Karishma Kapoor ने ‘दिल तो पागल है’ मध्ये माधुरी दीक्षितसोबत

Dada Kondke : “मी मांडीवर दादांचं प्रेत घेऊन…”
मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ प्रेक्षकांना देऊ करणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे दादा कोंडके…मराठी शोमॅन दादा कोंडके आणि त्यांचे अस्सल महाराष्ट्राच्या मातीशी इमान राखणारे गावरान भाषेतील इरसाल विनोदी चित्रपट तयार केले… दिलखुलास व्यक्तिमत्व लक्षवेधी संवादफेक यामुळे दादा कोंडकेंनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं… ‘सोंगाड्या’,’ पांडू हवालदार’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी धाटणीच्या भूमिका साकारणाऱ्या दादा कोंडके यांचा मृत्यू प्रत्येक कलाकार आणि प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून गेला… जाणून घेऊयात दादा कोंडकेंच्या निधनाच्या त्या दिवसाबद्दल…

पत्रकार अनिता पाध्ये यांनी ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दादा कोंडकेंच्या काही आठवणी शेअर केल्या. दादा कोंडकेंच्या जीवनावर आधारित एकटा जीव नावाचं पुस्तकही त्यांनी लिहिलं आहे. या मुलाखतीत त्या म्हणाल्या की,”अगदी अचानक दादांचं निधन झालं. रात्री पाऊणेतीन वाजता त्याचे जीतू भाऊ मॅनेजर होते त्यांचा फोन आला. तेव्हा ते मला म्हणाले की, ताई दादांची प्रकृती बिघडली आहे. आम्ही त्यांना सुश्रृषा हॉस्पिटलमघ्ये घेऊन जातोय तर तुम्ही याल का? जे चार लोक काम करायचे, दादा त्यांच्याबरोबच राहायचे. तर मी लगेच त्यांना येते असं सांगितलं..
पुढे त्या म्हणाल्या की, “त्यानंतर मी लगेच माझ्या भावाला उठवलं आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. तिथे त्यांना कॉरिडोअरमध्ये स्ट्रेचरवर ठेवलं. तेव्हा डॉक्टर तिथेच असल्यांने मी त्यांना विचारलं की काय झालं. तर त्यांनी हार्ट अटॅक आला असं सांगितलं. मी डॉक्टरांना म्हणाले की तुम्ही हार्ट पंपिग वगैरे करुन बघा. पण, त्याचा काही अपयोग होणार नाही कारण,त्यांना जाऊन १० मिनिटं झाली आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं.”
================================
हे देखील वाचा : दादा कोंडके यांनी ‘माहेरची साडी’ हा सिनेमा स्वत: का बनवला नाही?
=================================
पुढे अनिता म्हणाल्या की,”मग मी माझ्या भावाला सांगितलं की, तू या लोकांबरोबर घरी जा आणि दादांच्या नातेवाईकांना फोन कर.दादांची बहीण पुण्याला राहायची. शिवाय त्यांचे असिस्टंट कोल्हापूरला राहायचे. नंतर दादांना घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्सची गरज होती. हॉस्पिटलच्या दारात ॲम्ब्युलन्स उभी होती.पण,तेथील लोक म्हणाले की फॉर्म भरावा लागेल, ते रजिस्टर लॉकरमध्ये आहे, आता ड्राइव्हर नाही. त्या काळात मोठ्या प्रमाणात ॲम्ब्युलन्स नव्हत्या. एक शिवसेनेची ॲम्ब्युलन्स होती. पण, ती आम्हाला मिळाली नाही.त्यानंतर मी पहिला फोन विजय कोंडकेंना केला. कारण, किती काही झालं तरी आम्ही बाहेरची माणसं होतो. रक्ताचे नातेवाईक ते होते. दादांच्या शेवटच्या काळात विजय कोंडकेबरोबर त्यांचे संबंध चांगले नव्हते. पण, मी त्यांना फोन केला आणि त्यांना दादांच्या निधनाबद्दल सांगितलं. याशिवाय दादांचे जवळचे दोन मित्र होते, त्यांना मी फोन केला. साबीर शेख त्यावेळी कामगार मंत्री होते. त्यांनाही मी फोन केला, तर ते अंबरनाथला होते. या सगळ्यात हॉस्पिटलमध्ये दोन तास मी दादांच्या प्रेताजवळ एकटी होते.”

अनिता पुढे म्हणतात, “तेव्हा दादांची कॉन्टेसा गाडी होती. कॉन्टेसा गाडीचा मागचा भाग रुंद असतो. त्या गाडीत दादांचे दोन मित्र आणि मी मांडीवर दादांचं प्रेत घेऊन गेलो. कारण, अॅम्बुलन्स नव्हत्या. एक अॅम्बुलन्स दारात उभी होती तर दुसरी उपलब्ध नव्हती. त्यावेळेला इतक्या सोयी नव्हत्या. दादा बालमोहनच्या गल्लीत एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहायचे. आम्ही दुसऱ्या मजल्यावर प्रेत घेऊन गेलो आणि संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांचे सगळे नातेवाईक, बहिणी, हिंदी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील तसेच राजकीय क्षेत्रातील लोकं आली होती. तर, बाळासाहेब ठाकरेही आले होते आणि तिथे आल्यानंतर ते कोणाशी बोलले नाहीत. ते दादांच्या प्रेताजवळ बसले होते.त्यांच्या कपाळावरुन हात फिरवत होते.कारण,त्यांची खूप वर्षांची मैत्री होती.”
================================
हे देखील वाचा : दादा कोंडके यांची हिंदीतील भन्नाट मुशाफिरी…
=================================
दादा कोंडके यांच्या ‘तांबडी माती’, ‘पांडू हवालदार’, ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’, ‘तेरे मेरे बीच मे’, ‘आगे की सोच’, ‘पळवा पळवी’, ‘मला घेऊन चला’, असे अनेक सुपरहिट चित्रपट दादांच्या नावावर नोंदवले गेले आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi