Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण

Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Karishma Kapoor : बॉलिवूडमधला महागडा घटस्फोट ते अभिनेत्रीचा सौदा; मॅरेज

Ahemdabad Airplane Crash :विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘कटीपतंग’ च्या या गाण्याच्या शूटचा भन्नाट किस्सा !

 ‘कटीपतंग’ च्या या गाण्याच्या शूटचा भन्नाट किस्सा !
बात पुरानी बडी सुहानी

‘कटीपतंग’ च्या या गाण्याच्या शूटचा भन्नाट किस्सा !

by धनंजय कुलकर्णी 16/02/2024

‘आराधना’ या चित्रपटाच्या बंपर यशानंतर शक्ती सामंत यांनी आपल्या पुढच्या चित्रपटाची निर्मिती सुरू केली. हा चित्रपट पुन्हा त्यांनी राजेश खन्ना –शर्मिला टागोर  यांनाच घेऊन काढायचे ठरवले. चित्रपटाचे नाव होते ‘कटी पतंग’ (Kati Patang). परंतु त्या वेळेला शर्मिला टागोर प्रेग्नेंट असल्यामुळे तिने या चित्रपटात काम करायला असमर्थाचा दर्शवली आणि तिथे आशा पारेख यांची वर्णी लागली. त्या काळात राजेश खन्ना प्रचंड मोठा सुपरस्टार बनला होता. सलग १७ गोल्डन जुबली सिनेमे देण्याचे रेकॉर्ड या काळात त्याच्या हातून घडले होते.

या १७  चित्रपटांपैकीच एक होता ‘कटी पतंग’(Kati Patang). या चित्रपटाचे  कथानक गुलशन नंदा यांच्या एका कादंबरीवर होते. अर्थात गुलशन नंदा यांनी देखील एका आंग्ल साहित्यावरून हे कथानक घेतले होते.(कोर्न वुलरिच यांच्या ‘I married a dead man’) या चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिलेली होती. तर संगीत राहुल देव बर्मन यांचे  होते. या सिनेमातील हरेक गाणं प्रचंड गाजलं. किशोर कुमार यांनी गायलेलं ये शाम मस्तानी ,ये जो मोहब्बत है, प्यार दिवाना होता है ही गाणी प्रचंड गाजली. या चित्रपटातील आशा पारेख यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी त्यांना त्यावर्षीचे फिल्मफेअर  अवॉर्ड मिळाले.  या चित्रपटात लता मंगेशकर यांनी गायलेले ‘ना कोई उमंग आहे ना कोई तरंग है…’ हे देखील खूप गाजले होते. तसेच या चित्रपटातील होळी गीत आज देखील मशहूर  आहे. 

या सिनेमात आणखी एक गीत होते जे मुकेश यांनी गायलेले होते. मुकेश यांनी गायलेले या चित्रपटातील हे एकमेव गाणे होते. गाण्याचे बोल होते ‘जिस गली मे तेरा घर ना हो बालमा’ या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग नैनीताल येथे झाले. या गाण्याची चित्रीकरण देखील नैनीताल येथील सुप्रसिद्ध झीलवर होणार होते. शूटिंगची डेट ठरली. या गाण्याची चित्रीकरण राजेश खन्ना आणि आशा पारेख  एका नावेत बसून जात असतात अशा सिच्युएशनला करायचे होते. नैनिताल हे पूर्वीपासूनच पर्यटकांसाठी अतिशय आवडतं डेस्टिनेशन. (Kati Patang)

जेव्हा त्यांना कळालं की इथल्या तलावात आज राजेश खन्ना शूटिंग करणार आहे तेव्हा सर्व पर्यटक बोटीमध्ये बसून राजेश खन्नाच्या जवळ येऊन डिस्टर्ब करू लागले! शक्ती सामंत यांना शॉट अजिबात घेता येत नव्हता. कारण प्रत्येक वेळेला फ्रेम मध्ये पर्यटकांच्या बोटी येत होत्या. हल्ला गुल्ला गोंधळ प्रचंड होत होता. त्यामुळे सारखा सारखा व्यत्यय येत होता. शक्ती सामंत यांनी पोलिसांची मदत घेतली पण त्यांचा ही नाईलाज होता.  ही पब्लिक प्लेस असल्यामुळे थोडा वेळ ते बाजूला गेले. पण पुन्हा तेच. सारखा  व्यत्यय  येत होता. शक्ती सामंत हे चित्रपटाचे जसे दिग्दर्शक होते तसे निर्माते देखील होते. फार काळ शूटिंग रेंगाळणे त्यांना परवडणारे नव्हते. त्यांनी त्या दिवशी पॅकअप करून ते हॉटेलला निघून गेले आणि या गाण्याची चित्रीकरण कसे करायचे या विवंचनेत पडले. आता काय करायचं ?(Kati Patang)

============

हे देखील वाचा : राज कपूरने सोडवला दिलीप कुमारचा कौटुंबिक प्रश्न

============

त्यांनी एक सोल्युशन काढले. एक भन्नाट जुगाड त्यांनी केला त्यांनी. नैनीताल मधील तलावाच्या आजूबाजूला असलेल्या सर्व बोटी दुसऱ्या दिवशी भाड्याने घेतल्या आणि एका बाजूला लॉकअप मध्ये टाकून दिल्या. आता संपूर्ण तलावात एकच बोट होती ज्यात राजेश खन्ना आणि आशा पारेख होते. दुसऱ्या दिवशी पर्यटक तिथे आले पण त्यांना इच्छा असून देखील बोटिंग करता आले नाही कारण कुठलीही बोट त्या दिवशी उपलब्ध नव्हती. अशा प्रकारे राजेश खन्ना आणि आशा पारेख यांना घेऊन त्यांनी चित्रीकरण उरकून टाकले. शक्ती सामंत यांनी केलेला हा जुगाड चालून गेला आणि आपण हे सुंदर गाणे पाहू शकलो !

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.