Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

‘कजरा रे’ गाण्याबद्दल Amitabh Bachchan यांना होती शंका, शुट करायला दिलेला नकार
बॉलिवूडमधील आयटम सॉंग्स विशेष लोकप्रिय आहेत. ‘कजरा रे’ (Kajara Re) हे गाणं आजही लागलं की आपोआप पाय थरकायला लागतात. २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बंटी और बबली’ (Bunty Aur Babli) चित्रपटातील हे गाणं आजही सगळ्यांच्या ओठांवर आहे. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची या गाण्यातील केमिस्ट्री भन्नाट होती. पण तुम्हाला माहित आहे का अमिताभ बच्चन यांनी चक्क ‘कजरा रे’ हे गाणं करायला नकार दिला होता. काय आहे या गाण्याच्या निर्मितीची रंजक गोष्ट वाचा….(Kajara Re song making story)

२०००५-०६ मधलं ‘कजरा रे’ हे गाणं टॉप आयकॉनिक आयटम नंबरपैकी एक (Item songs of Bollywood). या गाण्यामागचा किस्सा दिग्दर्शक शाद अली खान यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे. ते म्हणाले की, ‘जेव्हा मी या गाण्याची ८ सेकंदं ऐकली… तेव्हाच मला असं वाटलं की हे गाणं सुपरहिट होणार… पण यश राजला वाटलं की ते इतकं लोकप्रिय होणार नाही होईल. इतकंच नाही तर अमिताभ बच्चन यांनाही या गाण्याबद्दल शंका होती. आणि त्यांनी कर हे गाणं शुट करुच नका असं सांगितलं होतं. पण मी माझ्या विचारांवर ठाम राहिलो.'(Bollywood masala)
================================
हे देखील वाचा: Aishwerya Rai : ऐश्वर्याने नकार दिलेल्या चित्रपटामुळे करिष्मा कपूर झाली सुपरस्टार!
=================================
पुढे खान म्हणाले की, ‘मला खात्री होती की हे गाणं हिट होईल आणि मी अमितजींना ते काळजीपूर्वक ऐकण्यास सांगितलं. ज्यावेळी मी त्यांना गाणं ऐकण्यासाठी बोलावलं तेव्हा ते म्हणाले ‘हे चालणार नाही”. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना असं वाटलं की गाण्याला अधिक चांगल्या इनपुटची गरज आहे. गाण्याबद्दल त्यांनी काही महत्वाच्या सूचना दिल्या. त्यांनी गाण्यातील जुगलबंदीवरही काही बदल सुचवले. त्याप्रमाणे बदल करुन अमिताभ बच्चन यांनीच गणं गावं अशी खान यांची इच्छा होती पण बिंग बी यांनी नकार देत शंकर महादेवन यांना ते गाण्यास सांगितलं. अखेर गाणं शुट झालं आणि सुपरहिट ठरलं. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी’कजरा रे’च्या यशानंतर शाद यांना मेसेज केला आणि म्हणाले की, “माफ करा, मी या गाण्याबद्दल चुकीचा विचार केला”. अशा प्रकारे नकारातून कजरा रे गाणं ऑलटाईम सुपरहिट ठरलं.(Entertainment news)

ऐश्वर्या राय हिने तिच्या फिल्मी करिअरमध्ये फार कमी आयटम सॉंग्स केले. त्यापैकी कजरा रे हे गाणं विशेष गाजलं. बरं केवळ अमिताभ बच्चन यांनाच नाही तर ऐश्वर्या राय (Aishwerya Rai-Bachchan) हिला देखील ती कजरा रे गाणं करु शकेल का अशी शंका होता आणि अभिषेक बच्चन तर शुटपूर्वी फारच अस्वस्थ होता. मात्र. तिघांच्याही अथक परिश्रमानंतर करजा रे हे गाणं बॉलिवूडमधलं बेस्ट आयटम सॉंगच्या यादीत जाऊन विराजमान झालं यात शंकाच नाही. (Bollywood tadaka)