Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Big Boss 19: ‘आता बघूच कोण जातंय…’ Pranit More साठी अंकिता वालावलकरने बसीर

Nana Patekar एक्स गर्लफ्रेंड मनिषा कोईरालाबद्दल काय म्हणाले?

Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

अनुराधा : Hrishikesh Mukherjee यांची भावरम्य कविता!

Amitabh Bachchan यांचं खरं नाव ‘हे’ असतं; भाऊ अजिताभने केला

Crew 2 चित्रपटाची तयारी सुरु; पुन्हा ३ अभिनेत्रींचं त्रिकुट धम्माल

स्त्री आणि भेड़ियाच्या जगात नवीन सुपरहिरो Thama ची एन्ट्री!

Bappi Lahiri ने संगीत दिलेल्या गाण्याला किशोर कुमारने कसे इम्प्रोवाइज केले?

‘मनाचे श्लोक’मधून Leena Bhagwat – मंगेश कदम मोठ्या पडद्यावर प्रथमच

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

व्ही शांताराम यांचा ‘अपना देश’ सिनेमा ठरला होता वादग्रस्त ?

 व्ही शांताराम यांचा ‘अपना देश’ सिनेमा ठरला होता वादग्रस्त ?
बात पुरानी बडी सुहानी

व्ही शांताराम यांचा ‘अपना देश’ सिनेमा ठरला होता वादग्रस्त ?

by धनंजय कुलकर्णी 17/05/2024

भारतीय सिनेमाच्या गोल्डन इरा मधील त्या काळातील काही किस्से, काही वाद, काही भांडणे वाचून आज आपली करमणूक होते पण त्या काळात जे लोक यात इन्व्हॉल होते त्यांना मात्र या साऱ्या प्रकाराचा खूप त्रास झाला होता. चित्रपती व्ही शांताराम (V. Shantaram) यांनी १९४९ साली एक चित्रपट बनवला होता ‘अपना देश’. फाळणीच्या प्रश्नावर फोकस करीत यात एक सामाजिक समस्या त्यांनी मांडली होती.

या चित्रपटात नुकत्याच स्वातंत्र्य मिळालेल्या आपल्या देशात भ्रष्टाचाराने कसा शिरकाव केला आहे आणि याला वेळीच जर अटकाव नाही घातला तर देश पुन्हा कसा रसातळाला जाईल याचा इशारा त्यांनी या चित्रपटातून दिला होता. खरंतर चांगला सामाजिक संदेश या चित्रपटातील त्यांनी दिला होता. हा सिनेमा मुंबईला वेस्टएंड (ज्याचे नाव नंतर नाज झाले) मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटांमध्ये पुष्पा हंस, उमेश शर्मा, चंद्रशेखर, केशवराव दाते यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

मुंबईमध्ये चित्रपटाने चांगला लौकिक प्राप्त केला. लोकांची चांगली गर्दी होत होती. परंतु एकेकाळचे शांताराम बापूंचे मित्र फिल्म इंडियाचे मासिकाचे संपादक बाबुराव पटेल यांना मात्र हे काय पटत नव्हते. व्ही शांताराम आणि बाबुराव पटेल यांच्यामध्ये त्या काळात बऱ्यापैकी कटूता निर्माण झाली होती. त्यांनी फिल्म इंडिया या आपल्या मासिकातून Apna Desh? No its Apna Trash! अशी संभावना केली. बाबुराव पटेल यांनी शांताराम बापूंना (V. Shantaram) फोन करून सांगितले की, ”तुमचा चित्रपट हा देशद्रोही आहे. स्वतंत्र भारताची एक चुकीची प्रतिमा तुम्ही निर्माण करत आहात आणि नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशाबाबत अशा प्रकारचे सिनेमे समाजामध्ये गैरसमज निर्माण करू शकतात. त्यामुळे तुमच्या या चित्रपटावर बंदीच आणली पाहिजे!”

ते एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी भारतातील राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून, ”हा चित्रपट तुमच्या राज्यात प्रदर्शित होऊ देऊ नका. हा देशद्रोही चित्रपट आहे.” असे सांगितले. शांताराम बापूंच्या बऱ्याच मित्रांनी बाबुराव पटेल यांनी चालवलेल्या मोहिमेच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची त्यांना विनंती केली. त्यांनी बापूंना असे देखील सांगितले की, ”तुम्हीसुद्धा प्रत्येक मुख्यमंत्र्याला पत्र पाठवून आपली बाजू सांगा.” त्यावर बापूंचे (V. Shantaram) म्हणणे असे होते की, ”जी बाजू सत्य असते तिला कुठल्याही पुराव्याची गरज नसते. त्यामुळे सत्य माझ्या बाजूने आहे माझा विजय होईल.”

‘फिल्म इंडिया’ या मॅगझिनची देशभर मोठी चलती होती. त्यामुळे बाबुराव पटेल यांच्याकडून आलेल्या पत्राची दखल प्रत्येक मुख्यमंत्र्याला घ्यायला लागली. या चित्रपटातील नायिका पंजाबी दाखवली होती. ती अवैध शस्त्रांचा व्यापार करते असे यात दाखवले होते. त्यामुळे हा चित्रपट ‘पंजाबी लोकांची बदनामी करतो’ असा दावा बाबुराव पटेल यांचा होता. दिल्लीमध्ये तेव्हा शीख समुदाय मोठ्या संख्येने राहत होता. बाबुराव पटेल यांचे अनेक मित्र दिल्लीत देखील होते. त्यांच्या थ्रू बाबूराव पटेल यांनी या चित्रपटाच्या विरोधी वातावरण दिल्लीत तयार केले. दिल्लीत सर्वत्र या सिनेमाच्या विरुद्ध पोस्टर्स लागली. परंतु गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हा चित्रपट पाहिला आणि त्याला ग्रीन सिग्नल दाखवला. त्यामुळे दिल्लीतील संघर्ष टळला.

पण खरा संघर्ष मात्र पंजाबमध्ये होणार होता. पंजाबमधील माहिती आणि प्रसारण खात्याचे एक अधिकारी वर्मा बाबुराव पटेल यांचे मित्र होते पटेलांनी त्याला तिखट मीठ लावून सिनेमा कसा पंजाबी समाजाच्याविरुद्ध आहे हे सांगितले. पंजाबमध्ये होणारा मोठा विरोध लक्षात घेऊन शांताराम बापूंनी (V. Shantaram) पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री भीम सेन सच्चर यांना पत्र लिहून त्यांच्या भेटीची वेळ मागितली. मुख्यमंत्र्यांनी शांताराम बापूंना पंजाबला बोलवले आणि त्यांच्यासोबतच सिनेमा पाहायचे ठरवले. या सिनेमाला वर्मा देखील उपस्थित होते. सिनेमा सुरू झाला अर्धा एक तास झाल्यानंतर मुख्यमंत्री भीम सेन सच्चर जोरात म्हणाले “वर्मांजीsss “

========

हे देखील वाचा : अरे चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला है….

========

व्ही शांताराम (V. Shantaram) यांना वाटले गेला आता आपला सिनेमा बाराच्या भावात. पण चमत्कार झाला. मुख्यमंत्री वर्मांना म्हणाले, ”तुम्ही तर म्हणत होता हा चित्रपट देश विघातक आहे. देशाची बदनामी करणारा आहे. पण मी तर इथे वेगळेच पाहतोय. काय सुंदर चित्रपट बनवला आहे.” मुख्यमंत्रीच असे बोलल्याने वर्मा यांनी मान खाली घातली. मुख्यमंत्री सच्चर यांनी चित्रपटाचे तोंड भरून कौतुक केले. शांताराम बापूंना शुभेच्छा दिल्या आणि देशभर हा सिनेमा नंतर प्रचंड गाजला!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bhim Sen Sachar Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment V. Shantaram
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.