Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Amol Palekar : जब दीप जले आना जब शाम ढले

Amitabh Bachchan : १८ वर्षांपूर्वी बॉलिवूडचा Multi Star Cast चित्रपट

Salman Khan लग्न करणार होता पण नेमकी माशी शिंकली कुठे?

Balasaheb Thackeray ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीला म्हणायचे भूत

Sholay : स्पर्धेत टिकले कोण? गळपटले कोण?

Bollywood Movies : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांचं झालंय

Shilpa Shetty : “मी महाराष्ट्राची मुलगी…”,मराठी-हिंदी भाषा वादावर शिल्पाचं सूचक

‘बिग बॉस मराठी’ फेम Janhavi Killekar ची मालिकेत एन्ट्री; मोहिनीच्या भूमिकेत प्रेक्षकांना

Actress Snehlata Vasaikar आता होणार माईसाहेब; ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेत करणार

Son Of Sardaar 2 Trailer: अजय देवगनच्या हटके कॉमेडीने चाहते

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

….आणि नवकेतन फिल्म्स हे बॅनर पुन्हा उभे राहिले!

 ….आणि नवकेतन फिल्म्स हे बॅनर पुन्हा उभे राहिले!
बात पुरानी बडी सुहानी

….आणि नवकेतन फिल्म्स हे बॅनर पुन्हा उभे राहिले!

by धनंजय कुलकर्णी 13/07/2024

कधी कधी एखाद्या फ्लॉप सिनेमाच्यानंतर ती चित्रपट संस्था बंद पडते की काय अशी शंका व्यक्त होते पण कधी कधी ही इष्टापत्ती असते. किंबहुना बाउन्स बॅक व्हावे म्हणून हे अपयश येतं असावं. या अपयशातून चित्र संस्था पुन्हा उभारी घेते आणि पुन्हा नव्या जोमात चित्रपटाची निर्मिती सुरू होते. असाच काहीसा प्रकार अभिनेता देवआनंद (Dev anand) यांच्या ‘नवकेतन’ या चित्र संस्थेच्या बाबत एकदा घडला होता. देवच्या चाहत्यांसाठी हा किस्सा खूप महत्त्वाचा आहे इंटरेस्टिंग आहे.

देव आनंद (Dev anand) यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन करायला १९७० सालच्या ‘प्रेम पुजारी’पासून सुरुवात केली. या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. त्यानंतर त्याने आपला पुढचा चित्रपट ‘तेरे मेरे सपने’ हा विजय आनंदकडे सोपवला. हा चित्रपट खरंतर चांगला सिनेमा असून देखील चालला नाही. यानंतर मात्र पुन्हा देवने पुढच्या सिनेमाच्या दिग्दर्शनाची सूत्रे आपल्या हातात घेतली. चित्रपट होता ‘हरे रामा हरे कृष्णा’. सुपर हिट सिनेमा.

नवकेतन चा पुढचा सिनेमा छुपा रुस्तुम (विजय आनंद) शरीफ बदमाश (राज खोसला) आणि हिरा पन्ना (देव आनंद) (Dev anand) हे तीनही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फार काही टिकू शकले नाही. त्यानंतर १९७४ साली देवने ‘इश्क इश्क इश्क’  हा चित्रपट दिग्दर्शित करायचे ठरवले. या चित्रपटाचे सर्व शूटिंग नेपाळ, हिमाचल प्रदेश ,लडाख येथे होणार होते. या सिनेमांमध्ये माउंट एवरेस्टचे देखील दर्शन घडते. देवला पहाडी एरिया खूप आवडत असे. त्यामुळे त्याची स्टोरी लाईन नेहमी त्याच एरियात फिरत असे.

या चित्रपटांमध्ये देवने यांनी अनेक नवीन कलाकारांना घेतले होते. त्या अर्थाने हा अनेक कलाकारांचा पहिला चित्रपट होता. अभिनेत्री शबाना आजमी हिचा हा पहिला कमर्शियल सिनेमा होता. त्याचप्रमाणे राकेश पांडे, शेखर कपूर, कबीर बेदी, पद्मिनी कोल्हापुरे यांचा देखील हा त्या अर्थाने पहिला मोठा चित्रपट होता. या चित्रपटाची गाणी आनंद बक्षी यांनी दिली होती. तर संगीत आर डी बर्मन यांचे होते. सिनेमात सर्व काही व्यवस्थित ठीकठाक झाले होते. पण मात्र चित्रपट सुपरफ्लॉप झाला. इतका की आधीचे तीन सिनेमे बरे असे म्हणायची वेळ आली. लागोपाठ चार फिल्म्स फ्लॉप !

या अपयशानंतर नवकेतन फिल्म्स हे बॅनर बंद करावे की काय असा दुष्ट विचार देव आनंदच्या डोक्यात येऊ लागला. कारण या चित्रपटांमध्ये त्याचे खूप पैसे वाया गेले होते. पण देवचे दोन भाऊ चेतन आनंद आणि विजय आनंद या तिघांनी मीटिंग घेऊन असे सांगितले की आपल्या बॅनरला आता पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. (१९५०-१९७५) आपण हे बॅनर बंद न करता पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू आणि पुन्हा एकदा या बॅनरला यश शिखरावर नेऊन पोहोचवू. आपल्या दोन्ही भावांच्या या आश्वासक सल्ल्याने देवला पुन्हा हुरूप आला.

=======

हे देखील वाचा : मुकेशने गायलेले गाणे पुन्हा रफीच्या आवाजात रेकॉर्ड केले!

=======

‘इश्क इश्क इश्क’ या चित्रपटाच्या अपयशाने मनात आलेल्या शंकेचे जळमट एका क्षणात   दूर झाले आणि तिथेच देव आनंदने नवकेतनच्या तीन चित्रपटांची घोषणा एकत्र केली. हे तिन्ही चित्रपट तीन भाऊ दिग्दर्शित करणार होते. विशेष म्हणजे या तिन्ही चित्रपटाची सुरुवात एकाच वेळी होणार होती. तिने चित्रपटांचे दिग्दर्शन वेगळेवेगळे असणार होते त्याचप्रमाणे संपूर्ण प्रोडक्शन क्रू हे वेगळे असणार होते. वेगळे संगीतकार, वेगळे छायाचित्रकार सर्वच स्वतंत्र! अशा पद्धतीने चेतन आनंद यांनी ‘जानेमन’ , विजय आनंद यांनी ‘बुलेट’, आणि देव आनंद (Dev anand) यांनी ‘देस परदेस’ हा चित्रपट दिग्दर्शित करायचे ठरवले.

‘जानेमन’ला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते तर ‘बुलेट’ आर डी बर्मन यांनी स्वरबध्द केला होतां. ‘देस परदेस‘ला राजेश रोशमचे संगीत होते. तीनही सिनेमाचा नायक देव आनंद होता पण नायिका मात्र वेगवेगळ्या होत्या. हेमा मालिनी, परवीन बाबी आणि टीना मुनीम. इश्क इश्क हा चित्रपट फ्लॉप झाला परंतु जानेमन, बुलेट आणि देश परदेश ही तीनही चित्रपट हिट झाले. एका अपयशी चित्रपटानंतर बाउंसबॅक होऊन नवकेतन बॅनर पुन्हा एकदा यशस्वी ठरले.

 धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity News Dev Anand Entertainment Featured
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.