Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

Abhishek Bachchanने ऐश्वर्या राय सोबतच्या घटस्फोटांवर अखेर मौन सोडलंच; म्हणाला तिला माझं सत्य…
बॉलिवूडमध्ये २०२५ या वर्षात बऱ्याच कलाकारांची लग्न झाली आणि काहीचे घटस्फोटही झाले… पण हे वर्ष ज्यांच्या घटस्फोटांच्या बातम्यांनी गाजलं ते म्हणजे अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwerya Rai-Bachchan)… सोशल मिडियावर ऐश्वर्या आणि अभिषेक वेगळे राहात असल्याच्या बातम्यांनाही उधान आलं… मात्र, या सगळ्यावर दोघांनीही काहीच प्रतिक्रिया अद्याप दिली नव्हती… आता अखेर या वाढत्या चर्चांमुळे अभिषेक बच्चन याने घटस्फोटावर मौन सोडलं आहे… नेमकं तो काय म्हणाल आहे जाणून घेऊयात…

अभिषेक बच्चन याने त्याच्या आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाबद्दल काय म्हटलं आहे हे जाणून घेण्याआधी या चर्चा नेमक्या कधी सुरु झाल्या यावर एक नजर टाकूयात… तर राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्याला ऐश्वर्या राय हिने बच्चन कुटुंबासोबत एन्ट्री न घेता मुलगी आराध्यासोबत वेगळी उपस्थिती सोहळ्याला लावल्यामुळे लोकांच्या भूवय्या उंचावल्या आणि अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली… यानंतर काही कौटुंबिक कार्यक्रमांना ऐश्वर्या-अभिषेक एका फ्रेममध्ये दिसले होते पण तरीही त्यांच्यात काही आलबेल नसल्याचं म्हटलं जात होतंच… (Aishwerya & Abhishek Bachchan Divorce News)
आता यावर पीपींगमुनला प्रतिक्रिया देताना अभिषेक म्हणाला आहे की, “लग्नाच्या आधी त्यांना आमचं लग्न कधी होणार हे जाणून घ्यायचं होतं. आता ते घटस्फोटाच्या चर्चा करत आहेत. माझ्या पत्नीला माझं सत्य माहीत आहे. मला तिच्याबद्दल माहीत आहे. आम्ही एक आनंदी आणि परिपूर्ण कुटुंब आहोत आणि आमच्यासाठी हेच महत्त्वाचं आहे”. (Entertainment News)

पुढे अभिषेक म्हणाला की, “मी खूप नम्रतेने आणि सन्मानाने हे सांगू इच्छितो की मीडिया चुकीच्या गोष्टी पसरवत आहे. मीडिया देशाचा आत्मा आहे. आजच्या जगात तुम्हाला सगळ्यात आधी न्यूज द्यायची असते. मी तुमच्यावर असलेला दबाव समजू शकतो. पण, तुम्ही हे सगळं कशासाठी करत आहात? तुम्ही कुणाच्यातरी वैयक्तिक जीवनाबद्दल बोलत आहात ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कुणाचा तरी नवरा, वडील असल्याच्या नात्याने मला काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. जर तुम्ही माझ्या कुटुंबाबाबत चुकीचं बोललात तर तुम्हाला याचा सामना करावा लागेल. कारण, माझ्या कुटुंबाबाबत काहीही चुकीचं मी सहन करणार नाही”… मला तिचं सत्य माहित आहे आणि तिचं मला त्यामुळे आमच्यात काहीही बिनसलं नाहीये असा खुलासाही त्याने यावेळी केला…
================================
हे देखील वाचा : Aishwerya Rai ते आलिया भट्ट; अर्ध्यातच कलाकारांनी सोडले ‘हे’ सुपरहिट चित्रपट!
================================
आता, अभिषेक बच्चन याने त्याच्या वैवाहिक जीवनात कसलीच अडचण नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांना इथेच पुर्णविराम लागेल अशी अपेक्षा आहे… त्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच अभिषेक रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे… त्याच्यासोबत या चित्रपटात रितेश देशमुख, भाग्यश्री, संजय दत्त, सलमान खान, महेश मांजरेकर, जिनिलिया देशमुख असे बरेच कलाकार झळकणार आहेत…. (Abhishek Bachchan movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi