Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Gharoghari Matichya Chuli Serial: पात्र एक, रुपं अनेक…घरोघरी मातीच्या चुली मालिकेत

टॉम क्रुझच्या Mission Impossible : The Final Reckoning चित्रपटाची भारतात

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

सिनेमा रिलीजची वाट पाहण्याचा अनोखा खेळ

 सिनेमा रिलीजची वाट पाहण्याचा अनोखा खेळ
करंट बुकिंग

सिनेमा रिलीजची वाट पाहण्याचा अनोखा खेळ

by दिलीप ठाकूर 12/04/2021

इंतजार का फल मिठा होता है. अशी हिंदी म्हण चित्रपटाला कधी फळलीय तर कधी मारकही ठरली. कभी हा कभी ना व्हायचचं. भारतीय चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील सर्वोत्कृष्ट दहा चित्रपटातील एक म्हणून गौरवण्यात येत असलेल्या के. असिफ दिग्दर्शित ‘मुगल ए आझम’ (रिलीज ऑगस्ट १९६०) या चित्रपटाचा सर्वाधिक काळ वाट पहावी लागलेला चित्रपट म्हणून नेहमीच उल्लेख होतो. मूळ कलाकारांच्या जागी पृथ्वीराज कपूर, दिलीपकुमार आणि मधुबाला यांची निवड झाली आणि भव्य सेटसाठी छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष अशा विविध स्तरांवर अतिशय खोलवर लक्ष, मेहनतीची तयारी, वाढीव खर्च यातून एका दशकापेक्षा जास्त वेळ घेत घेत एक अजरामर ऐतिहासिक कलाकृती पडद्यावर आणली. (पडद्याभर ते दिसतेय. ‘मुगल ए आझम’ कितीही वेळा पाहिला तरी तोच कलात्मक अनुभव येतो.)

पिक्चर दिल से बनती है, पैसे से नही अशी उत्कट भावना असल्याचा तो काळ होता. त्या काळातील अनेक चित्रपट रसिकांचे तर सिनेमाच्या मुहूर्तापासूनच “हा चित्रपट कधी बरे रिलीज होतोय नि आपण पाहतोय” हे जणू ब्रीदवाक्य असे. आजच्या ग्लोबल रसिकांना रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ (सेन्सॉर २०२०) कधी बरे रिलीज होतोय नि आपण पाहतोय असं झालयं. ‘हे वाट पाहणे’ नेमके कशामुळे आहे याचे वेगळे कारण तुम्हाला सांगायची गरज नाही. सध्याची एकूणच सामाजिक, आरोग्य आणि सांस्कृतिक स्थिती पाहता आणखीन किती महिने ‘सूर्यवंशी’ आपल्यापासून असा दूर राहणार याचे उत्तर फिल्मी ज्योतिषाकडेही नसेल. ओटीटी प्लॅटफॉर्म हा चित्रपट रिलीजचा चांगला पर्याय आहे, अर्थात चित्रपटाचा निर्मिती खर्च आणि अपेक्षित आर्थिक यश यातून तो निर्णय घेतला जातो. त्यातील ‘आकड्याचे सत्य’ निर्मितीवर खर्च करणारे आणि आर्थिक यश मिळवणारेच जाणोत अन्यथा फक्त प्रेस रिलीज.

एखाद्या चित्रपटाची अशी वाट पाहणे ही दोन भिन्न काळातील आणि तशीच भिन्न स्वरुपाची उदाहरणे आहेत.

 Amitabh Bachchan And Shatrughan Sinha
Amitabh Bachchan And Shatrughan Sinha

असे इतरही काही चित्रपटांबाबत काही ना काही कारणास्तव घडतच असते. अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा या जोडीचा १९७२ साली सेटवर गेलेला चित्रपट चक्क २००८ साली पडद्यावर आला याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल. माझ्यासारखा अमिताभ भक्त त्याच्या अशा रखडून पडद्यावर आलेल्या आणि अगदी न आलेल्या चित्रपटांची खबर ठेवत असतोच. (रुद्र, शिनाख्त वगैरे वगैरे) पण हा चित्रपट इतका काळ निर्मितीवस्थेत का राहिला? काही  चित्रपटांच्या निर्मितीच्या गोष्टीत अनेक खाचखळगे असतात. चित्रपटसृष्टीच्या भटकंती, लहान मोठ्या भेटीगाठी आणि निरीक्षण यातून मला अशा अनेक गोष्टी माहित झाल्या. नव्वदच्या दशकात असेच एकदा एका शूटिंग रिपोर्टीगसाठी आमंत्रण आले. ‘यार मेरी जिंदगी’चे इर्लाच्या चिरंजीव बंगल्यात शूटिंग आहे (हा बंगला कालांतराने पाडला). या चित्रपटात अमिताभ, शत्रूघ्न सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका आहेत हे माहित होते, पण हा चित्रपट केव्हापासून तरी बनतोय आणि आता बहुतेक तो पूर्ण होईल असे वाटले. प्रत्यक्षात सेटवर गेल्यावर लक्षात आले की, आता मूळ दिग्दर्शक मुकुल दत्त नव्हे तर अशोक गुप्ता करीत आहे आणि आजच्या शूटिंगमध्ये सुधाचंद्रन वगैरे स्टार आहेत.

हा चित्रपट १९७२ साली सेटवर गेला तेव्हा अमिताभचा सुरुवातीचा ‘पडता काळ’ सुरु होता, शत्रूघ्न सिन्हा लहान मोठ्या भूमिका साकारत आपला जम बसवत होता (हीदेखिल एक व्यावसायिक गरज असते हो). ‘जंजीर’ (१९७३) च्या खणखणीत यशाने अमिताभला ‘ॲन्ग्री यंग मॅन’ची इमेज चिकटली, तो स्टार झाला आणी इतर अनेक चित्रपटात बिझी होत गेला. शत्रूघ्न सिन्हादेखिल व्हीलन म्हणून लोकप्रिय झाला, मग हीरोगिरीकडे वळला. अशा पध्दतीने करियर पुढे जात असतानाच अनेक स्टार्सचे काही चित्रपट मागे मागे पडत जातात. आणि अशा चित्रपटांना सतत टाळण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे, आपली डायरी पुढची दोन वर्षे तरी फुल्ल आहे, तारखाच नाहीत असे कारण पुढे ठेवणे. अशा पध्दतीने अनेक चित्रपट कायमचे डब्यात जातात. तर एखादा निर्माता अजिबात हार मानत नाही. तो मूळ पटकथेत फेरफार करीत करीत इतर कलाकारांना घेत घेत एकदाचा तो चित्रपट पडद्यावर आणतो. आता २००८ साली रिलीज झालेल्या चित्रपटात १९७२ चे अमिताभ व शत्रूघ्न सिन्हा कसे दिसले असतील आणि त्यांची किती दृश्ये होती हा विषयच वेगळा. अशोक गुप्ताने निर्मिती आणि दिग्दर्शन करीत हा चित्रपट पडद्यावर पोहचवला यासाठी त्याचे कौतुक हवे. बीग बीच्या निस्सीम फॅन्सना ही गोष्ट माहीत असेलच.

एखाद्या चित्रपटाला रिलीज व्हायला उशीर होण्याच्या गोष्टीतही अनेक रंग आहेत. आणि हीच तर सिनेमाच्या जगाची अनोखी रित आहे.

Bairaag (1976)
Bairaag (1976)

दिलीपकुमारची तिहेरी भूमिका असलेल्या आणि सायरा बानू व लीना चंदावरकर अशा दोन नायिका असलेल्या असित सेन दिग्दर्शित ‘बैराग’ (१९७६) चे रिलीज होणे रिशूटींगने लांबले होते. दिलीपकुमार दिग्दर्शकांच्या कामात ढवळाढवळ करतो हे त्या काळातील सर्वात खमंग गाॅसिप्स. आणि त्यासाठी दिग्दर्शक राम मुखर्जींचा ‘लीडर’ (१९६४), दिग्दर्शक के. आर. कारदारचा ‘दिल दिया दर्द लिया’ (१९६६), दिग्दर्शक ए. भीमसिंगचा ‘आदमी’ (१९६८), दिग्दर्शक एच. एस. रवैलचा ‘संघर्ष’ (१९६८), दिग्दर्शक बी. आर. चोप्रांचा ‘दास्तान’ (१९७२) या चित्रपटाच्या फ्लाॅप्सचे उदाहरण दिले जाई. दिलीपकुमारच्या अनावश्यक हस्तक्षेप, सल्ले, सूचना यामुळे हे चित्रपट फसल्याचे त्या काळात रकानेच्या रकाने लिहिले जाई. आणि याच कारणामुळे  ‘बैराग’ पूर्ण व्हायला उशीर होतोय हे जणू अधोरेखित होत होते. पण हे उशीर होणे हे चक्क ‘बैराग’च्या पथ्यावर पडले. यातील गाणी तोपर्यंत लोकप्रिय तर झाली, पण ‘छोटी सी उमर मे लग गया रोग’ हे गाणे बिनाका गीतमालामध्ये एकदा सोळा वेळा वाजल्यानंतर पुन्हा एकदा काही बुधवारनंतर आले. सारे शहर मे आपसा कोई नही, पीते पीते कभी कभी जाम बदल जाते है (गीतकार आनंद बक्षी, संगीत कल्याणजी आनंदजी) ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्या काळात अनेक चित्रपटांची गाणी खूपच अगोदरपासून लोकप्रिय होत आणि त्यामुळे त्या चित्रपटाच्या रिलीजकडे फार लक्ष लागायचे हो. तात्पर्य, रिलीज लांबले तरी हरकत नाही, गाण्यांमुळे चित्रपट रसिकांसमोर राह्यचा. (‘सूर्यवंशी’ची गाणी अशीच लोकप्रिय व्हायला हवी असे सकारात्मक दृष्टिकोनातून वाटते.)

सतीश कौशिक दिग्दर्शित चक्क दोन चित्रपट असेच कधी बरे रिलीज होताहेत असे झाले होते, पण ते दोन्ही चित्रपट पडद्यावर आले तेच पडले. ते चित्रपट होते, बोनी कपूर निर्मित ‘रुप की रानी चोरो का राजा’ (१९९३) आणि ‘प्रेम’ (१९९५). यातील रुप की रानी….चे दिग्दर्शन शेखर कपूरने मध्येच सोडल्यावर सतिश कौशिकचा दिग्दर्शक म्हणून जन्म झाला. आता चित्रपटाचे दिग्दर्शन म्हणजे मूळ कथा, त्यावर पटकथा, संवाद आणि मग शूटिंगसाठी पटकथा असा बराच मोठा प्रवास सुरु असतो आणि सिनेमाचे शूटिंग हे वेगवेगळ्या शेड्युलप्रमाणे होते. मूळ दिग्दर्शकाचे व्हीजन दुसरा दिग्दर्शक सहजपणे आत्मसात करु शकत नाही. अशातूनच रिशूटींगने लांबले आणि रुप की रानी…. पडद्यावर येणेही लांबले. त्या काळात एक विनोद सांगितला जाई, काही सांगता येत नाही हो, फस्ट डे फर्स्ट शोपर्यंत रुप की रानीचे रिशूटींग होईल. अनिल कपूर आणि श्रीदेवीची भूमिका असलेला हा भव्य चित्रपट रसिकांनी नाकारला.

Roop Ki Rani choron Ka Raja
Roop Ki Rani choron Ka Raja

‘प्रेम’मधून बोनी कपूर आणि अनिल कपूरचा भाऊ संजय कपूरने रुपेरी पदार्पण केले. सतिश कौशिकने पुनर्जन्माच्या पटकथेवर काम सुरु केले आणि नायिका म्हणून तब्बूची निवड केली. (तत्पूर्वी, तब्बूने देव आनंद दिग्दर्शित ‘हम नौजवान’ मध्ये काॅलेज युवती साकारली होती. साल १९८६). आता नायिका म्हणून तब्बूने नवीन चित्रपट स्वीकारायला सुरुवात केली आणि ‘पहला पहला प्यार’ , ‘विजयपथ’ चित्रपट रिलीजही झाले आणि ‘रुक रुक गर्ल’ इमेज एस्टॅब्लिश झाली. तरी ‘प्रेम’ पूर्ण होऊन पडद्यावर येतच होता. हा इतका आणि असा उशीर होत गेला की, संजय कपूरला वरिष्ठ नवीन चेहरा असे थट्टेने म्हटले गेले.

काही चित्रपटांच्या नशिबी हे असे ‘कधी बरे रिलीज होणे, हे त्यांच्या नशिबी नसते’. कधी ते ‘एकदाचे पूर्ण होऊन पडद्यावर येऊन सुपर हिट होणे’ही असते (रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘सागर’च्या बाबतीत तेच झाले. रमेश सिप्पीने प्रत्येक दृश्यावर अधिकाधिक मेहनत घेतली. विशेषतः गाण्यावर त्याने घेतलेली मेहनत खुप कौतुकाची झाली) तर एखाद्या चित्रपटाच्या नशिबी ‘पडणे’ असते (ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘नौकरी’ चित्रपटाचे तेच झाले. राज कपूर आणि राजेश खन्ना त्यात एकत्र आल्याचा योग आला होता.) आपली चित्रपटसृष्टी अशाच अनेक लहान मोठ्या उलटसुलट गोष्टीनी खचाखच भरलीय, रंगलीय. अहो, सगळ्याच गोष्टी सारख्याच असतील तर ते सिनेमाचे जग कसले?

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood movie bollywood update Celebrity Talks Entertainment Talkies
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.