
Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या गळ्यात वायर अडकताच भयंकर घडलं
Bigg Boss Marathi Season 6 च्या नव्या भागाचा प्रोमो सध्या प्रेक्षकांमध्ये मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. या भागात कॅप्टन्सी टास्कदरम्यान घडलेला एक धक्कादायक प्रसंग पाहायला मिळणार आहे. टास्क खेळताना परिस्थिती अचानक गंभीर बनते आणि अखेरीस बिग बॉसना स्वतः हस्तक्षेप करून खेळ थांबवण्याचा आदेश द्यावा लागतो. या आठवड्यात घराच्या कॅप्टनपदासाठी संकेत (Sanket Pathak) आणि रुचिता (Ruchita Jadhav) यांच्यात थेट स्पर्धा रंगलेली दिसत आहे. दोघांनाही कॅप्टन बनण्याची संधी मिळवायची असल्याने टास्कमध्ये प्रचंड चुरस दिसून येते. या टास्कमध्ये स्पर्धकांना विविध वायरच्या गुंत्यातून मार्ग काढण्याचं आव्हान दिलं जातं.(Bigg Boss Marathi Season 6)

खेळ जसजसा पुढे सरकतो, तसतशी स्पर्धा अधिक आक्रमक होत जाते. प्रोमोमध्ये रुचिता दीपाली ताईंना सांगताना दिसते, “दीपाली ताई, त्याला खेच, खेच.” दुसरीकडे संकेत सर्व वायर घट्ट पकडून उभा राहतो आणि ठामपणे म्हणतो, “मी कोणालाही जाऊ देणार नाही.”मात्र या झटापटीदरम्यान अचानक परिस्थिती धोकादायक वळण घेते. टास्कदरम्यान सगळ्या वायर संकेतच्या मानेभोवती फिरताना दिसतात. काही क्षणांतच त्याच्या गळ्यात वायर घट्ट अडकतात आणि घरातील सदस्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं.

ही परिस्थिती पाहून घरातील सदस्य घाबरून जातात. राखी मोठ्याने ओरडताना ऐकू येते, “बिग बॉस, त्याच्या गळ्यात रस्सी आहे.” तर सागरही घाईघाईने “थांबा, थांबा” असं म्हणत सर्वांना सावध करताना दिसतो. परिस्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात येताच बिग बॉस लगेच आदेश देतात, “सगळ्यांनी त्वरित थांबा.” त्यानंतर टास्क थांबवण्यात येतो की नाही आणि पुढे काय निर्णय घेतला जातो, याबाबत उत्सुकता वाढली आहे. (Bigg Boss Marathi Season 6)
=============================
हे देखील वाचा: मुलासाठी Vishakha Subhedar ढसाढसा रडली; सरकारपर्यंत व्हिडिओ पोहचताच अभिनेत्रीला आला थेट CMO कडून फोन
=============================
या घटनेनंतर कॅप्टन्सी टास्कचा निकाल काय लागणार, संकेत पूर्णपणे सुरक्षित आहे का, आणि या प्रकाराचा स्पर्धेवर नेमका काय परिणाम होणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.दरम्यान, या प्रोमोमुळे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. वायरिंगच्या गुंत्यात अडकलेल्या या टास्कमुळे कार्यक्रमात नेमकं काय घडलं आणि पुढे कोणता निर्णय घेतला जाणार, हे येत्या भागात स्पष्ट होणार आहे.