
Ratan Tata : अतिशा नाईक म्हणते, “रतन टाटांना अमरत्व हवं होतं!”
बक्कळ पैसा असूनही काही माणसं त्यांच्या स्वच्छ, निर्मळ मनाने आणि त्यांच्या कर्तुत्वाने आपल्या मनावर अधिराज्य करतात. त्यापैकीच दोन नावं म्हणजे बाबा आमटे आणि रतन टाटा. रतन टाटा यांनी उद्योग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलीच पण समाजसेवा करुन लोकांची मनं देखील जिंकली. ही दोन्ही माणसं आपल्यातून कधीच निघून जाऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. अशीच इच्छा मराठी अभिनेत्री अतिशा नाईकने (Atisha Naik) बोलून दाखवत देवाने त्यांना अमरत्व द्यायला हवं असं भावुक विधान तिने केलं आहे. नेमकं काय म्हणाली अतिशा जाणून घेऊयात…(Entertainment news)
अतिशा नाईकला आरपार चॅनलच्या मुलाखतीमध्ये तिच्या आदर्शांविषयी विचारण्यात आलं. तेव्हा अतिशाने दिवंगत बाबा आमटे आणि सर रतन टाटा यांची नावे घेत देवाने त्यांना अमरत्व द्यायला पाहिजे होतं असं म्हटलं. अतिशा म्हणाली, “रतन टाटा माझे आदर्श आहेत. मला सर रतन टाटा खूप आवडतात. माझं असं म्हणणं होतं की, परमेश्वराने कोणाला तरी अमरत्व द्यावं. हे खरे लोक आहेत आणि जे तुमच्या अमरत्वाने बदलणार नाहीत. त्यात माझ्यासाठी सर रतन टाटा पहिलं, कदाचित शेवटचं नाव आहे.” (Ratan tata news)

पुढे ती म्हणाली की, “तो माणूस इतका मोठा आणि महत्त्वाचा आहे की, ते जी पायवाट चालले असतील त्या पायवाटेच्या धुळीचा कण जरी मला मिळाला तरी माझ्या आयुष्यातील खूप गोष्टी या सुकर होतील. त्यामुळे रतन टाटा (Ratan Tata) मला खूप आडवतात. शिवाय बाबा आमटेही (Baba Amte) आवडतात किंवा प्रकाश आमटे हेदेखील. ज्यांनी त्यांच्या कामात स्वत:ला अगदी झोकून दिलं आहे.” (social workers)

रतन टाटा, बाबा आमटे आणि प्रकाश आमटेंबद्दल अधिक भरभरुन बोलताना अतिशा म्हणाली की, “त्यांच्यातला खरेपणा दिसतो. त्यांचं काम दिसतं. कोणी म्हणणार आहे का प्रकाश आमटे अवॉर्ड घ्यायला सिल्कच्या झब्ब्यात का आले नाहीत. त्यांना ते शक्य आहे. अनेक लोक त्यांना मोठमोठ्या गाड्या पुरवतील. पण जो माणूस इतके वर्ष साधेपणातच जगला त्याला नंतर हे सगळं खूप खोटं आणि क्षुल्लक वाटायला लागतं.” (Entertainment)
===============================
हे देखील वाचा: Devika Rani : हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली आधुनिक नायिका!
===============================
अतिशा नाईक हिने आजवर नाटक, मालिका आणि चित्रपटामंध्ये उल्लेखनीय कामं केली आहेत. ‘हसा चकट फू’, ‘घाडगे अँड सून’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘आभाळमाया’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या त्या स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.(Atisha naik serilas)