‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Pandharpur Vaari : वारीवरचा ‘तो’ चित्रपट खरंच शापित होता?
संपूर्ण महाराष्ट्र सध्या विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे… लहानग्यांपासून ते अगदी वृद्धापर्यंत सगळेच वारीमध्ये सहभागी झाले असून अभंग गात आणि रिंगण घालत विठूरायाच्या भेटीला वारकरी जात आहेत.. आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये जाऊन विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक आसुसलेले आहेत… या पंढरीच्या वारीची गोष्ट १९८८ साली ‘पंढरीची वारी’ (Pandharichi Vaari Movie) या चित्रपटात दाखवली गेली होती… खऱ्या खुऱ्या वारीत शुटींग करण्यात आलेला हा चित्रपट आजही लोकप्रिय आहे.. मात्र, मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात शापित चित्रपट अशी ओळख असणाऱ्या पंढरीची वारी चित्रपटाबद्दल काही रंजक किस्से जाणून घेऊयात…(Marathi Movies)

जयश्री गडकर आणि बाळ धुरी यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘पंढरीची वारी’ या चित्रपटाचं पंढरपूरच्या वारीत आणि पंढरपूर मंदिराच्या गाभाऱ्यातही चित्रिकरण केलं होतं.. खरं तर पंढरीची वारी या चित्रपटात बाळ धुरी आणि जयश्री गडकर (Jayashree Gadkar) यांनी साकारलेल्या भूमिका आधी अरुण सरनाईक आणि रंजना देशमुख साकारणार होते… मात्र, शुटींगच्या पहिल्याच दिवशी प्रमुख अभिनेते अरुण सरनाईक यांचा अपघाती मृत्यू झाला आणि संपूर्ण टीम कोलमडलीच… मात्र, जर का खऱ्या वारीत शुटींग करायचं असेल तर मग आणखी एक वर्ष थांबावं लागलं असतं आणि आर्थिकदृष्ट्या देखील ते शक्य नसल्यामुळे श्रीकांत मोघे यांना विचारणा केली; पण त्यांनीही नकार दिल्यानंतर अखेर बाळ धुरी यांच्यासोबत चित्रपटाचं शुटींग सुरु केलं…तर जयश्री गडकर यांच्याआधी रंजना देशमुख या मुख्य अभिनेत्री होत्या आणि त्यांनी ७० टक्के चित्रपटाचं शुट पुर्ण केलं होतं.. परंतु, त्यांचा अपघात झाला आणि पाय गमावल्यामुळे पुन्हा एकदा शुट थांबलं… रंजना बऱ्या व्हाव्या यासाठी ३ वर्ष वाट पाहिली पण तिथेही निराशा झाली आणि अखेर जयश्री गडकर यांना घेऊन संपूर्ण चित्रपट रि-शुट केला गेला…
================================
=================================

प्रमुख अभिनेत्याचं आधी निधन होणं, नंतर मुख्य अभिनेत्रीच्या अपघातामुळे शुटींग लांबणं या सगळ्या खटाटोपात चक्क पंढरीची वारी चित्रपटाच्या निर्मात्यांचं १८ लाखांचं नुकसान झालं… मात्र, दिग्दर्शक रमाकांत कवठेकर आणि संपूर्ण टीमने पुन्हा जिद्दीने उभे राहात चित्रपट पुर्ण केला आणि पंढरीची वारी या चित्रपटाने अक्षरश: इतिहास रचला… आषाढी एकादशी आणि पंढरीची वारी हा चित्रपट प्रत्येक मराठी प्रेक्षकासाठी एक इमोशन आहे आणि आजही तो चित्रपट तितक्याच भक्ती भावनेने पाहिला आणि अनुभवला जातो…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi