arijit Singh Songs)
================================
हे देखील वाचा : ‘धुरंधर २’ आणि ‘टॉक्सिक’चा Dhamaal 4च्या रिलीजला धक्का; चित्रपटाची नवी डेट जाहीर
================================
‘ओ माही’, बंदेया रे बंदेया’, ‘चलेया’, ‘सजदे’, ‘सतरंगा’, ‘केसरीया’, ‘अगर तुम साथ हो’, लेहरा दो’ अशा १०० पेक्षा अधिक गाण्यांचं त्याने पार्श्वगायन केलं आहे. आता ३८व्या वर्षी पार्श्वगायनातून जरी त्याने निवृत्ती घेतली असली तरी तो म्युझिक कॉन्सर्ट करत राहिल अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi