Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Suresh Wadkar

    Suresh Wadkar : ‘ही’ गजल गायल्यावर सुरेश वाडकर का अस्वस्थ होते?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prateik Smita Patil : “आईच्या घरी वडिलांना लग्नाला बोलावणं…”

Rishi Kapoor : ‘डफली वाले डफली बजा…’ हे गाणे सिनेमातून

Sai Tamhankar: ‘गुलकंद’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई!

Rajkumar Rao : ‘भूल चुक माफ’ चित्रपटाला उच्च न्यायालयाचा दणका!

Raid 2 : अजय-रितेशच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; पार केला

Alka Kubal : “मी मार खाण्याचे पैसे घेतोय आणि तू…”;

Pallavi Joshi : अनुपम खेर यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटात

Maji Prarthana : हाडांचा झाला होता सापळा; मराठी अभिनेत्याची भूमिकेसाठी कठोर

Indian Army : बॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टारने १९८८ला टीव्हीवर साकारली होती

स्वतःला समजून घेण्यासाठी Actress Manisha Koirala ने केली ब्रेन मॅपिंग; काय

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Jeetendra : जितेंद्र ऐंशीच्या दशकात दक्षिणात्य सिनेमात का बिझी झाले ?

 Jeetendra : जितेंद्र ऐंशीच्या दशकात दक्षिणात्य सिनेमात का बिझी झाले ?
बात पुरानी बडी सुहानी

Jeetendra : जितेंद्र ऐंशीच्या दशकात दक्षिणात्य सिनेमात का बिझी झाले ?

by धनंजय कुलकर्णी 30/01/2025

कधी कधी अनपेक्षितपणे वाईट किंवा कठीण काळात केलेले कामदेखील सुपरहिट होऊन जातं! याचं कारण असं असतं की त्या काळातील मनोवस्था त्या कामासाठी मात्र साजेशी असते. अभिनेता जितेंद्र (Jeetendra) याच्या बाबी एकदा असंच झालं होतं. ऐंशीच्या दशकात अभिनेता जितेंद्र निर्मित एक चित्रपट सुपर फ्लॉप झाला होता. तब्बल अडीच कोटी रुपयांचं नुकसान त्यांना झालं होतं. या अपयशाने जितेंद्र पुरता कोलमडला होता. विमनस्क अवस्थेत होता.

अशा अवस्थेतच त्यांना दुसऱ्या एका चित्रपटाचं गाणं चित्रीत करायचं होतं. हे गाणं जितेंद्रवरच चित्रित होणार होतं. या गीतातील भावना देखील एका हाताश, दु:खी आणि सर्वस्व हरवलेल्या व्यक्तीच्या होत्या. वातावरण बरोबर मॅच झालं आणि दुसऱ्या चित्रपटातील हे गाणं सुपरहिट तर झालं पण चित्रपट देखील चांगला चालला! कोणतं होतं ते गाणं? कोणता होता चित्रपट? आणि जितेंद्रचा कोणता चित्रपट फ्लॉप झाला होता?  

हा किस्सा आहे ऐंशीच्या दशकातला. जितेंद्रने १९७८ साली एक मुस्लिम सोशल चित्रपट निर्माण करायला घेतला. या चित्रपटाचे नाव होते ‘दिदार ए यार’ (Deedar-E-Yaar) .त्या काळात मुस्लिम सोशल सिनेमांना देशातील नॉर्थ बेल्टमध्ये खूप मागणी असे. या चित्रपटाबाबत जितेंद्रला खूप अपेक्षा होत्या. लखनवी नवाबी कुटुंबी वातावरणातील या सिनेमाची कथा चांगली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘मेरे मेहबूब’ फेम एच एस रावेल करणार होते.

या चित्रपटाची गाणी साहीर लुधियानवी, इंदीवर, अमीर मीनाई आणि कैफी आजमी यांनी लिहीली होती. चित्रपटाला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलल (Laxmikant–Pyarelal) यांचे होते. चित्रपटात जितेंद्र (Jeetendra), रेखा, ऋषी कपूर आणि टीना मुनीम अशी जबरदस्त स्टार कास्ट होती. चित्रपटाची कथानक मुस्लिम सोशल सिनेमाला साजेसे होते. पण हा चित्रपट निर्माण व्हायला तब्बल पाच वर्षे लागली आणि २२ ऑक्टोबर १९८२ रोजी  हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपर फ्लॉप झाला!!

हा चित्रपट सुपर फ्लॉप होण्याची कारणे त्या काळात जी सांगितली गेली होती ती अशी होती एकतर हा सिनेमा बनायला तब्बल चार-पाच वर्ष लागली होती त्यामुळे एडिटिंगमध्ये घोळ होते दुसरे तो काळ अमिताभ बच्चन यांच्या ॲक्शन मुव्हीचा होता. त्यामुळे या काळात सामाजिक चित्रपटांना फारसं यश मिळत नव्हतं. मुस्लिम सोशल सिनेमा हा थॉट साठच्या दशकामध्ये खूप चालत होता. ऐंशीच्या दशकातील पब्लिकची टेस्ट आता बदलली होती.

हा चित्रपट जितेंद्र (Jeetendra) ने मोहरमच्या काळामध्ये प्रदर्शित केला होता पण त्याचा काही उपयोग झाला नाही. (मात्र याच काळात B. R. Chopra यांचा ‘निकाह’ हा दुसरा मुस्लिम सोशल चित्रपट याच्या एक महिना आधी २४ सप्टेंबर १९८२ ला प्रदर्शित झाला तो मात्र प्रचंड यशस्वी झाला!) जितेंद्र या चित्रपटाच्या अपयशाने पुरता कोलमडून पडला. देणेकरांचा रोज तगादा सुरू झाला. त्या काळात त्याला तब्बल अडीच कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. जितेंद्र एका अर्थाने पूर्णपणे उध्वस्त झाला होता. तो भयानक डिप्रेशन गेला होता.

याच काळात जितेंद्र (Jeetendra) जे ओमप्रकाश यांच्या ‘अर्पण’ या चित्रपटात काम करत होता. या चित्रपटात जितेंद्रसोबत रीना रॉय आणि राज बब्बर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘दिदार ए यार’ या चित्रपटाच्या अपयशानंतर जितेंद्र प्रचंड हताश झाला होता. त्याला जगण्यात काही स्वारस्य वाटत नव्हतं. सगळीकडून अपयशाच्या बातम्या येत होत्या. फायनान्सर जितेंद्रच्या नावाने ओरडत होते. देणेकरांचे तगादे वाढले होते. सगळीकडून वाईट बातम्या कानावर पडत होत्या. (Bollywood tadka)

याच काळात एकदा जे ओमप्रकाश जितेंद्रला भेटायला त्याच्या घरी आले. जितेंद्र हताश डोळे आणि वाढलेली दाढी घेऊन घरात एकटाच अंधात्रात बसला होता. J. Om Prakash त्यांना म्हणाले, ”ही फिल्मी दुनिया आहे. इथे असेच चालतं. पण यामुळे खचून जायचं नसतं. अपयशातूनच यशाचा मार्ग मिळत असतो!” जितेंद्रने नुसते हसल्यासारखे केले. जे ओम प्रकाश पुढे म्हणाले, ”तुझा हा जो लूक आहे तो मला ‘अर्पण’ मधील एका गाण्यासाठी हवा आहे. यात तुला एक प्रेमभंग झालेल्या व्यक्तीचे गाणे सादर करायचे आहे. आपण या गाण्याचे आज संध्याकाळी शूट उररून टाकू.”

============

हे देखील वाचा : Dev anand : देव आनंद पाकिस्तानी क्रिकेटपटूला घेऊन हा चित्रपट बनवणार होता!

============

जितेंद्र (Jeetendra) म्हणाला, ”माझी मनस्थिती अजिबात चांगली नाही. मी काम करू शकत नाही.” जे ओमप्रकाश म्हणाले,” अरे मला तुझी हीच मनस्थिती हवी आहे आणि हाच लूक हवा आहे. तू काहीही वेगळा गेट अप मेकअप करू नकोस. तू संध्याकाळी स्टुडिओमध्ये ये.”  जितेंद्र त्याप्रमाणे संध्याकाळी स्टुडिओमध्ये गेला.

तिथे ‘मोहब्बत अब तिजारत बन गई है तिजारत अब मोहब्बत बन गई है…’ या गाण्याचे शूट झाले. या गाण्यातील लुक जितेंद्रचा सर्वांना खूप आवडला. एक प्रेम भंग झालेला हताश प्रेमी गाणं गातो अशी सिच्युएशन होती. जितेंद्रच्या वैयक्तिक आयुष्यातील दुःखाला इथे चांगली वाट मिळाली! पुढे ‘अर्पण’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिट झाला. हे गाणे देखील लोकांना खूप आवडले. गायक अन्वर यांनी हे गाणे गायले होते. त्या काळातील दुःखी, प्रेमभंगी जीवाला मलम लावणारे हे गाणे होते!

काळ कुणासाठी थांबत नाही. जितेंद्र (Jeetendra) ने आता पुन्हा एकदा नव्या जोमाने काम करायला सुरुवात केली त्याने साउथचा रस्ता धरला. तिथे त्याने ‘हिम्मतवाला’ हा केवळ चार-सहा महिन्यात तयार झालेला चित्रपट केला आणि हा चित्रपट भारतभर प्रचंड लोकप्रिय झाला. यानंतर जितेंद्र, श्रीदेवी, जयाप्रदा यांच्या साउथकडील चित्रपटांची रांगच लागली. आपल्याकडे म्हटलं जातं इष्टापत्ती. एखादी आपत्ती पुढच्या सोनेरी संधीची सुरुवात असते. (untold stories)

त्या पद्धतीने जितेंद्रला यशाचा नवा मार्ग सापडला आणि ऐंशीच्या दशकात त्या अर्थाने जितेंद्र सुपरस्टार होता. कारण अमिताभ बच्चन राजकारणात गेल्यामुळे त्याचे चित्रपटात काम करणे कमी झाले होते. त्या काळात जितेंद्र (Jeetendra) आणि मिथुन चक्रवर्ती हे दोन स्टार जबरदस्त चालत होते. ‘दिदार ए यार’ हा चित्रपट त्या काळात जरी फ्लॉप झाला असला तरी आज एक कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जातो आणि रिपीट रनला या चित्रपटाला चांगला ऑडियन्स मिळाला.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress arpan Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Entertainment Featured himmatwala j om prakash Jeetendra
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.