
Ratna Pathak : लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर रत्ना पाठक यांनी केले नसीरुद्दीन शाह यांच्याशी लग्न
‘मोनिशा बेटा इट्स टू मिडिल क्लास’ हा संवाद ऐकला की लगेच डोळ्यासमोर येते ती हाय क्लास, रिच, सुफीस्टीकेटेड, इंग्लिश बोलणारी साराभाई व्हर्सेस साराभाई मालिकेतील माया साराभाई. सतत आपल्या हाय क्लासचा, श्रीमंतीचा तोरा मिरवणारी माया साराभाई आजही सर्वच प्रेक्षकांना आठवत असेल. आठवत असेल काय …? आठवणारच कारण माया साराभाईला विसरणे कोणालाच शक्य नाही. आपल्या प्रभावी अभिनयाने ही भूमिका आणि हे पात्र अजरामर करणारी अभिनेत्री म्हणजे रत्ना पाठक शहा.(Ratna Pathak)
बॉलिवूड, रंगभूमी आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अतिशय प्रभावी आणि दिग्गज अभिनेत्री म्हणजे रत्ना पाठक शहा. रत्ना यांनी आपल्या जिवंत अभिनयाने सर्वच माध्यमांमध्ये स्वतःची मोठी छाप पडली. मोजक्या मात्र अतिशय उत्तम भूमिका करणाऱ्या रत्ना पाठक शाह या त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असतात. यासोबतच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील अनेकदा त्यांना लाइमलाइट मिळवून देते. (Ratna Pathak Birthday)

रत्ना पाठक शाह यांनी दिग्गज अभिनेते नासिरुद्दीन शाह यांच्याशी लग्न केले. त्यांची प्रेमकहाणी आणि त्यांचे लग्न खूपच गाजले. अगदी चित्रपटातील कथेला साजेशी अशीच त्यांची प्रेमकहाणी होती. आज रत्ना पाठक शाह त्यांचा ६८ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल.(Bollywood Entertainment News)
रत्ना आणि नसीरुद्दीन यांची पहिली भेट १९७५ मध्ये झाली होती. नसीरुद्दीन शाह पुण्यातील एफटीआयआय मध्ये शिकत होते. तेव्हा त्यांची भेट रत्ना पाठक यांच्याशी झाली. रत्ना या नसीरुद्दीन यांच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान होत्या. त्या देखील तिथे एक कॉलेजमध्ये शिकत होत्या. योगायोगाने हे दोघं सत्यदेव दुबे यांच्या ‘संभोग से संन्यास तक’ या नाटकात एकत्र काम करत होते. या नाटकामुळे हळूहळू त्यांची चांगली मैत्री झाली.(ratna pathak and naseeruddin shah Lovestory)
त्यावेळी नसीरुद्दीन हे त्यांच्या पहिल्या पत्नीपासून विभक्त झाले होते. नसीर यांचं पहिलं लग्न त्यांच्यापेक्षा १६ वर्षांनी मोठ्या एका पाकिस्तानी महिलेशी झालं होतं. या दोघांचा प्रेम विवाह होता. मात्र त्यांचं लग्न जास्त दिवस टिकलं नाही आणि दोघं वेगळे झाले. मात्र त्यांनी अधिकृतपणं घटस्फोट घेतला नाही. या दोघांना हिबा शाह नावाची एक मुलगी आहे. जेव्हा नासिर हे त्यांच्या विभक्त होण्यामुळे दुखत होते, तेव्हाच त्यांच्या आयुष्यात रत्ना आल्या.(Bollywood Tadka)

================================
================================
नसीर यांना त्यांच्या कठीण काळात रत्ना यांचा मोठा मिळाला. रत्ना यांच्यामध्ये असलेले सर्वच गुण नसीर यांना कमालीचे भावले. हळूहळू ते रत्ना यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी त्यांच्या भावना रत्ना यांच्यासमोर व्यक्त केल्या. मात्र पहिल्या बायकोपासून अधिकृत घटस्फोट न घेतल्याने नसीर आणि रत्ना हे काही दिवस लिव्ह इन रिलेशनमध्ये होते. पुढे त्यांनी १ एप्रिल १९८२ रोजी लग्न केलं. मुख्य म्हणजे त्यांनी जे लग्न केले, ते खऱ्या अर्थी खूपच वेगळे आणि खास ठरले. कारण त्यांच्या लग्नात निकाह वाचण्यात आला नाही की, सप्तपदी चालण्यात आली नाही. या दोघांनी रत्ना यांच्या आई दिना पाठक यांच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केले. दरम्यान रत्ना आणि नसीर यांना इमाद शाह आणि विवान शाह ही दोन मुलं आहेत.(Bollywood Masala News)