‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Abhishek Bachchan : ह्रतिक रोशनमुळे आदित्य चोप्राशी ‘धुम २’ वेळी का भांडलेला अभिषेक?
२००४ ते २०१३ हा काळ अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याच्या अभिनय कारकिर्दिचा बऱ्यापैकी चांगला काळ होता असं म्हणावं लागेल… कारण २००४ मध्ये ‘धुम’ (Dhoom movie) चित्रपट आला आणि अभिषेकच्या बुडत्या करिअरला एक आधार मिळाला… त्या आधी ‘मै प्रेम की दिवानी ‘हु, ‘ओम जय जगदीश’, ‘तेरा जादू चल गया’ हे चित्रपट त्याने केले खरे पण त्याला प्रेक्षकांची दाद आणि प्रतिसाद काही मिळाली नाही… मात्र, ‘धुम’ चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसलेला अभिषेक बच्चन सगळ्यांनाच आवडला… धुम चित्रपटाचे आत्तापर्यंत ३ भाग आले; यात ‘धुम २’ (Dhoom 2) मध्ये अभिषेक आणि ह्रतिक रोशनची (Hrithik Roshan) चोर-पोलिसाची जोडी चांगलीच गाजली… पण तुम्हाला माहित आहे का या चित्रपटावेळी चक्क अभिषेक आणि निर्माता आदित्य चोप्रा (Aaditya Chopra) यांच्यात ह्रतिकमुळे वाद झाला होता… काय होता किस्सा जाणून घेऊयात…(Bollywood News)

कलाकार आणि दिग्दर्शक किंवा निर्माते यांच्यात काही कारणांमुळे वाद किंवा मतभेद होत असतात… बऱ्याचदा मेकर्स मुलाखतींमध्ये उघडपणे त्यावर भाष्य देखील करतात.. असाच एक किस्सा स्वत: अभिषेक बच्चन याने ई टाईम्सशी संवाद साधताना सांगितला… ‘धुम २’ च्या सेटवर आदित्य चोप्रासोबत झालेल्या भांडणाचा किस्सा सांगताना अभिषेक म्हणाला की,चित्रपटात एक सीन आहे, जिथे मी ह्रतिकच्या मागावर असतो, ह्रतिकला पकडण्यासाठी त्याला हवं ते मी करु देत असतो. हा सीन झाल्यानंतर चित्रपटात एक गाणं येतं ज्यात सगळे कलाकार सहभागी होऊन नाचतात ते म्हणजे दिल लगाना दिल जले के दिल जल जायेगा… आणि या गाण्यात मी सुद्धा असावं अशी आदित्य चोप्राची अपेक्षा होती…(Entertainment Latest News)

पुढे अभिषेक म्हणाला की, मात्र, माझं या सीनच्या बाबतीत असं म्हणणं होतं की मी एका गंभीर पोलिस अधिकाऱ्याची भूमिका बजावतोय, ज्याने चोराला पकडण्याचं प्लॅनिंग केलं आहे, मग तो अचानक सगळ्यांसोबत कसा नाचू शकतो? मी त्यांच्यासोबत जिथे चोरही आहे त्या गाण्यात नाचणं या निर्मात्याच्या मागणीला माझा विरोध होता… मी आदित्यला म्हटलं की मी गाणं सुरु असताना तिथेच बारमध्ये बसेन आणि आर्यन अर्थात ह्रतिकवर नजर ठेवेन.. पण आदित्य काही एक ऐकायला तयार नव्हता आणि यामुळेच आमच्यात भांडण झालं होतं… वाद मिटला आणि ‘धुम २’ चित्रपट ‘धुम १’ इतकाच गाजला आणि प्रेक्षकांना आवडला…(Bollywood Masala)
================================
हे देखील वाचा: Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….
=================================
‘धुम २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली होती… या चित्रपटाने बॉक्स ऑफसवर ८१.०१ कोटी कमावले होते… या चित्रपटाचं शुटींग बऱ्यापैकी ब्राझिलमध्ये झालं होतं आणि विशेष म्हणजे या चित्रपटासाठी ऐश्वर्याला फार कमी काळात वजन कमी करावं लागलं होतं… तसेच, ‘धुम २’ मध्ये काम केल्यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या यांचं लग्न झालं होतं… संजय गढवी दिग्दर्शित ‘धुम २’ चित्रपटात अभिषेकने एसीपी जय दीक्षित, ह्रतिकने आर्यन हे पात्र सााकरलं होतं. या दोघांसह चित्रपटात ऐश्वर्या राय, उदय चोप्रा आणि बिपाशा बासू हे कलाकारही झळकले होते.(Dhoom 2 movie cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi