
Dev Anand : लंच टाईममध्ये सहज सुचलेली ‘ही’ गजल आज साठ वर्षांनंतरही आहे तितकीच लोकप्रिय!
हिंदी सिनेमातील गाण्यांच्या कथा मोठ्या मजेदार असतात. कधी कधी अगदी सहज गप्पा चालू असताना त्यातून आलेल्या एखाद्या वाक्यातून एखाद्या ओळीतून अनपेक्षितपणे गाण्याचा जन्म होतो! असाच प्रकार या गझल बाबत झाला होता. ही गझल नंतर हिंदी सिनेमा देखील आली आणि आज साठ वर्षानंतर देखील तितकीच प्रचंड लोकप्रिय आहे. एका संगीतकाराने सांगितलेल्या एका शेर ला उत्तर देण्यातून या गझलेचा जन्म झाला. कोणती होती ती गझल आणि काय होता तो नेमका किस्सा? (Bollywood untold stories)

१९५६ साली दिग्दर्शक चेतन आनंद नवकेतन फिल्मचा ‘फंटूश’ हा चित्रपट दिग्दर्शित करीत होते. या सिनेमात देव आनंद ,शीला रामाणी, के एन सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाची गाणी साहीर लुधियानवी यांनी लिहिली होती तर संगीत सचिन देव बर्मन यांचे होते. ‘दुखी मन मेरे सुन मेरा कहना जहां नही चैना वहां नही रहना, वो देखे तो उनकी इनायत, ऐ मेरे टोपी पलट के आ, देनेवाला जब भी देता देता छप्पर फाड के…. या गाण्यांनी हा सिनेमा हिट झाला होता. दिग्दर्शन चेतन आनंद करीत जरी असले तरी त्यांचे सहाय्यक होते त्यांचे धाकटे बंधू विजय आनंद गोल्डी. त्याचप्रमाणे संगीतकार सचिन देव बर्मन यांचे सहाय्यक होते संगीतकार जयदेव. याच सिनेमाच्या सेटवर सचिनदा यांचे पुत्र राहुल देव बर्मन यांचा देखील सचार असायचा. (entertainment)

एकदा दुपारी लंच टाईम नंतर विजय आनंद , साहीर लुधियानवी आणि संगीतकार जयदेव गप्पा मारत बसले होते. चित्रपटाचे बऱ्यापैकी काम झालं होतं त्यामुळे निवांतपणा होता. यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. त्यावेळेला संगीतकार जयदेव यांनी गीतकार साहीर लुधियानवी यांना एक शेर ऐकवला. तो शेर असा होता ‘ हमको तो गर्दीश ये हालात पे रोना आया लेकीन ऐ रोने वाले तुझे किस बात पे रोना आया……’ साहीर यांना तो शेर आवडला. गोल्डी विजय आनंद यांना देखील तो शेर खूप आवडला. त्यानंतर संगीतकार जयदेव म्हणाले ,”साहीर साब , शेर लिहिणाऱ्याने एक प्रश्न विचारला आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या ना!” साहीर यांनी लगेच कागद पेन्सिल काढले. आणि त्या शेर ला उत्तर द्यायचा सज्ज झाले. मूळ शेर होता ‘हमको तो गर्दीश ये हालात पे रोना आया लेकीन ऐ रोने वाले तुझे किस बात पे रोना आया……’ त्यावर साहीर लुधियानवी यांनी उत्तर दिले,” कभी खुद पे कभी हालात पे रोना आया बात निकली तो हर बात पे रोना आया…’ सर्वांनाच ते उत्तर खूप आवडलं. (Bollywood tadaka)
======================
हे देखील वाचा: Ameeta चे ‘फिल्मी बारसे’ वाचकांचा कौल घेवून करण्यात आले.
======================
विजय आनंद तर भलतेच खूष झाले. ते म्हणाले,” साहीर साब, याला आणखी काही शेर जोडा न मस्त गजल तयार होईल!” साहीर यांची प्रतिभा खुललेलीच होती लगेच लिहून काढलं,’ हम तो समझे थे हम भूल गये है उनको क्या हुआ आज कीस बात पे रोना आया….’ संगीतकार जयदेव म्हणाले ,”फार सुंदर गझल झाली आहे. कधी संधी मिळाली तर नक्कीच ही गझल आपण वापरुत.” पाच वर्षानंतर जेव्हा नवकेतन चा ‘ हम दोनो ‘ हा चित्रपट फ्लोअरवर गेला त्या वेळेला एका सिच्युएशन ला विजय आनंद यांना हि गजल आठवली. योगायोगाने या चित्रपटाला संगीत जयदेव यांचेच होते. त्यांनी लगेच साहीर यांच्याकडून ती गझल घेतली आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात ही अजरामर गझल गाऊन घेतली. (Gazals in bollywood)

फंटूश चित्रपटाच्या दरम्यानच्या एका लंच टाईम मध्ये अगदी सहज गप्पांमध्ये सुचलेली गझल आज साठ वर्षानंतर देखील तितकीच लोकप्रिय आहे.
कभी खुद पे रोना
कभी खुद पे, कभी हालात पे रोना आया बात निकली
, तो हर इक बात पे रोना आया
बात निकली, तो हर इक बात पे रोना
हम तो समझे थे के हम भूल गए हैं उनको
हम तो समझे थे
हम तो समझे थे के हम भूल गए हैं उनको
क्या हुआ आज, ये किस बात पे रोना आया
क्या हुआ आज, ये किस बात पे रोना आया
कभी खुद पे, कभी हालात पे रोना
किसके लिए जीते हैं हम
किसके लिए जीते हैं हम किसके लिए जीते हैं
बरहा ऐसे सवाल पर रोना आया
बारहा ऐसे सवाल पर रोना आया
कभी खुद पे
कौन रोता है किसी और की खातिर ऐ
दोस्त कौन
रोता है किसी और की खातिर ऐ दोस्त
सबको अपनी ही किसी बात पर रोना आया
कभी खुद पे
, कभी हालात पे रोना आया
बात निकली, तो हर इक बात पे रोना आया
कभी खुद पे