Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jarann Marathi Movie Teaser: ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’; ‘जारण’ चा

‘Hera Pheri 3 ‘मधून बाहेर पडले Paresh Rawal; निर्मात्यांसोबत झालेल्या

लग्नाआधी फिजिकल रिलेशन योग्य की अयोग्य? Aishwarya Rai ने दिलेल्या उत्तराने सगळे झाले

April May 99 Movie: ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे

Amir Khan : ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल

Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय

Ott Relelease May 2025 :या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ क्लासिक चित्रपटाचे जनक!

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी

Dhadkan : चित्रपटाचा क्लायमॅक्स दु:खी असणार होता पण… ५ वर्ष

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

एकात्मकतेचं सांगीतिक प्रतिक

 एकात्मकतेचं सांगीतिक प्रतिक
कलाकृती तडका बात पुरानी बडी सुहानी

एकात्मकतेचं सांगीतिक प्रतिक

by धनंजय कुलकर्णी 15/08/2020

राष्ट्रगीतानंतर ज्या गीताला अफाट लोकप्रियता लाभली ते गीत म्हणजे ’मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा’.१५ ऑगष्ट १९८८ रोजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण व भाषण केल्यावर लगेचच याचे याचे प्रक्षेपण पहिल्यांदा दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून करण्यात आले आणि तमाम भारतीयांनी त्याचे उत्साहात स्वागत केले.

लोक सेवा संचार परिषद द्वारा निर्मित या गीताच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा होता संगीतकार अशोक पत्की यांचा! या गीताच्या निर्मितीची कथा त्यांनी आपल्या पुस्तकातून अतिशय सुरेलप्रमाणे मांडली आहे.पत्की जिंगल्स चे बादशहा आहेत.या गीताच्या सुरूवातीच्या दोनच ओळी त्यांच्याकडे आल्या.पत्कींच्या हातात कागद आला की दुसर्‍या क्षणापासून त्यांच्या मनात चाल सुचायला सुरूवात होते.

Photo Credit : Google

या दोन ओळींना त्यांनी पहिली चाल यमन रागात दुसरी भीमपलास मध्ये आणि तिसरी भैरवी मध्ये चाल लावली.या तिन्ही चाली त्यांनी टिम मधील सर्वांना ऐकवल्या.भैरवीची चाल सर्वांना आवडली.या ओळींच्या पुढे बारा-तेरा भाषातल्या स्क्रिप्ट मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत या गीताचा प्रवास होणार होता.सुरूवातीच्या ओळी पंडीत भीमसेन जोशी गाणार होते.

ध्वनीमुद्रणाच्या वेळी या ओळींकरीता दिलेल्या ४५ सेंकदात काही केल्या गणित जमत नव्हतं.गायला सुरूवात करा म्हटल्यावर पत्की पंडीतजींना खूण करायचे पंडीतजी तंबोरा वाजविणार्‍यांना खूण करायचे यामुळे वेळ वाढत होता.पंडीतजींचही बरोबर होतं सूर मिळाल्याशिवाय ते गाणार कसे? शेवटी पत्की रेकॉर्डीस्ट सूद यांना म्हणाले ” त्यांना त्यांच्या पध्दतीने गाऊ दे आपण एडीट नंतर करूया .” ही मात्रा लागू पडली.पंडितजींचा भारदस्त आवाज, सुंदर चाल, नाना मुळेंचा तबला.. सगळं जमून आलं होतं.

Photo Credit : Google

त्यानंतर काश्मिरी भाषेचा सुपरवायझर आला. तोच लेखक आणि तोच गाणार होता. प्रोडय़ूसर मलिकचा एकच आग्रह होता- ‘मीटर बदललं तरी चालेल, पण ऐकताना ‘मिले सूर’ची ओरिजिनल सुरावट ऐकतोय असं वाटायला हवं.’ या वेळी एक अडचण आली कश्मीरी भाषेच्या रेकॉडींगच्या वेळी नेमकं संतूर हे वाद्य नव्हतं.साइड र्‍हिदम-प्लेअर दीपक बोरकर यांच्याकडील हार्पवरच संतूरचा इफेक्ट मिळविला!

कविता कृष्णमूर्ती व पंकज मित्रा यांच्या आवाजातलं बंगालीतला पोर्शन केला.प्रत्येक भाषेसाठी ठराविक सेकंद मिळाले होते त्यात ते संपवण गरजेचं होतं.भारतातील विविध प्रांताच्या संस्कृतीचा फील तिथे येणं आवश्यक असल्याने अशोक पत्की विशेष मेहनत घेत होते.तामीळ, तेलगू, मल्याळम्, कन्नड भाषांतील गाण्यांसाठी आणि सुपरव्हायजर म्हणून ती- ती माणसं हजरच होती.
रघू व कुरुविला अशी दोन गायक मंडळी व एम. पी. शर्मा, नानप्पन व बाकी भाषेवर प्रभुत्व असणारी मंडळी तिथे उपस्थित होती.या गीताची सुरूवात भीमसेनजींच्या स्वरात झाली असल्याने शेवट देखील(सूर की नदीया…) तितकाच शाही स्वरात होण्यासाठी सूरश्री लता मंगेशकर यांच्याशी संपर्क साधला.

लता दिदी नेमक्या त्याचवेळी परदेशात असल्याने कविता कृष्णमूर्तीच्या स्वरात रेकॉर्ड केलं गेलं.कारण या गीताच्या व्हीडीओ चित्रीकरणाच्या तारखा ठरल्या होत्या.काही दिवसांनी लताने त्या गीताचे डबींग केले.त्याच दिवशी दीदींचं शूटिंगही वेस्टर्न आऊटडोअरमध्ये होतं.लुईस बॅंक्स यांनी हे सारे सूरांचे तुकडे एकत्र गुंफले.हा राष्ट्रीय एकात्मतेचा  व्हीडिओ फार सुंदर बनला होता.आज तीस  वर्षाचा कालावधी उलटला तरी या गीताची खुमारी काही कमी होत नाही

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: 15 august independence day india mile sur mera music
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.