Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    vidhu vinod chopra and lal krishna advani

    राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत वाद का घातला होता?

    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Yash Chopra यांचा वादग्रस्त ठरलेला हा चित्रपट आठवतो का?

Shah Rukh Khan याला ‘किंग’च्या सेटवर दुखापत; थेट अमेरिकेला झाला

Ashok Saraf : “मराठी लोकांची इमेज ही हिंदीत बसत नाही”;

Sachin Pilgoankar आणि ‘क्योंकी सास भी…’ मालिकेचं कनेक्शन आहे तरी

Shole : ‘शोले’ १९५३ सालीही पडद्यावर आला होता…

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’मध्ये दिसणार Subodh Bhave चा लव्ह ट्रायअॅंगल

Salman Khan याने २२ वर्षांपूर्वी आलेल्या ‘तेरे नाम’मधील ‘ही’ गोष्ट

‘Saare Jahan Se Accha Premier: OTT वर कधी प्रदर्शित होणार

बापरे ! KBC 17 साठी Amitabh Bachchan घेणार तब्बल ‘एवढे’ कोटी;

Ye Re Ye Re Paisa 3: ‘आली रे आली गुलाबाची कळी’

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

सत्यजित रे ‘हा’ चित्रपट काढताना कन्फ्युज होते ?

 सत्यजित रे ‘हा’ चित्रपट काढताना कन्फ्युज होते ?
बात पुरानी बडी सुहानी

सत्यजित रे ‘हा’ चित्रपट काढताना कन्फ्युज होते ?

by धनंजय कुलकर्णी 14/02/2024

भारतीय सिनेमाला जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळवून देणारे सत्यजित रे यांनी १९७७ साली एक हिंदी चित्रपट बनवला होता ‘शतरंज के खिलाडी’. रे यांनी बनवलेला तो एकमेव हिंदी चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी दूरदर्शनसाठी ‘सद्गती’ नावाची एक हिंदी भाषेत शॉर्ट फिल्म बनवली होती पण ‘शतरंज के खिलाडी’ हा पूर्ण लांबीचा हिंदी सिनेमा होता. ख्यातनाम हिंदी साहित्यिक मुन्शी  प्रेमचंद यांच्या कथानकावर हा चित्रपट होता. या सिनेमाची पार्श्वभूमी १८५७ च्या राष्ट्रीय संग्रामाची होती. हिंदुस्थानातील अखेरचा मुघल बादशाह बहादूर शाह जफर याच्या कर्मभूमीत ही कहाणी घडते. कथेचा प्लॉट जबरदस्त होता. (Satyajit Ray)

सत्यचित्रे यांना ही कथा प्रचंड आवडली होती. या कथेवर एक चांगला सिनेमा निर्माण होऊ शकतो असं त्यांना वाटत होतं. खूप चांगलं पोटेन्शिअल या स्टोरीमध्ये आहे असं त्यांनी ओळखलं होतं. त्यांनी या कथेवर चित्रपट काढायचे ठरवलं तो देखील हिंदी भाषेत परंतु त्यांना हिम्मत होत नव्हती. सत्यजित रे यांची पत्नी बिजया रॉय यांनी आपल्या पुस्तकात ‘माणिक अँड आय : माय लाईफ विथ सत्यजित रे (Satyajit Ray)’ मध्ये असे लिहिले आहे की , सत्यजित रे या सिनेमाबाबत खूप चिंतेत असायचे. हा सिनेमा कसा करावा याबाबत त्यांना काळजी होतीच. बंगालीमध्ये एक सरस चित्रपट देणारे रे या पहिल्या हिंदी सिनेमाच्या वेळी मात्र काहीसे गोंधळले होते. 

एकदा त्यांचे आर्ट डायरेक्टर बन्सी चंद्र गुप्ता  यांनी रे यांना विचारले “आपल्याला हा सिनेमा करताना नेमकी कशाची अडचण वाटत आहे?” तेव्हा रे म्हणाले ,”कथानक तर चांगले आहे पण मला नेमकं कळत नाही मी सुरुवात कशी करू?” त्यावर बन्सी चंद्र गुप्ता  म्हणाले ,”म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय आहे?”  त्यावर रे म्हणाले ,”कुठल्याही सिनेमाचा सर्वात स्ट्रॉंग पॉईंट असतो त्याची पटकथा आणि संवाद. आजवर मी माझ्या सर्व बंगाली सिनेमाचे पटकथा आणि संवाद स्वतः लिहिले आहेत. इथे मात्र संवाद मला हिंदीमध्ये लिहायचे आहेत आणि मला स्वतःला तो कॉन्फिडन्स येत नाही. मी हिंदीमध्ये तितका कम्फर्ट नाही. (Satyajit Ray)

मी लिहू शकेल की नाही? त्यामुळे गोंधळलो आहे.” यावर बन्सी चंद्र गुप्ता  म्हणाले,” तुम्ही बंगाली भाषेमध्ये निष्णात आहात. तुम्ही शतरंज के खिलाडी या सिनेमाची  पटकथा आणि संवाद बंगाली भाषेत लिहून काढा आणि नंतर आपण ते हिंदीमध्ये अनुवादित करून घेऊ. तुम्ही स्वतः बंगाली भाषेमध्ये लिहिले असल्यामुळे तुम्ही कॉन्फिडंट असाल. आणि हिंदी भाषा तुम्हाला समजते. बोलता येते. त्यामुळे अनुवादित झालेला मजकूर तुमच्या बंगाली पटकथेची तादात्म्य पावणारा आहे की नाही तुम्हाला लगेच कळेल. तुमच्या पटकथेचा  सर्व फ्लेवर हिंदी भाषेत येईल!”  सत्यजित रे यांचा चेहरा खुलला. त्यांनी लगेच ‘शतरंज के खिलाडी’ या सिनेमाची पटकथा आणि संवाद बंगाली भाषेमध्ये लिहायला सुरुवात केली.

सर्व काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी हिंदी आणि उर्दूतील जाणकार साहित्यिक शमा जैदी आणि जावेद सिद्दिकी यांना बोलावले आणि त्यांच्याकडे तो ड्राफ्ट दिला. त्या दोघांनाही बंगाली भाषेची चांगली माहिती असल्याने त्यांनी अतिशय सुंदर असा भावांनुवाद केला. सत्यजित रे एकदम खुश  झाले. आणि त्यांनी चित्रपटावर काम करायला सुरुवात केली. संजीव कुमार, सईद जाफरी, शबाना आजमी, फरीदा जलाल, फारुख शेख आणि गांधी या सिनेमाचे दिग्दर्शक ऑस्कर विजेते सर रिचर्ड अटेनबरो यांनी या सिनेमांमध्ये प्रमुख भूमिका केल्या.(Satyajit Ray)

===========

हे देखील वाचा : ‘हा’ सुपरहिट सिनेमा आशा पारेखला कसा मिळाला ?

===========

अशा पद्धतीने सत्यजित रे यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘शतरंज के  खिलाडी’ रुपेरी पडल्यावर झळकला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र त्याला अजिबात व्यावसायिक यश मिळाले नाही याचे कारण सत्यजित रे (Satyajit Ray) यांना हुकमी यशाच्या हिंदी सिनेमाचा फॉर्मुला काही माहित नव्हता. किंबहुना त्यांनी त्या पद्धतीने सिनेमा बनवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. त्यामुळे साहजिकच चित्रपटाला मर्यादित व्यावसायिक यश मिळाले. रे यांच्या या सिनेमाची जागतिक पातळीवर देखील फारशी दाखल घेतली गेली नाही. सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केलेला पहिला पूर्ण लांबीचा हिंदी सिनेमा एवढीच याची आठवण उरली आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.