Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

मनोरंजन आणि राजकारणाची सरमिसळ होतेय का? 

 मनोरंजन आणि राजकारणाची सरमिसळ होतेय का? 
कलाकृती विशेष मिक्स मसाला

मनोरंजन आणि राजकारणाची सरमिसळ होतेय का? 

by मानसी जोशी 12/03/2022

सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची. या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झाल्यापासून सतत काही ना काही विवाद होतंच आहेत. मुळात ‘काश्मीर’ आणि विवाद हे जुळलेलं समीकरण इतकी वर्ष होऊनही बदलत नाहीये. 

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराच्या सत्यघटनेवर आधारित आहे. शिवाय विवेक अग्निहोत्रीसारख्या अभ्यासू दिग्दर्शकाने प्रचंड मेहनतीने सखोल अभ्यास आणि रिसर्च करून चित्रपट दिग्दर्शित केला आहे. इतकंच नाही, तर या चित्रपटातील प्रत्येक प्रसंग खरा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. इतकं असताना त्यावरून कॉंट्रोव्हर्सी होण्याचं काही कारणच नव्हतं. तरीही ती झालीच, एक नाही तर अनेक गोष्टींवरून! मग ती कपिल शर्माचा प्रमोशन करण्यास देण्यात आलेला नकार असो किंवा कोर्ट केस. 

हिंदी चित्रपटांबाबत होणारे वाद काही आपल्याला नवीन नाहीत. पण हे लोण हिंदीकडून मराठीमध्येही आलं आहे. आणि नुसतंच आलं नाही तर एकदम कमी वेळात ते खोलवर रुजतंही चाललं आहे. 

Petition filed to stall the release of Vivek Agnihotri's 'The Kashmir Files'

मराठी प्रेक्षकांनी दादा कोंडके यांच्या द्वयर्थी संवाद असणाऱ्या चित्रपटांना स्वीकारलं तसंच अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, महेश कोठारे यांच्या निखळ विनोदी चित्रपटांचेही स्वागत केलं; त्याचबरोबर अलका कुबलच्या कौटुंबिक नायिकाप्रधान चित्रपटांनाही स्वीकारले. अगदी अलीकडच्या काळात मुंबई-पुणे-मुंबई, ती सध्या काय करते, सैराट यासारख्या प्रेमाच्या विविध छटा असणाऱ्या प्रेमकथा तर, कट्यार काळजात घुसली, फॅन्ड्री, आनंदी गोपाळ, बालगंधर्व अशा विविध विषयांवर आधारित चित्रपटांचंही स्वागत केलं. (मराठी इंडस्ट्री)

त्यावेळी कलाकारांच्या नावावर चित्रपट चालत असत. कलाकार हा फक्त कलाकार होता आणि तीच त्याची ओळख होती. परंतु, आता मात्र सगळेच संदर्भ बदलत चालले आहेत. कलाकाराची जात, धर्म इतकंच काय तर त्याची राजकीय भूमिकाही महत्वाची बनली आहे. जसं अमोल कोल्हेंच्या नथुरामाच्या भूमिकेवरून झालेला वाद. अभिनेता अमोल कोल्हे आणि खासदार अमोल कोल्हे या दोन्ही भूमिकांची अकारण सरमिसळ करण्यात आली. 

गेल्या काही दिवसात मराठी इंडस्ट्री ढवळून गेली आहे. आधी किरण माने प्रकरण, त्यानंतर अमोल कोल्हे यांच्या नथुरामच्या भूमिकेवरील आक्षेप आणि आता पावनखिंड विरुद्ध झुंड अशा अनेक विषयांवर सोशल मीडियावर वाद रंगले आहेत. कारणं काहीही असोत. पण मनोरंजन क्षेत्र हे केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित न राहता राजकारणाचं एक प्रभावी माध्यम बनलं आहे. 

जात, धर्म, राजकारण हे मुद्दे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक वगळता मराठी इंडस्ट्रीमध्ये डोकावले नव्हते. अर्थात त्या नाटकाच्या बाबतीतही हे मुद्दे अकारण उभे करण्यात आले होते. कारण जर दाऊद सारख्या दहशतवाद्याच्या आयुष्यावर बनवलेला चित्रपट चालतो, तर नथुराम गोडसेंच्या आयुष्यावरील नाटकावर आक्षेप कशासाठी? असो. सध्याच्या काळात हे जात, धर्म, राजकारण हे मुद्दे इतर क्षेत्रांप्रमाणेच मराठी इंडस्ट्रीमध्येही मोठ्या प्रमाणावर वादंग उठवत आहेत. 

सोशल मीडियाच्या आगमनाने सर्वसामान्यांच्या आयुष्यासोबतच एकूणच समाजात अनेक बदल घडले आहेत, घडत आहेत. नीतिमत्ता धाब्यावर बसवून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अर्वाच्च भाषेतल्या पोस्ट, कमेंट्स, अर्धवट माहितीवर लिहिलेले लेख, देशातल्या देवतुल्य आणि सन्माननीय महान व्यक्तिमत्वांवर होणारे आरोप, या साऱ्या गोष्टींसोबत चित्रपट कलाकारांनाही यामध्ये खेचण्यात येत आहे आणि ‘ट्रोलिंग’ नावाच्या शब्दाने अर्थाचा अनर्थ घडू लागलाय. अर्थात काही कलाकारांनी यामध्ये स्वतःहून उडी घेतली आहे. असो. 

 मराठी एंटरटेनमेंट  इंडस्ट्री

सोशल मीडिया नावाचा प्लॅटफॉर्म प्रत्येकाला उपलब्ध झाला आहे. त्याचा वापर कोणी कसा करायचा याला काही नियम नाहीत. अगदी चित्रपटांच्या प्रमोशनपासून राजकारणाच्या प्रचारापर्यंत सर्व गोष्टी इथे घडतात. अर्थात ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु, हे एवढ्यापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही. 

स्व. लता दीदींच्या निधनानंतर त्यांनी अमुक एका नेत्याची गाणी गायली नाहीत म्हणून त्यांना नावं ठेवण्यात आली, त्याआधी एका मराठी कलाकाराने मराठीमध्ये चांगला कन्टेन्ट असणारे चित्रपट चालत नाहीत, असं म्हणून नाराजी व्यक्त केल्यावर विषय थेट त्याच्या जातीपर्यंत गेला. किरण माने प्रकरणातही संपूर्ण प्रकरणाला अकारण जातीचा रंग देण्यात आला. आणि आता झुंड आणि पावनखिंड चित्रपटांवरही जातीय विवाद सुरु झाला आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा कलाकारांचे वाद राजकारण्यांपर्यंत जायचं काही कारणच नाही आणि नव्हतं. तरीही ते जाऊ लागले आहेत. हे सगळं सहज घडतंय की घडवून आणलं जातंय? 

रियालटी शो मध्ये चित्रपटांचं प्रमोशन, एखादया खास सणानिमित्त जुन्या जाणकार कलाकारांचं अथवा कलाकार जोडीचं मंचावर होणारं आगमन या गोष्टी समजण्यासारख्या आहेत. परंतु, रियालिटी शो मध्येही आता राजकारण्यांचा वावर दिसू लागला आहे. 

=====

हे देखील वाचा: काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची मन हेलावून टाकणारी कहाणी

====

एकीकडे बॉलिवूडची दुनिया अंडरवर्ल्ड डॉनच्या ताब्यात आहे, असं उघडउघड विधान केलं जात असताना मराठी इंडस्ट्री मात्र या साऱ्यापासून अलिप्त होती. पण आता मात्र परिस्थिती बदलली आहे. अर्थात आता सुजाण प्रेक्षकांना निखळ करमणूक, प्रबोधन करणारे चित्रपट हवे आहेत की, राजकारण्यांनी स्पॉन्सर केलेले प्रचारात्मक चित्रपट, याचा विचार सुजाण जनतेने करायचा आहे. 

 मराठी एंटरटेनमेंट  इंडस्ट्री

कोणत्याही कलाकाराकडे अथवा कलाकृतीकडे बघण्याचा दृष्टिकोन जातीयवादी किंवा राजकीय न ठेवता फक्त आणि फक्त रसिक प्रेक्षक म्हणून त्या कलाकृतीचा आनंद घेता यायला हवा. मग ती कलाकृती हिंदी असो किंवा मराठी. अर्थात याचवेळी ‘मेकर्स’नीही हाच दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे. 

====

हे ही वाचा: इकडे ‘खिंड’ तिकडे ‘झुंड’… नेमकी लढत कोणाची कोणाशी?

====

महाराष्ट्राला कलेची चांगली संसकृती लाभली आहे. चित्रपटसृष्टीचा पाय रचणारे दादासाहेब फाळके हे आपल्या मराठमोळ्या मातीतलेच आहेत. कोण चूक, कोण बरोबर असा वाद घालण्यापेक्षा जे घडतंय ते का घडतंय आणि ते खरंच योग्य आहे का, हा विचार शांत डोक्याने करायला हवा. कारण मनोरंजनाची दुनिया आता केवळ मनोरंजन म्हणून न राहता ती राजकारणाचं एक प्रभावी माध्यम बनू पाहतेय आणि हे जास्त धोकादायक आहे. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Entertainment politics
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.