Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Priya Bapat : ‘पण या इगो चं’ गाण्यातून नात्यातील अहंकारावर

अनाथ लहान मुलाच्या भावविश्वाचा उत्कट प्रवास मांडणारा ‘हा’ चित्रपट टॅक्स

Sabar Bonda : ‘सनडान्स फिल्म फेस्टिवल’ गाजवणारा पहिला मराठी चित्रपट

‘मुंबईचा फौजदार’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये प्राजक्ता माळी दिसणार?; Gashmeer Mahajani म्हणाला…

Janhvi Kapoor हिला ३ मुलं का हवी आहेत?; तिनेच सांगितलं

राणी मुखर्जी आणि Shah Rukh Khan पुन्हा एकत्र दिसणार?; ;त्या;

Isha Deol : अभिषेक बच्चन जावई व्हावा अशी होती हेमा

Manoj Bajpayee आणि राम गोपाल वर्मा पुन्हा एकत्र; नव्या हॉरर

Rajinikanth यांना बॉलीवूडमध्ये लॉन्च करणाऱ्या सिनेमात बाजी मारली होती अमिताभ

Janhvi Kapoor आणि Siddharth Malhotra यांच्या ‘परम सुंदरी’चं कलेक्शन झालं

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

किशोर कुमारच्या गाण्यांना आकाशवाणी, दूरदर्शनवर बंदी ?

 किशोर कुमारच्या गाण्यांना आकाशवाणी, दूरदर्शनवर बंदी ?
बात पुरानी बडी सुहानी

किशोर कुमारच्या गाण्यांना आकाशवाणी, दूरदर्शनवर बंदी ?

by धनंजय कुलकर्णी 13/09/2023

सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील सुपरस्टार पार्श्वगायक किशोर कुमार (Kishore Kumar) यांना  एका मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले होते. त्यांच्या गाण्यांवर ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनने बहिष्कार टाकला होता, बॅन लावला होता. त्याकाळात किशोर कुमारचे (Kishore Kumar) कुठलेही गाणे या दोन माध्यमातून प्रसारित केले जात नव्हते. खरं तर किशोर कुमारसाठी हा मोठा गोल्डन पिरेड होता पण त्याला बहिष्काराला सामोरे जावं लागलं होतं. का त्याच्या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती? काय होत हा नेमका किस्सा?  स्वतंत्र भारतामध्ये १९७५ ते १९७७ हा कालखंड आणीबाणीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरात अंतर्गत सुरक्षेसाठी इमर्जन्सी जाहीर केली होती. या काळात नागरिकांच्या अनेक अधिकारांवर गदा आली होती. मीडिया आणि प्रेस यांच्या स्वातंत्र्यावर मोठी बंधने आली होती. याच काळात हा प्रसंग घडला होता. २६ जून १९७५  या दिवशी आणीबाणी जाहीर झाली आणि  त्याचा पहिला फटका बसला गुलजार यांच्या ‘आंधी’ या चित्रपटाला. ‘आंधी’ या चित्रपटात सुचित्रा सेन यांनी साकारलेली भूमिका तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत काहीजण कोरिलेट करू लागल्यामुळे त्याकाळचे सूचना आणि प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ल यांनी चित्रपटाचे निर्माते जे ओम प्रकाश यांना बोलावून त्यातील अनेक प्रसंगांवर आपली आपत्ती जाहीर केली. त्यात अनेक कट्स सुचवले. एक प्रकारे चित्रपटावर अघोषित बंदीच आणली!

आणीबाणीचा काळ जसा जसा पुढे जाऊ लागला, तसं तसा लोकांमधील असंतोष वाढू लागला. समाजाला आणीबाणीचे  महत्त्व कळावे म्हणून शासकीय पातळीवर अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाऊ लागले. शाळा कॉलेजातून आणीबाणीचे महत्त्व सांगणारे अनेक कार्यक्रम आयोजित केले जाऊ लागले. या काळात माध्यमाची साधने कमी असल्यामुळे चित्रपट आणि चित्रपट कलावंत यांच्यामार्फत आपण चांगल्या प्रकारे आपल्या सरकारच्या योजनांचा प्रपोगंडा करू शकतो असे सरकारला वाटू लागले.

त्यातूनच मुंबईला होणाऱ्या एका काँग्रेसच्या अधिवेशनात किशोर कुमार यांनी येऊन सरकारी योजनावर आधारित काही गाणी गावीत असे ठरले. त्याप्रमाणे के सी जैन या सुचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या जॉईंट सेक्रेटरीने किशोर कुमार यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सर्व योजना समजावून सांगितली. किशोर कुमारला (Kishore Kumar) हा सर्व प्रकार अजिबात आवडला नाही त्याने सरळ सरळ असे प्रचारकी गाणे गायला नकार दिला. जैन यांनी त्यांचे सीनियर आणि सुचना आणि प्रसारण मंत्रालयाचे सेक्रेटरी एस एम एच बर्नी यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यांचा इगो दुखावला. एक साधा गायक आपली मागणी मान्य करत नाही याचा त्यांना राग आला. त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ला यांच्याशी संपर्क साधून “आपल्याला काहीतरी स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायला लागेल.” असे सांगितले.

=========

हे देखील वाचा : हृदयविकार असताना मुकेश यांनी हे गाणे अजरामर केले!

=========

त्याप्रमाणे ४ मे १९७६  रोजी किशोर कुमार (Kishore Kumar) यांच्याविरुद्ध अध्यादेशच काढला गेला. यात किशोर कुमार यांच्या गाण्यांवर आकाशवाणी आणि दूरदर्शनवर बंदी घालण्यात आली. तसेच किशोर कुमारच्या मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व गाण्यांच्या रेकॉर्ड्स विक्रीवर देखील बंदी घालण्यात आली. किशोर कुमार अभिनय करत असलेल्या चित्रपटांवर सरकारची करडी नजर राहू लागली. थोडक्यात किशोर कुमारला (Kishore Kumar) सर्व बाजूने घेरले गेले. पुढचे एक वर्षभर हा बॅन चालू होता. पण मार्च १९७७ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा सपशेल पराभव झाला आणि जनता पक्षाचे सरकार आहे. या सरकारने आणीबाणीतील काळ्या घटनांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश शहा यांच्या नेतृत्वाखाली एक आयोग नेमला. या आयोगाच्या समोर इतर अनेक प्रकरणांसोबतच किशोर कुमारचे (Kishore Kumar) प्रकरण देखील आले. या आयोगाने या निर्णयाच्या विरुद्ध आपले मत व्यक्त करत तात्काळ किशोर कुमारच्या गाण्यांवरील आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील बंदी उठवली. गेल्या वर्षी ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेचा उल्लेख केला होता.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Akashvani Theater Congress Doordarshan Kishore Kumar mumbai Song
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.