Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

“Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar

Gharoghari Matichya Chuli मालिकेत जबरदस्त ट्विस्ट; रणदिवे कुटुंब ऐश्वर्यावर करणार

Rajinikanth : नाहीतर ‘दशावतार’मध्ये दिसले असते रजनीकांत !

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अण्णांचा धमाका!

 अण्णांचा धमाका!
कलाकृती तडका बात पुरानी बडी सुहानी

अण्णांचा धमाका!

by धनंजय कुलकर्णी 24/08/2020

निर्माते दिग्दर्शक एस एम नायडू यांनी १९५४ साली ’मल्लई कल्लन’ हा सिनेमा तमिळ भाषेत त्यांच्या स्वत:च्या स्टुडिओत बनविला. एम जी रामचंद्रन व पी भानुमती अशी जोडी असलेला हा सिनेमा तूफानी लोकप्रिय ठरला.या सिनेमा साठी दोनच सेट वापरले होते.नाय़डू साहेबांच्या डोक्यात एक कल्पना आली सेट तयार आहे कथानक तयार आहे, हिंदी कलाकारांना घेवून याच स्टोरी वर इथेच हिंदी सिनेमा काढला तर? ते झपाट्याने कामाला लागले.मुख्य भूमिकेत दिलीपकुमार व मीना कुमारीला घेतले. सिनेमा संगीत प्रधान होता. दिलीप कुमार नायक असल्याने संगीत नौशाद हे ठरलेलंच होत. नाय़डू नौशाद यांना भेटले व संगीता करीता १ लाख रूपये देण्याचे कबूल केले अट फक्त एकच घातली सिनेमाची सर्व गाणी पुढच्या १५ दिवसात तयार झाली पाहिजे.

नौशाद साहेब एकेका गाण्याला महिना महिना मेहनत घेत असत त्यांना हि अट मान्य होणं शक्यच नव्हत.त्यावर नायडूंनी दुसर्‍या एखाद्या संगीतकारचे नाव सुचवायला त्यांना सांगितले.तो काळ निकोप स्पर्धेचा होता.त्यांनी सी रामचंद्र तथा अण्णा यांच नाव सुचविलं.खुद्द नौशाद यांनी शिफारस केल्याने नायडू तडक अण्णांना भेटले. अण्णांनी होकार दिला पण एक अट घातली.’आपण म्हणता त्या पध्दतीने मी १५ दिवसात तुम्हाला हव्या त्या क्वालीटीची गाणी बनवून देतो फक्त मला नौशाद साहेबांना देत असलेल्या मानधनापेक्षा एक रूपया जास्त मानधन द्या.’ अलबेला,अनारकली सारखे सिनेमे नायकांच्या जोरावर नाही तर संगीतकाराच्या करिष्म्याने चालले हे नायडूंना माहित होतं त्यांनी तात्काळ या सिनेमाच्या संगीता साठी अण्णांना करारबध्द केलं.

मग सुरू झाला अण्णांचा झपाटा.राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेली तब्बल ९ गाणी त्यांनी पुढच्या १५ दिवसात रेकॉर्ड केली.यात लताची ५ गाणी होती.’राधा ना बोले ना बोले ,ना बोले रे’,’जारी जारी ओ कारी बदरीया’,’देखो जी बहार आयी’,’कितनी जवां रात है’ आणि ’कभी खामोश’ यातील ’अपलम चपलम’हे लता-ऊषाचे गाणे तर अफात गाजले.लताच्या बागेश्री रागावर आधारीत .’राधा ना बोले ना बोले ,ना बोले रे’ या गाण्यावर तर अगणित मुलींनी शाळेत असताना आपला पहिला डान्स परफोरमन्स दिला असेल. यातील एका गाण्याने सर्वात भन्नाट बहार आणली.हे युगल गीत होत. दिलीपला या गाण्यासाठी तलतचा स्वर हवा होता.पण तलत नेमका त्या वेळी उपलब्ध नव्हता.नाय़डू साहेबांचे फोन वर फोन सुरू होते.

सगळी गाणी झाली होती फक्त हेच युगल गीत बाकी होत.प्रसंग बाका होता.कुठल्याही परीस्थितीत ते गाणं रेकॉर्ड होणं आवश्यक होतं.पण हरतील ते अण्णा कसे? त्यांनी धाडस केलं. ते गाणं तलतच्या ऐवजी त्यांनी स्वत:च गायले.आवाज इतका सॉफ्ट आणि मॅच्युअर्ड काढला की भल्या भल्यांना तो आवाज तलतचाच वाटला याला दिलीप कुमार देखील अपवाद नव्हता.गाणं होतं ’ कितना हंसी हैं मौसम कितना हंसी सफर है साथी है खूबसूरत ये मौसम किसे खबर हैं..’ गाणं बरोब्बर पंधराव्या दिवसी रेकॉर्ड झालं आणि संध्याकाळच्या विमानाने कोइम्बतूरला पाठवूनही दिलं.नायडू साहेब खूष झाले.पुढे हाच सिनेमा सिंहली भाषेत बनवला त्याला देखील संगीत अण्णांचेच होते.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Entertainment songs
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.