‘वामा लढाई सन्मानाची’ चित्रपटातील Kailas Kher यांच्या आवाजातील टायटल साँग

Operation Sindoor : २००४ मधील ‘या’ चित्रपटाने काश्मिरव्याप्त पाकबदद्ल भारताच्या तीव्र भावना मांडल्या!
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) ७ मे २०२५ रोजी पुर्ण करुन ९ दहशतवादी कॅम्प्सना नेस्तनाभूत केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या भारत-पाकिस्तान तणावामुळे पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असता भारताने काश्मिरव्याप्त पाकिस्तानला चोख उत्तर दिलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का २००४ मध्ये एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्यात भारताच्या काश्मिरव्याप्त पाकिस्तानबद्दल काय तीव्र भावना आहेत? किंवा युद्धादरम्यान सैनिकांची काय मनस्थिती असते याचं अगदी तंतोतंत चित्रिकरण या चित्रपटात करण्यात आलं होतं. कोणता होता तो चित्रपट जाणून घेऊयात… (Bollywood patriotic movies)

तर, २००४ मध्ये फरहान अख्तर दिग्दर्शित ‘लक्ष्य’ (Lakshya) या चित्रपटात १९९९ मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या कारगिल युद्धावर (Kargil War) चित्रपटाचं कथानक आधारित आहे. चित्रपटात एका अशा मुलाची कथा दाखवण्यात आली आहे जो आपल्या करिअरबाबतीत फार संभ्रमित आहे.आयुष्यात नेमकं करायचं काय? हा प्रश्न त्याला सतत पडत असतो. काही काळानंतर तो सैन्यात भरती होण्याचं ठरवतो आणि अनेक अडचणींचा सामना करत सैन्यात भरती होऊन देशसेवा करतो.चित्रपटात ह्रतिक रोशनने (Hrithik Roshan) लेफ्टनंट करण शेरगिल ही भूमिका केली आहे. तसेच, चित्रपटात ओम पुरी, अमिताभ बच्चन, प्रिती झिंटा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.(Bollywood movies)

खरं तर ‘लक्ष्य’ हा चित्रपट सध्या देशात असणाऱ्या परिस्थितीशी फार मेळ खाणारा आहे. शिवाय, चित्रपटातील प्रत्येक सीन्स संवाद आजही प्रेक्षक रिलेट करु शकत आहेत. चित्रपटात मध्यांतरानंतरच्या कथानकात एक सीन असा आहे जिथे भारतीय सैन्य पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना पाहतो. त्यावेळी ओम पुरी ह्रतिकला विचारतात की, “युद्ध वाईट आहे हे सैनिकांपेक्षा अजून कुणाला चांगलं माहित असणार?”, त्यांना उत्तर देताना भावूक डोळ्यांनी ह्रतिक म्हणतो की,”देवाने एकच पृथ्वी तयार केली होती पण माणसांनी त्यावर लोह आणि बारुद यांनी एक रेष ओढली. हे तुझं आणि ते माझं. मी खरंच मनापासून आभार मानतो की चंद्र अवकाशात आहे; नाहीतर पृथ्वीवर जर का चंद्र असता तर त्याचीही फाळणी लोकांनी केली असती”. (Lakshya Movie)
===============================
हे देखील वाचा: Mahesh Bhatt : परवीन आत्महत्या करण्याच्या मार्गावर होती आणि….
===============================
दरम्यान, ‘लक्ष्य’ चित्रपटाचे संवाद जावेद अख्तर यांनी लिहिले होते आणि फरहान अख्तरने चित्रपट दिग्दर्शित केला होता.’लक्ष्य’ चित्रपटाव्यतिरिक्त आजवर अनेक देशभक्तीपर चित्रपट आले खरे पण ‘बॉर्डर’, ‘ऊरी :द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटांनी अधिक सखोलपणे भारतीय सैन्य कशापद्धतीने काम करतं याचं सादरीकरण केलं होतं.(Entertainment news)