Madhubala मुंबईच्या मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Mr India : अनिल कपूरच्या चित्रपटात सर्वाधिक खर्च खलनायकावर केला!
बॉलिवूडमध्ये आजवर अनेक Sci-Fi (Sci-Fi Movies) चित्रपट आले. पण ८० च्या दशकात शेखर कपूर (Shekhar Kapoor) यांनी साकारलेला ‘मिस्टर इंडिया’ (Mr.India movie) आजही सगळ्या चित्रपटांना मात देतोच. उत्कृष्ट कथानक, दर्जेदार कलाकार आणि १९८७ ला वापरलेलं तंत्रज्ञान याचं कौतुक करावं तितकं कमीच. अनिल कपूर, श्रीदेवी आणि अमरीश पुरी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मिस्टर इंडिया’ या कल्ट चित्रपट आहे. आता ८०च्या दशकात Sci-Fi चित्रपट करायचं म्हटलं तर आर्थिक भांडवल भरपूर हवंच. तुम्हाला माहित आहे का हा चित्रपट तयार करण्यासाठी कपूर भावंडानी घरातील सगळेच पैसे पणाला लावले होते. जाणून घेऊयात हा किस्सा….(Bollywood news)

८०-९०च्या दशकात ‘तेजाब’, ‘मैने प्यार किया’, ‘दिल’, ‘घायल’ असे अनेक सुपरहिट चित्रपट रिलीज झाले होते. पण ‘मिस्टर इंडिया’ या सगळ्याच चित्रपटांमधून खास ठरला. कथेचा मुळ नायकच कथेत असूनही तंत्रज्ञानाच्या मदतीने गायब होऊ शकतो आणि तरीही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरु शकतो ही कॉन्सेप्ट शेखर कपूर यांनी बॉलिवूडमध्ये रुजवली. ‘मिस्टर इंडिया’ (Mr. India Movie) या चित्रपटाची एक विशेष खासियत म्हणजे प्रेक्षकांनी नायकापेक्षा खलनायकाला डोक्यावर जास्त घेतलं होतं. आजही ‘मोगॅम्बो खुश हुआ’ हा डायलॉग लोकांना विशेष आठवणीत आहे. खलनायकाला प्रतिसाद मिळेल असा विचार शेखर कपूर यांनी कदाचित फार केल्यामुळे त्या पात्रावर जास्त पैसे खर्च करण्यात आले होते. (Bollywood cult movies from 80’s)

‘मिस्टर इंडिया’मध्ये खलनायक मोगॅम्बोची भूमिका अमरीश पुरी (Amrish Puri) यांनी साकारली होती. त्या चित्रपटापुर्वी बऱ्याचदा अमरीश यांनी खलनायक साकारला होता खरा पण ‘मिस्टर इंडिया’ मधील खलनायक जरा ड्रामेबाज आणि दिसण्यातही भयावह हवा होता. खलनायक म्हणून अमरीश पुरी यांना खरं तर सेखर यांना वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणायचं होतं आणि त्यामुळेच त्यांच्या लूक ते आऊटफिटपर्यंत फार काम करण्यात आलं होतं. (Entertainment)

‘मोगॅम्बो’साठी (Mogambo) आधी एक लूक तयार केला गेला, त्यांचे केस एका डिझाईनप्रमाणे स्टाईल करण्यात आले होते. त्यांचा पोशाख काळ्या आणि सोनेरी रंगांचा होता आणि खांद्यावर पेंडेंट होते. ब्लेझर स्टाईल लांब ओव्हरकोट आणि त्याखाली बूट. अगदी परफेक्ट अशा असणाऱ्या या मोगॅम्बोच्या आउटफिटवर त्यावेळी २५ हजारांपेक्षा अधिक खर्च करण्यात आला होता. त्याची तुलना जर का आता केली तर जवळपास २ लाखांच्या घरात ती किंमत जाईल. मिस्टर इंडिया चित्रपटाचं बजेट २ कोटी होतं आणि ८०च्या दशकात एका हिंदी चित्रपटाचं हे सर्वाधिक बजेट मानलं जात होतं. एकूण बजेट २ कोटी असूनही केवळ खलनायकाच्या लूकवर २५ हजारांपेक्षा अधिक खर्च निर्माते बोनी कपूर (Boni Kapoor) यांनी केला होता. अर्थात चित्रपट सुपरहिट झाला आणि देशात ५.४० कोटी आणि जगभरात १०.८० कोटी मिस्टर इंडियाने कमावले होते. थोडक्यात काय तर खलनायकाच्या लूकवर खर्च केलेले पैसे दहा ते वीस पटींनी परत मिळाले होते.(Mr. India movie budget and collection)

‘मिस्टर इंडिया’ची आणखी एक खासियत म्हणजे हा चित्रपट चायनामध्ये हिट झाला होता. १९९० साली चायनामध्ये हा चित्रपट रिलीज झाला आणि भारतीय बॉक्स ऑफिसपेक्षा चालनामध्ये या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती. अजून एक इंटरेस्टिंग बाब म्हणजे मिस्टर इंडियामध्ये आधी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कास्ट करण्याची चर्चा होती; पण त्यावेळी बच्चन राजकारणात जरा सक्रिय झाल्यामुळे ते शक्य झालं नाही आणि मुख्य नायकाची भूमिका अनिल कपूर यांच्याकडे गेली. इतकंच नाही तर मोगॅम्बोसाठी अमरीश पुरी नाही तर अनुपम खेर हे पहिली पसंती होते. पण अनुपम स्वत:च म्हणाले की अमरीश पुरी यांच्यापेक्षा मी चांगलं काम करू शकत नाही, आणि त्यानंतर अमरीश पुरी यांनी मोगॅम्बो साकारुन इतिहासच रचला. (Bollywood news update)
================================
हे देखील वाचा: Samana Movie : भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक ‘सामना’ची ५० वर्ष पूर्ण!
=================================
‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाची कथा शेखर कपूर, सलीम-जावेद यांनी लिहिली होती आणि शेखर कपूर यांनी त्यांच्या वेगळ्याच अंदाजात ती दिग्दर्शित केली होती. १९८७ सालात सर्वाधिक कमाई करणारा ‘हुकुमत’ या धर्मेंद्र यांच्या चित्रपटानंतर मिस्टर इंडिया हा दुसरा चित्रपट ठरला होता. आजही ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो. (Bollywood movies from 80’s)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi | Marathi Entertainment News