Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

 All Is Well Marathi Movie: तीन मित्रांची धमाल गोष्ट ‘ऑल

Gaadi Number 1760: प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे प्रथमेश-प्रियदर्शिनीचे ‘झननन झाला’ गाणं

Dostana : ‘मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया…’हे गाणे

Aamir Khan याच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचं कलेक्शन झालंय तरी

‘रंगभूमीवर फुललेली प्रेमकहाणी, कशी झालेली Reema Lagoo आणि Vivek Lagoo

Shubhvivah मालिकेत चिन्मय उद्गीरकरची एंट्री; आकाशच्या जीवासाठी भूमी करणार संघर्ष

Ye Re Ye Re Paisa 3: सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या

Kajol : “‘तिथे शूटिंग करताना मला नेहमीच अस्वस्थ वाटत होतं”

Sachin Pilgoankar- रंजिताचा ‘आंखियों के झरोखो से’आठवतो का?

Housefull 5 : मल्टिस्टार कास्ट असूनही अक्षय कुमारच्या चित्रपटाचं कलेक्शन

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Akhtar Mirza : ‘नया दौर’च्या कथेची निवड कशी झाली?

 Akhtar Mirza : ‘नया दौर’च्या कथेची निवड कशी झाली?
बात पुरानी बडी सुहानी

Akhtar Mirza : ‘नया दौर’च्या कथेची निवड कशी झाली?

by धनंजय कुलकर्णी 23/01/2025

पन्नास आणि साठच्या दशकामध्ये अख्तर मिर्झा (Akhtar Mirza) यांचे मोठे नाव होते. ते चांगले कथालेखक पटकथाकार होते. एकदा त्यांनी लिहिलेल्या बावरे नैन, नया दौर, वक्त, जोशीला या चित्रपटांनी मोठे व्यवसायिक यश मिळवले होते. पन्नासच्या दशकाच्या मध्यावर एकदा ते B. R. Chopra यांना एक कथा ऐकण्यासाठी गेले. बी आर चोप्रा यांना ती कथा खूप आवडली आणि लगेच त्यांनी सायनिंग अमाऊंटचा चेक देखील देऊन टाकले.

चेक घेतल्यानंतर अख्तर मिर्झा (Akhtar Mirza) म्हणाले मी आणखी एक कथा तुम्हाला सांगू का? बी आर चोप्रा म्हणाले सांगा. आता अख्तर मिर्झा यांनी दुसरी कथा त्यांना सांगायला सुरुवात केली. या नंतर मात्र बी आर चोप्रा म्हणाले, ”माफ करा. अख्तर साहेब. मी आता तुमच्या कथेवर सिनेमा आता बनवू शकत नाही!” अख्तर मिर्झा यांना खूप वाईट वाटले. पण खरी गंमत पुढेच आहे. काय होता हा नेमका किस्सा?

अख्तर मिर्झा (Akhtar Mirza) पन्नासच्या दशकांमधले एक गाजलेले स्टोरी रायटर होते. ‘बावरे नैन‘ (१९५१) पासून ते विशेष चर्चेत होते. पण मोठे निर्माते त्यांना मिळत नव्हते. ते एकदा आपली कथा ऐकवण्यासाठी बी आर चोप्रा यांच्याकडे गेले. पहिली कथा त्यांनी सांगितली. ती चोप्रा साहेबांना खूप आवडली लगेच त्यांनी सायनिंग अमाऊंट चेक देखील दिला. मिर्झा खूश झाले. बी आरसारखे मोठे निर्माते आपली कथा सिनेमासाठी ऐकतात काय आणि लगेच चेक देतात काय सारंच कल्पनातीत होतं.

चेक घेतल्यानंतर मिर्झा (Akhtar Mirza) साहेब म्हणाले मी आणखी एक कथा तुम्हाला ऐकवतो नंतर त्यांनी चोप्रा यांना दुसरी एक कथा ऐकवली जी अनेक निर्मात्यांनी डावलली  होती. ही कथा ऐकल्यानंतर मात्र बी आर चोप्रा म्हणाले, ”माफ करा. मिर्झा साहेब आता मी तुमच्या कथेवर चित्रपट बनवू शकत नाही!” अख्तर मिर्झा यांना हा मोठा धक्का होता. अगोदर त्यांना खूप वाईट वाटले. हाती आलेली संधी चालली गेली असे वाटले. ते स्वतःला देखील दोष देऊ लागले.

आपल्याला कशाला अशी दुर्बुद्धी झाली? आपण कशाला दुसरी कथा त्यांना ऐकवली? आपली दुसऱ्या कथानकवर तर कुणीच सिनेमा बनतच नाही आणि पहिली कथा जी बी आर यांना आवडली होती ते देखील आता देखील सिनेमा बनवत नाही! मूर्खपणा नडला. अख्तर (Akhtar Mirza) मनातल्या मनात स्वत:ला कोसू लागले. तरी त्यांनी बी आर चोप्रा यांना विचारले, ”चोप्रा साहेब, तुम्ही काही वेळापूर्वी माझी कथा खूप चांगली आहे म्हणून माझ्याकडून विकत घेतली आणि आता तुम्ही म्हणता चित्रपट बनवता येत नाही?”

त्यावर बी आर चोप्रा हसले आणि म्हणाले, ”मिर्झा साहेब बरोबर आहे. मी तुमच्या पहिल्या कथेवर आता चित्रपट बनवणार नाही. कारण आता मी आता तुमच्या दुसऱ्या कथेवर चित्रपट बनवणार आहे. कारण ही कथा मला जास्त चांगली वाटली.” आता अख्तर मिर्झा (Akhtar Mirza) यांना हायसे वाटले अनेक निर्मात्यांनी जी कथा नाकारली होती त्या कथेवर बी आर चोप्रा यांनी एक उत्तम सिनेमा बनवला. ज्या सिनेमाने पन्नासचे दशक गाजवले तो चित्रपट होता ‘नया दौर’.

सिनेमा सुपर डुपर हिट झाला. त्या वर्षीचा बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दुसऱ्या क्रमांकाचा सिनेमा ठरला पहिला अर्थातच मदर इंडिया. या सिनेमासाठी अख्तर मिर्झा (Akhtar Mirza) यांना सर्वोत्कृष्ट कथेचे फिल्मफेअर अवार्ड मिळाले. बी आर चोप्रा यांचे अख्तर मिर्झा लाडके बनले. पुढे वक्त आणि धुंद या गाजलेल्या सिनेमाचा कथा आणि पटकथा अख्तर मिर्झा यांनी लिहिल्या होत्या.

============

हे देखील वाचा : Balraj Sahni : बलराज सहानी यांनी वाचवले मीना कुमारीचे प्राण!

============

आता थोडंसं नया दौर या चित्रपटाबद्दल. हा सिनेमा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण असा सिनेमा होता. श्रमशक्ती विरुद्ध यंत्र शक्ती असा तो लढा होता. महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणार हा चित्रपट होता. असं असलं तरी हा सिनेमा प्रचारकी थाटाचा नव्हता तर निखळ मनोरंजन करणारा चित्रपट होता. मनोरंजनाच्या माध्यमातून चांगला सामाजिक संदेश यातून दिला होता.  या चित्रपटाच्या दरम्यान प्रचंड घडामोडी झाल्या होत्या आधी मधुबाला या सिनेमात काम करणार होती नंतर तिच्याजवळ वैजयंतीमाला आली. Dilip Kumar यांनी अभिनय केलेला आणि संगीतकार ओपी नय्यर यांचा हा एकमेव चित्रपट आहे. २००७  साली हा चित्रपट कलर होऊन पुन्हा एकदा प्रदर्शित झाला होता.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress akhtar mirza b r chopra Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured naya daur
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.