ना Priyanka Chopra ना Deepika Padukone तर ‘या’ अभिनेत्रीकडे आहे

Ankhen : या सिनेमाचे पोस्टर एका सिगारेटच्या जाहिरातीवरून बनवले होते!
साठच्या दशकात जेव्हा हिंदी सिनेमा सप्तरंगात न्हावून निघाला होता तेव्हा काश्मीरसोबतच परदेशात जाऊन चित्रीकरण करण्याची एक मोठी लाट बॉलीवूडमध्ये आली होती. राज कपूर यांच्या ‘संगम’ या चित्रपटानंतर तर परदेशात जाऊन शूटिंग करणे कंपल्सरी आहे की काय असे समजून सर्वजण विदेशात जाऊन शूट करू लागले. लव्ह इन टोकियो, ऍन इव्हिनिंग इन पॅरिस हे चित्रपट विदेशात जाऊन शूट केलेयाने सुपरहिट झाले होते.
‘अराउंड द वर्ल्ड’ हा राज कपूर यांचा चित्रपट तर संपूर्ण विदेश वारी घडवून आणणारा होता. याच काळात १९६८ साली दिग्दर्शक रामानंद सागर यांनी एक चित्रपट बैरुट, इस्राइल इथे शूट केला. या देशात चित्रीकरण केलेला हा पहिलाच चित्रपट होता. हा चित्रपट अनेक अर्थाने तसा महत्त्वाचा होता. कारण ही एक स्पाय मूव्ही होती. त्या काळात जेम्स बॉण्डच्या चित्रपटांचा मोठा प्रेक्षक वर्ग भारतात तयार झाला होता. त्याची प्रेरणा घेऊनच रामानंद सागर यांनी हा चित्रपट बनवला. (Untold stories)

या चित्रपटात धर्मेंद्र, माला सिन्हा, मेहमूद, ललिता पवार, जीवन, मदन पुरी, असित सेन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. १९६८ सालचा हा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट होता. ‘मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी’ हे लता मंगेशकर यांचे सदाबहार गाणं या चित्रपटात होतं. हा चित्रपट होता ‘आंखे’ (Ankhen). ‘उस मुल्क की सरहद को कोई छू नही सकता जिस मुल्क की सरहद निगेहबान है आंखे’ असा दणदणीत शेर सांगून हा चित्रपट सुरू होतो.
हा एक स्टायलिश चित्रपट होता. यातील फाईट सीन्स जबरदस्त होते. यातील गाणी साहीर लुधियानवी यांनी लिहिली होती. मिलती है जिंदगी में मुहोब्बत कभी कभी, गैरो पे करम अपनो पे सितम ऐ जाने वफा ये जुल्म न कर, मेरी सून ले आज, दे दाता के नाम तुझको अल्ला रखे… ही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती. या चित्रपटाचे पोस्टर आपले मराठी कलाकार दिवाकर करकरे यांनी बनवले होते. (Ankhen)

त्याकाळी हाताने चित्र काढून आणि रंगवून पोस्टर बनवले जात असे. हे पोस्टर त्या काळातल्या एका गाजलेल्या सिगारेटच्या जाहिरातीवरून इन्स्पायर होऊन बनवले गेले. हा सिगारेटचा ब्रँड होता डनहिल. या सिगारेटच्या जाहिरातीतील टायपोग्राफी वापरून ‘आंखे’ (Ankhen) या चित्रपटाचे पोस्टर बनवण्यात आले होते. चित्रपटातील गाणी साहीर यांनी लिहिली होती तर संगीत रवी यांचे होते.
‘दे दाता के नाम तुझको अल्ला रखे या गाण्याच्या शूट नंतर अभिनेता मेहमूदने थोडी गंमत करायचे ठरवले. बैरुतच्या रस्त्यावर शूट झाल्यावर मेकअप आणि कपडे न बदलता गाण्यातील सर्व कलाकार तसेच हॉटेलमध्ये गेले आणि लॉबी बसून लोकांचे रंजन केले मेहमूदने आणि पर्यटकांकडून खूप पैसे कमावले नंतर ते पैसे कृ मेम्बर्समध्ये वाटून टाकले.
============
हे देखील वाचा : Anjaan : डिस्को डान्सरची गाणी लिहिताना गीतकार अंजान का नर्व्हस होते?
============
या चित्रपटाला फिल्मफेअरच्या अनेक नामांकन मिळाले रामानंद सागर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे पुरस्कार या चित्रपटासाठी मिळाला. संपूर्ण आयुष्यात त्यांना मिळालेला हा एकमेव सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार होता. या चित्रपटात खरं जर रामानंद सागर यांना राज कुमार यांना मुख्य भूमिकेत घ्यायचे होते. राजकुमार यांच्या बाबतच्या अनेक दंतकथा लोकप्रिय आहेत.

त्यापैकीच एका कथेत असे सांगितले जाते की, जेव्हा रामानंद सागर राज कुमार यांना या चित्रपटाची कथा ऐकवण्यासाठी त्यांच्या घरी गेले; तेव्हा संपूर्ण कथानक ऐकल्यानंतर राज कुमार यांनी आपल्या जवळ बसलेल्या कुत्र्याला विचारले, ”तू या चित्रपटात काम करशील का? तुला कथा आवडली का?” त्यावर त्या कुत्र्याने नकारार्थी मान डोलावली तेव्हा राज कुमार म्हणाला, ”जेव्हा माझा कुत्रा देखील ही कथा आणि हा चित्रपट स्वीकारू शकत नाही तर मी कसा स्वीकारू?” या सत्यांश किती माहिती नाही पण हा किस्सा अनेक वर्षापासून सांगितला जातो. काही असो पण धर्मेंद्रला घेवून सिनेमा परफेक्ट बनला होता. पुढे धर्मेंद्रला घेवून त्यांनी आणखी एक सिनेमा बनवला ‘चरस’ त्याचे चित्रणदेखील परदेशात केले होते. (Ankhen)