
Paresh Rawal : ‘हेरा फेरी ३’, बाबूराव पात्र आणि…!
‘हेरा फेरी’ (Hera Pheri) म्हणजे आयकॉनिक चित्रपट. हा चित्रपट म्हणजे शब्दांमध्ये व्यक्त न करता येणारं इमोशन आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती नक्कीच वाटणार नाही. चित्रपटातील प्रत्येक संवाद आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेच पण त्यातील बाबूराव, राजू आणि श्याम ही तीन पात्र अजरामर झाली आहेत. ४५ वर्षांपेक्षा अधिक काळ विविध भूमिका जरी अभिनेते परेश रावल यांनी साकारल्या असल्या तरीही आज बाबूराव ही त्यांना एक ओळख मिळाली आहे. मात्र, आता परेश रावल यांना या भूमिकेतून मुक्ती हवी असून तो चित्रपट गळ्यातील फास होता असं त्यांनी म्हटलं आहे. परेश रावल नेमकं काय म्हणाले? वाचा… (Bollywood iconic movie)
परेश रावल यांनी The Lallantop ला दिलेल्या मुलाखतीमध्ये वौ गले का फंदा है असं म्हटलं आहे. परेश म्हणाले की, “२००७ मध्ये विशाल भारद्वाजकडे मी गेलो होतो. त्यापूर्वी फिर हेरा फेरी प्रदर्शित झाला होता. तर मी दिग्दर्शकाला म्हणालो की मला बाबूराव या पात्रातून आता बाहेर यायचं असून हटके पात्र करण्याची इच्छा आहे. यावर मला त्यांनी विचारलं की का तुम्हाला वेगळं पात्र का हवं आहे. त्यावर मी त्यांना उत्तर दिलं की, मी एक अभिनेता आहे. आणि मला या दलदलीत फसायचं नाही आहे. पण मला भारद्वाज काहीच मदत करु न शकल्यामुळे मी २०२२ मध्ये आर बाल्की यांच्याकडे गेलो आणि नवा प्रवास सुरु झाला”. (Paresh Rawal interview)

दरम्यान, एकीकडे परेश रावल यांनी हेरा फेरी मधील बाबूराव आपटे पात्राबद्दल आपलं मत व्यक्त केलं असलं तरी ‘हेरा फेरी ३’ साठी परेश रावल, अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सुनील शेट्टी (Suneil Shetty) ही तिघडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. महत्वाचं म्हणजे प्रियदर्शनच तिसऱ्या भागाचं दिग्दर्शन करणार असून नक्कीच प्रेक्षक पुन्हा लोट पोट हसणार यात शंकाच नाही. (Hera Pheri 3 Update)
============
हे देखील वाचा : Hera Pheri 3: राजू, श्याम आणि बाबू भैया पुन्हा ‘हेरा फेरी’ करायला सज्ज!
============
पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार, जिथे ‘फिर हेरा फेरी’ची गोष्ट संपली होती, तिथूनच ‘हेरा फेरी ३’ ची कथा सुरू होईल असे सांगण्यात येत आहे. शिवाय यावेळी संजय दत्तही चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असं सांगण्यात आलं आहे. (Sanjay Dutt)