ना Priyanka Chopra ना Deepika Padukone तर ‘या’ अभिनेत्रीकडे आहे

Prem Parbat : सिनेमाच्या सर्व प्रिंटस खरंच जळून नष्ट झाल्या कां?
आपण सिनेमाचा इतिहास जतन करण्याबाबत फारच बेफिकीर असतो. सत्तर च्या दशकातील एका सिनेमाबाबात समाज माध्यमात उलट सुलट वाचायला मिळते. त्याची सत्यता तपासणे गरजेचे असते. खरोखरच या सिनेमाच्या प्रिंट्स जळून खाक झाल्या होत्या कां? (Bollywood classic movies)

हिंदी सिनेमाच्या इतिहासात असे अनेक चित्रपट आहेत जे पूर्ण तर झाले पण प्रदर्शित होऊ शकले नाहीत तर काही सिनेमे अर्धवट बनून तसेच राहिले. काही सिनेमे मुहूर्तानंतर एकही रील शूट न होता बंद झाले. तर काही सिनेमांच्या एक-दोन रील्स बनले पण नंतर पैसा किंवा अन्य अडचणी मुळे हे सिनेमे बंद पडले आणि कायम स्वरूपी डब्यात गेले. (Untold stories of indian cinema)
१९८३ साली फिल्म ही फिल्म या नावाचा एक सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अशा अर्धवट सिनेमांचा आढावा घेतला होता. पण असं म्हणतात एक सिनेमा असा होता जो पूर्ण तर झाला होता पण प्रदर्शनापूर्वीच तो नष्ट झाला. आज या सिनेमाची फक्त चार ऑडिओ गाणी उपलब्ध आहेत. यातील एक गाणे लता मंगेशकर यांच्या टॉप टेन गाण्यांपैकी एक आहे. नेमका काय झाला होता हा प्रकार? कोणते होते ते गाणे? आणि कोणता होता तो नष्ट झालेला चित्रपट? (Entertainment)
============
हे देखील वाचा : Kishore Kumar : किशोर कुमार ‘हे’ गाणं गातांना का नर्व्हस होते !
============
सत्तरच्या दशकामध्ये दिग्दर्शक वेद राही यांनी ‘प्रेम पर्बत’ नावाचा एक चित्रपट सुरू केला होता. या चित्रपटामध्ये सतीश कौल, रेहाना सुलतान, नाना पळशीकर, आगा हे कलाकार होते. या चित्रपटाची गाणी जां निस्सार अख्तर आणि पद्मा सचदेवा यांनी लिहिली होती. तर चित्रपटाला संगीत जयदेव यांचे होते. जयदेव यांनी अतिशय तब्येतीने या चित्रपटाला संगीत दिले होते. या चित्रपटाचे निर्माते शांती सागर होते. हा चित्रपट पूर्णपणे काश्मीर आणि हिमालय प्रदेश भागात शूट केला गेला चित्रपट अतिशय सुंदर बनला होता. अभिनेता सतीश कौल यांचा हा पहिलाच चित्रपट होता. हा चित्रपट पूर्ण झाला आणि ज्या गोडाऊनमध्ये याच्या सर्व कॉपीच ठेवल्या होत्या त्या गोडाऊन आग लागली आणि सिनेमाच्या सर्व प्रिंट्स जळून खाक झाल्या.

त्या काळात बॅकअप कॉपी नावाचा काहीच प्रकार नव्हता त्यामुळे या सिनेमाच अक्षरशः कोळसा झाला. या सिनेमाची फक्त चार ऑडिओ गाणी मात्र उपलब्ध आहेत ते देखील आकाशवाणीच्या सौजन्याने कारण या सिनेमाची चार गाणी आकाशवाणीकडे दिले होते आणि त्यांच्याकडे ती सुरक्षित राहिली नंतर या गाण्यांवरून या सिनेमाच्या रेकॉर्ड्स आल्या चित्रपट मात्र कोणालाच पाहता आला नाही. निर्मात्याचे बजेट कमी असल्यामुळे पुन्हा री शूट करणे शक्य नव्हते. आज युट्युब वर आपण यातील गाणी ऑडिओ स्वरूपात पाहू शकतो. यातील ‘ये दिल और उनकी निगाहों के साये…’ हे गाणं युट्युब वर व्हिडिओ स्वरूपात आहे; परंतु ते चुकीचे आहे.
कुणी तरी ‘मधुमती’ च्या आजा रे परदेसी… या गाण्याला म्युट करून तिथे हे गाणे डब केले आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना ‘प्रेम पर्वत’ चित्रपटात दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला आहेत की काय असे वाटते. हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय झालं होतं. बिनाका गीतमाला मध्ये या गाण्याला पाचवा क्रमांक मिळाला होता. सिनेमाच्या प्रिंट जाळून खाक झाल्या हि एक सोशल मिडीया वरील थिअरी आहे.
============
हे देखील वाचा : vinod khanna : आणि इम्रान खान यांच्या सिंथॉल साबणाच्या या जाहिराती आठवतात का?
============
ख्यातनाम चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर यांच्या मते,” हा सिनेमा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला होता. मुंबईच्या इम्पिरियल थिएटर मध्ये रिलीज झाला होता. तिथून तो एका आठवड्यातच रॉक्सी मध्ये मॅटीनी शो मध्ये शिफ्ट झाला. प्रिंट जाळून खाक झाल्याची बातमी कुठून आली ते कळत नाही!” पण आज गुगल वर या सिनेमाच्या प्रिंट जाळून खाक झाल्या असेच वाचायला मिळते. चित्रपटाची प्रिंट जर खरच नष्ट झाली असेल तर हा चित्रपट पुन्हा एकदा रिशूट व्हायला होता किमान यातली गाणी तरी शूट करून टाकायला हवी होती कारण सत्तर दशकात ‘किस्सा कुर्सी का’ हा चित्रपट असाच पुन्हा एकदा री शूट करून प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे गूढ काही कमी होता नाही . वाचकांपैकी कुणाकडे अधिकची माहिती असेल तर नक्की शेअर करा.