Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    vidhu vinod chopra and lal krishna advani

    राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत वाद का घातला होता?

    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Actor Vijay Deverakonda रुग्णालयात दाखल; ‘किंगडम’ सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच अभिनेत्याला  ‘या’ आजाराने ग्रासलं

Siddharth Jadhav चा पहिला गाजलेला ‘तो’ सिनेमा आता दिसणार छोट्या

Instagramवर धुमाकूळ घालणाऱ्या Pretty Little Baby च्या गायिका Connie Francis यांच निधन !

Yash Chopra यांचा वादग्रस्त ठरलेला हा चित्रपट आठवतो का?

Shah Rukh Khan याला ‘किंग’च्या सेटवर दुखापत; थेट अमेरिकेला झाला

Ashok Saraf : “मराठी लोकांची इमेज ही हिंदीत बसत नाही”;

Sachin Pilgoankar आणि ‘क्योंकी सास भी…’ मालिकेचं कनेक्शन आहे तरी

Shole : ‘शोले’ १९५३ सालीही पडद्यावर आला होता…

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’मध्ये दिसणार Subodh Bhave चा लव्ह ट्रायअॅंगल

Salman Khan याने २२ वर्षांपूर्वी आलेल्या ‘तेरे नाम’मधील ‘ही’ गोष्ट

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘या’ गायकाच्या एका ‘धुंद’ गीताचा रसिला किस्सा !

 ‘या’ गायकाच्या एका ‘धुंद’ गीताचा रसिला किस्सा !
बात पुरानी बडी सुहानी

‘या’ गायकाच्या एका ‘धुंद’ गीताचा रसिला किस्सा !

by धनंजय कुलकर्णी 25/10/2023

आज २५ ऑक्टोबर ख्यातनाम गीतकार साहीर लुधियानवी (Saheer Ludhianvi) यांचा स्मृतिदिन त्या निमित्ताने त्यांच्या एका गाण्याचा भन्नाट किस्सा. दिग्दर्शक राम माहेश्वरी साठच्या दशकामध्ये एका चित्रपटाची निर्मिती करत होते. या सिनेमाची कथा ख्यातनाम आणि लोकप्रिय लेखक कथाकार गुलशन नंदा यांच्या ‘माधवी’ या कादंबरीवर आधारित होती. या चित्रपटात मीनाकुमारी, धर्मेंद्र, राजकुमार, पद्मिनी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाचे नाव होते ‘काजल’. यातील गाणी साहीर लुधियानवी यांनी लिहिली होती तर संगीत रवी यांचे होते. साहिर लुधियानवी यांच्या लेखणीतून उतरलेल्या या अप्रतिम भक्ती गीताने आज देखील रसिकांना भारावून टाकले आहे. आशा भोसले यांच्या स्वरातील हे भक्ती गीत होते, ‘तोरा मन दर्पण कह लाये…’ चित्रपटाचे कथानक खूप भावस्पर्शी होते. मुळात ह्या कादंबरीला प्रचंड लोकप्रियता मिळाल्यामुळे यावरील चित्रपटाची देखील रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या सिनेमातील एका गाजलेल्या गाण्याचा किस्सा खूप जबरदस्त आहे.

या चित्रपटात एक गाणं होतं मोहम्मद रफी यांनी गायलेलं. राजकुमार यांच्यावर चित्रित झालेल्या या गीताचे बोल होते ‘छू लेने दो नाजुक होठों को…’  वस्तुतः ज्या वेळेला चित्रपटात ही सिच्युएशन राम माहेश्वरी यांनी सांगितली त्यावेळेला इथे खरंतर गाण्याची जागा नव्हती. राजकुमार मीनाकुमारीला दारू पिण्याचा आग्रह करतो त्यावेळेला एक ‘शेर’ त्यांना हवा होता. त्याप्रमाणे त्यांनी साहीर यांना एक शेर लिहायला सांगितले. प्रसंगाचे औचित्य पाहून साहीर यांनी एक शेर लिहिला ‘छु लेने दो नाजुक होठों को कुछ और नही है जाम है ये कुदरत ने हमको जो बक्शां है ये सबसे हसीं इनाम है ये…’ सर्वांना हा शेर खूपच आवडला. (Saheer Ludhianvi)

त्यावेळी योगायोगाने तिथे संगीतकार रवी देखील उपस्थित होते. त्यांना तर हा शेर  इतका आवडला की, त्यांनी तिथल्या तिथे दिग्दर्शकाला सांगितले हा इतका चांगला शेर असाच वाया घालवायला नको.आपण याच शेर वरून पुढे एक चांगले गाणे बनवूया. लगेच साहीर साहेबांना बोलावून घेण्यात आले आणि या ‘शेर’ ला जोडून गाणे तयार करण्यास सांगितले. साहीर प्रचंड प्रतिभावंत! त्यांनी लगेच त्यावर गाणे लिहून दिले. आता ज्यावेळी रेकॉर्डिंगची वेळ आली त्यावेळेला रफीने अतिशय अलौकिक स्वरात हे गाणे गायले. खरंतर रफी खुदा का नेक बंदा ! आयुष्यभर त्यांनी कधीही दारूला स्पर्श केला नाही पण या गाण्यात त्यांनी जे भाव आपल्या स्वरातून मांडले त्याला तोड नाही. (Saheer Ludhianvi)

==========

हे देखील वाचा : सिंगल स्किन ते मल्टीप्लेक्स पर्यतचा प्रवास

==========

रेकॉर्डिंग झाल्यानंतर सर्वांना हे गाणे प्रचंड आवडले. ज्यावेळी दिग्दर्शक राम माहेश्वरी यांनी हे गाणे डिस्ट्रीब्यूटरला दाखवले त्यावेळेला त्यांना तर प्रचंड आवडलेच पण डिस्ट्रीब्यूटर म्हणाले,”इतके सुंदर गाणे आणि त्याला दोनच कडवी का केली ? अजून एक-दोन कडवी वाढवा ना!” राम माहेश्वरी यांना देखील वाटले की गाणं थोडसं अधुरं वाटतंय आपण आणखी त्यात एक अंतरा वाढवायला पाहिजे. म्हणून त्यांनी पुन्हा साहीर ला  बोलावले पाठवले पण साहीर साहेबांचा कुठे पत्ताच लागेना. गावोगावी माणसे पाठवली तर साहिर लुधियानवी (Saheer Ludhianvi) काही सापडले नाही. शेवटी हे गाणे दोन कडव्यांचेच राहिले. पण त्यातील अधुरेपण कमी करण्यासाठी हे गाणे पुन्हा एकदा रेकॉर्ड केले गेले आणि या रेकॉर्डिंग च्या वेळेला रफीने दुसरा अंतरा झाल्यानंतर या पद्धतीने गाणं संपवले  आहे की दारू पिल्यानंतर ती व्यक्ती त्या नशेमध्येच धुंद होते आणि तिथे शब्द संपतात…. अशा पद्धतीने गाण्याचा शेवट केल्यामुळे त्या गाण्यातील ‘अधुरेपण’ वाटेल नाही. हे गाणे क्लासिक म्हणून आज देखील प्रचंड लोकप्रिय आहेत. आज पन्नास वर्ष उलटली तरी या गाण्याची खुमारी काही कमी झाली नाही.

  • 1
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 1
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 1
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 1
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Celebrity Entertainment Featured
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.