‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Ashi Hi Banwa Banwi: ’70 रुपये वारले’ डायलॉग कोणी लिहिला? सचिन पिळगांवकरांचा मोठा खुलासा!
मराठी चित्रपटसृष्टीत आजवर अनेक गाजलेले चित्रपट आले, गेले, काही विस्मरणात गेले, काही आठवणीत राहिले, पण काही चित्रपट असे असतात जे काळावर मात करतात. ‘अशी ही बनवाबनवी’ हा त्याच पंक्तीतला एक चित्रपट. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर या त्रिकुटाने निर्माण केलेली ही धमाल विनोदी मेजवानी आजही तितक्याच जोमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. इतकी वर्षं उलटली, अनेक नवीन सिनेमे आले, ट्रेंड बदलले, पण ‘अशी ही बनवाबनवी’ची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. (Ashi Hi Banwa Banwi)

आजही जेव्हा हा सिनेमा टेलिव्हिजनवर लागतो, तेव्हा प्रेक्षक आपापली सगळी कामं बाजूला सारून तो पाहायला टीव्हीसमोर बसतात. संवाद, अभिनय, प्रसंग आणि प्रत्येक पात्राची रंगवलेली खास शैली हे सगळं इतकं प्रभावी आहे की, हा चित्रपट प्रत्येक वेळेस तितकाच हसवतो. अशा या अजरामर चित्रपटामागे केवळ उत्तम अभिनय नव्हे, तर तितकंच ताकदीचं लेखनही होतं आणि हे नुकतंच स्वतः सचिन पिळगांवकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

या मुलाखतीत बोलताना त्यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला. ते म्हणाले की, ‘अशी ही बनवाबनवी’ मधील बहुतांश संवाद त्यांनी स्वतः लिहिले होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, “मोजून तीन डायलॉग सेटवर तयार झाले असतील, बाकी सगळे डायलॉग्स मी आणि वसंत सबनीस एकत्र बसून स्क्रिप्टमध्ये आधीच लिहिले होते.” म्हणजे प्रेक्षकांच्या मनात घर करणारे ते अजरामर संवाद केवळ सेटवरील स्पॉण्टेनियस improvisation नव्हते, तर पूर्वनियोजित आणि अभ्यासपूर्वक लिहिले गेले होते.(Ashi Hi Banwa Banwi)
==============================
हे देखील वाचा: Tejashree Pradhan आणि Subodh Bhave झी मराठीच्या मालिकेत एकत्र झळकणार !
==============================
सचिन पिळगांवकर केवळ एक उत्तम अभिनेता नव्हे, तर एक संवेदनशील लेखकही आहेत, याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी अभिनयासोबत लेखनातही आपली छाप सोडली आहे, आणि ‘अशी ही बनवाबनवी’सारखा चित्रपट त्याचं ठळक उदाहरण ठरतो. हा सिनेमा फक्त एक विनोदी अनुभव नसून, त्यामागे असलेलं विचारपूर्वक लेखन, कसदार अभिनय आणि चपखल दिग्दर्शन यांची एकत्रित ताकद आहे. त्यामुळेच आजही ‘अशी ही बनवाबनवी‘ ही फक्त एक चित्रपटाची नुसती आठवण राहिलेली नाही, तर ती एक संस्कृती, एक आनंददायी अनुभव, आणि मराठी सिनेमाचं एक जिवंत प्रतीक ठरले आहे.