Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Samana Movie : भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक ‘सामना’ची ५० वर्ष पूर्ण!

 Samana Movie : भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक ‘सामना’ची ५० वर्ष पूर्ण!
कलाकृती विशेष

Samana Movie : भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक ‘सामना’ची ५० वर्ष पूर्ण!

by रसिका शिंदे-पॉल 29/05/2025

‘मारुती कांबळेचं काय झालं?’ आजही ५० वर्षांनी ‘सामना’ (Samana Movie) चित्रपटातील मारुती कांबळेबद्दल प्रश्न पडतोच… खरचं विजय तेंडूलकर यांच्या सामाजिक आणि राजकीय विषयांच्या सखोल अभ्यासातून ‘सामना’ चित्रपटाची कथा लिहिली गेली.. विशेष म्हणजे रंगभूमीवर दिग्दर्शक म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या नवख्या चित्रपट दिग्दर्शकावर विश्वास ठेवून तेंडूलकरांनी (Vijay Tendulkar) ‘सामना’ सारखा अतिशय संवेदनशील चित्रपट डॉ. जब्बार पटेल (Dr Jabbar Patel) यांच्या हाती सुपूर्द केला. १९७५ साली प्रदर्शित झालेल्या मराठीच काय भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील ‘सामना’ या चित्रपटाला या वर्षी ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने ‘सामना’ चित्रपटाचे काही रंजक किस्से नक्की वाचा…(Samana movie)

जब्बार पटेल यांच्यापर्यंत सामना पोहोचला कसा?

तर, मुळात डॉ. जब्बार पटेल यांचं ‘घाशीराम कोतवाल’ नाटक सुरु होतं आणि डॉक्टरकीची प्रॅक्टिस करत असतानाही नाटकाच्या प्रयोगासाठी ते पुण्यात जात होते. एकेदिवशी निर्माते रामदास फुटाणे जब्बार यांना भेटले आणि त्यांच्यासमोर ‘सामना’ची पटकथा ठेवली. आणि ते म्हणाले ती आपल्याला हा चित्रपट करायचा आहे. मात्र, जब्बार यांना अजूनही चित्रपटाचं तंत्रज्ञान उमगलं नसल्यामुळे थेट विजय तेंडूलकरांचं लिखाण मोठ्या पडद्यावर चित्रपटरुपात मांडायचं म्हणजे फार जोखमीचं काम होतं. मात्र, तेंडूलकरांसारखा प्रगल्भ लेखक आणि रामदास माझ्यासारख्या अतिशय नवख्या माणसासमोर असा प्रस्ताव ठेवतोय हे पाहून जब्बार यांनी ‘सामना’ चित्रपटाची कथा स्वीकारली. महत्वाचं म्हणजे विजय तेंडूलकर यांनी सामनातील दोन प्रमुख व्यक्तिरेखा आधीच ठरवल्या होत्या. त्यातील सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन म्हणजे हिंदुराव (निळु फुले) (Nilu Phule) मास्तर (डॉ.श्रीराम लागू) (Dr Shreeram lagoo) यांना डोळ्यांसमोर ठेवूनच कथा लिहिली होती. तेंडुलकरांनी या सिनेमाचं नाव ‘सावलीला भिऊ नकोस’ असं लिहिलं होतं. मात्र, हे नाटकाचं शीर्षक वाटत होतं. अनेकांना ते पटलं नव्हतं. तेंडुलकरांना मग ते बदलण्याची विनंती केली. नंतर आठ-दहा दिवसांनी त्यांनीच ‘सामना’ हे शीर्षक ठेवलं. (Bollywood news tadaka)

‘सामना’च्या शुटींगचा पहिला कॅमेरा टेक लता दीदींनी दिला होता?

‘सामना’ चित्रपटाचं कथानक फायनल झालं आणि अखेर चित्रपटाच्या शुटींगसाठी लोकशन शोधण्याचं काम सुरु झालं. आता कारखान्याच्या चेअरमनबद्दल कथा असल्यामुळे खरा कारखानाच दाखवला तर कथेला न्याय मिळू शकेल असा विचार करुन अखेर कोल्हापूर परिसरातील सहकारी कारखान्यांची निवड करण्यात आली. बऱ्याच साखर कारखान्यांनी परवानगी नाकारली होती. पण कष्टानं आणि विनवण्याकेल्यानंतर शेवटी वारणानगरला तात्यासाहेब कोरेंकडे गेलो. तिथे आदरातिथ्य झालं आणि मोकळ्या मनाने परवानगी मिळाली. पुढे काही भाग राहुरीला बाबूराव तनपुरेंच्या कारखान्यावर शूट केला. आणि गावच्या काही शुटींगसाठी भालजी पेंढारकर यांच्या जयप्रभा स्टुडिओची निवड केली. तिथे भालजींसोबत जब्बार पटेल यांना लता मंगेशकर (Lata Mangeshkar) भेटल्या. आणि त्यांच्या सांगण्यावरुन लता मंगेशकर यांनी जब्बार पटेल यांच्या ‘सामना’ या पहिल्या चित्रपटाचा मुहुर्ताचा पहिला शॉट टेक केला. हे कदाचित फार कुणाला माहित नसेल.इतकंच नाही तर सामना चित्रपटात नंतर समाविष्ट करुन घेतलेलं  लोकप्रिय गाणं ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ या गाण्यासाठी लता दीदींनी मानधन न घेता केवळ एक गुलाबाचं फुल घेतलं होतं. (Lata Mangeshkar and samana movie)

भारतीय चित्रपटसृष्टीत ‘सामना’ हा चित्रपट बऱ्याच अर्थांनी ग्रेट ठरतो. सामना येण्यापूर्वी फारसे सामाजिक, राजकीय विषयांवर सखोलपणे भाष्य करणारे चित्रपट येत नव्हते. पौराणिक किंवा कौंटुबिक हलक्या फुलक्या कथांवर चित्रपट येत होते. समाजाबद्दल किंवा समाजातील आर्थिक, सामाजिक, मानसिक विवंचना आणि त्याला राजकीय जोड देणारे विषय हाताळलेच जात नव्हते. मात्र, विजय तेंडूलकर हे काळाच्या पुढील लिखाण करणारे लेखक असल्यामुळे समाजाचा राजकीय आरसा सामनाच्या निमित्ताने कागदावर लिहिला गेला. सामना चित्रपटानंतर बरेच सामाजिक-राजकीय चित्रपट आले. ‘सिंहासन’, ‘मुंबई दिनांक’,’अग्निपुत्र’, ‘वजीर’, ‘सरकारनामा’ असे अनेक सोशिओ-पॉलिटिकल चित्रपट आले. याशिवाय, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, स्निता पाटील, मोहन आगाशे या दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाचा नवा पायंडा याच ऐतिहासिक सामना चित्रपटातून घातला होता. (Samana movie cast)

‘सामना’ची बर्लिनवारी

‘सामना’ चित्रपटाचे निर्माते रामदास फुटाणे यांनी एका मुलाखतीत सामनाची बर्लिनवारी कशी झाली होती याबद्दल आठवण सांगितली होती. ‘सामना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर खरं तर तो पुणे आणि मुंबईतील काही भाग वगळता अक्षरश: फ्लॉप झाला होता. काही लोकांकडून अशा प्रतिक्रिया आल्या होत्या की, चित्रपटादरम्यान डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांची दृश्ये सुरू असताना लोकं झोपतात. चित्रपटाची ही परिस्थिती असतानाच अचानक सामनाची बर्लिनच्या चित्रपट महोत्सवासाठी निवड झाल्याची बातमी रेडिओद्वारे चित्रपटाच्या टीमपर्यंत आली आणि त्यानंतर डॉ. श्रीराम लागू यांच्या प्रयत्नामुळे सामनाची टीम बर्लिनला जाऊ शकली. (Berlin film festival)

================================

हे देखील वाचा: Dada Kondke आणि डॉन हाजी मस्तान यांच्या मैत्रीचे किस्से माहित आहे का?

=================================

अभिमानाची बाब म्हणजे सामनाची निवड पहिल्यांदा बर्लिन फिल्म फेस्टीव्हलमधून भारताकडून झाली होती. चित्रपट निवड समितीवर हिंदी अभिनेत्री नर्गिस (Nargis)  होत्या. सामना पाहिल्यानंतर नर्गिस यांनी डॉ. लागू, निळू फुले, जब्बार पटेल आणि तेंडुलकरांचीही भेट घेतली. बर्लिनमध्ये चित्रपट न्यायचा म्हणजे आणखी पैसे हवेत, आधीच चित्रपटाचं कर्ज फुटाणेंवर होतं. त्यावेळचे सांस्कृतिक मंत्री मधुकर चौधरी यांची भेट घेऊन सिनेमाच्या रिळांच्या बर्लिनवारीचा खर्च ६० हजारांवरुन २७ हजारांवर आणला गेला. त्यासाठीही फुटाणेंना पुन्हा कर्ज घ्यावं लागलं होतंच. नर्गिस आणि सुनील दत्त (Sunil Dutt) या दाम्पत्याने सामना चित्रपटाला फार सहकार्य केलं. बर्लिनमध्ये पुरस्कार जरी मिळाला नसला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर १९७५ मध्ये सामना चित्रपटाने इतिहास रचला याचा आनंद आहेच.(Entertainment)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: berlin film festival Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrities Update in Marathi Celebrity Celebrity News dr jabbar patel dr shreeram lagoo Entertainment Get Latest Marathi Entertainment update marathi entertainment news Mohan Agashe Movies Reviews in Marathi nilu phule samana movie samana movie cast samana movie director Smita Patil
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.