‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या रूपात रंगमंचावर !
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं प्रसिद्ध नाटक ‘संगीत संन्यस्त खड्ग’ आता नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ८ जुलै रोजी संध्याकाळी ६.३० वाजता मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. याबाबत माहिती सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव आणि या नाटकाचे निर्माते रवींद्र माधव साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सावरकर दर्शन प्रतिष्ठान ही संस्था स्व. सुधीर फडके यांनी स्थापन केली असून, स्वा. सावरकरांचे विचार आणि साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. याच उद्देशाने हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आणलं जात आहे. (Savarkars Sangeet Sannyast Khadag)

हे नाटक महाराष्ट्रभर १०० ठिकाणी नेण्याचा मानस असून, तिकीट दर सर्वसामान्यांना परवडतील असे ₹१००, ₹२०० आणि ₹३०० ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे नाटक आजच्या तरुण कलाकारांकडून सादर केलं जाणार आहे. या नाटकाचे सहनिर्माते अनंत पणशीकर, दिग्दर्शक ऋषीकेश जोशी, आणि संगीतकार कौशल इनामदार आहेत.

ऋषीकेश जोशी म्हणाले, “या नाटकात अहिंसेच्या तत्त्वज्ञान आणि राष्ट्रहित यामधील द्वंद्व उलगडलं गेलं आहे. अडीच हजार वर्षांपूर्वीचे विचार आजही तितकेच प्रभावी वाटतात.” नाटकात मयुरा रानडे, ओंकार कुलकर्णी, केतकी चैतन्य, ओमप्रकाश शिंदे आणि ऋषीकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाशयोजना अमोघ फडके, वेशभूषा मयूरा रानडे, नृत्यदिग्दर्शन सोनिया परचुरे, रंगभूषा श्रीकांत देसाई, आणि सूत्रसंचालन दीपक गोडबोले यांनी केलं आहे.(Savarkars Sangeet Sannyast Khadag)
==============================
==============================
८ जुलै १९१० रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात ब्रिटिश जहाजातून उडी मारून इतिहास घडवला होता. त्या दिवशीच या नाटकाचा शुभारंभ ठरवण्यात आला आहे. या नाटकाची मूळ रंगभूमीवरची मांडणी १९३१ मध्ये दीनानाथ मंगेशकर यांनी केली होती. या नाटकातील ‘शतजन्म शोधताना’, ‘मर्मबंधातली ठेव ही’ यांसारखी गाणी त्यांनी गायली आणि अजरामर केली होती. नव्या पिढीला सावरकरांचा ठसा देणारं हे नाटक महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार सावरकर दर्शन प्रतिष्ठानने केला आहे.