Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

 All Is Well Marathi Movie: तीन मित्रांची धमाल गोष्ट ‘ऑल

Gaadi Number 1760: प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे प्रथमेश-प्रियदर्शिनीचे ‘झननन झाला’ गाणं

Dostana : ‘मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया…’हे गाणे

Aamir Khan याच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचं कलेक्शन झालंय तरी

‘रंगभूमीवर फुललेली प्रेमकहाणी, कशी झालेली Reema Lagoo आणि Vivek Lagoo

Shubhvivah मालिकेत चिन्मय उद्गीरकरची एंट्री; आकाशच्या जीवासाठी भूमी करणार संघर्ष

Ye Re Ye Re Paisa 3: सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या

Kajol : “‘तिथे शूटिंग करताना मला नेहमीच अस्वस्थ वाटत होतं”

Sachin Pilgoankar- रंजिताचा ‘आंखियों के झरोखो से’आठवतो का?

Housefull 5 : मल्टिस्टार कास्ट असूनही अक्षय कुमारच्या चित्रपटाचं कलेक्शन

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘जंजीर’ सुपरहिट झाला आणि अमिताभचे स्टार पालटले!

 ‘जंजीर’ सुपरहिट झाला आणि अमिताभचे स्टार पालटले!
बात पुरानी बडी सुहानी

‘जंजीर’ सुपरहिट झाला आणि अमिताभचे स्टार पालटले!

by धनंजय कुलकर्णी 15/11/2024

माणसाच्या आयुष्यातील जेंव्हा खराब काळ असतो तेंव्हा सगळ्या बाजूने संकटांचा भडिमार होत असतो. कुठलीच गोष्ट सरळ होत नाही. साध्या सुलभ गोष्टी साठी ही झगडावे लागते. कलाक्षेत्रात तर याचा प्रत्यय वारंवार येत असतो. कारण इथे कर्तृत्वासोबतच नशीब देखील मोठी खेळी खेळत असते. मुळात मायानगरी ही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी दुनिया आहे. त्यामुळे इथे जो हिट होतो त्याचीच बात ऐकली जाते.

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांनी सुरुवातीची चार-पाच वर्ष अतिशय संघर्षात काढली होती. कित्येक सिनेमातून त्यांना फ्लॉप कलाकार म्हणून चक्क काढून टाकण्यात आलं होतं. अतिशय अपनास्पद वाईट अशी वागणूक त्यांना मिळत असायची. पण त्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं आणि यश संपादन केले. त्यांच्या याच संघर्षाच्या काळातील एक किस्सा मध्यंतरी वाचण्यात आला होता.

दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी ‘आनंद’ (१९७१) या चित्रपटानंतर ‘नमक हराम’ या चित्रपटाचे निर्मिती सुरू केली. ‘आनंद’ या चित्रपटातील राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांना या सिनेमा देखील त्यांनी रिपीट केले. राजेश खन्ना त्यावेळी सुपरस्टार पदावर होता तर अमिताभ बच्चन फ्लॉप चित्रपटांचा नायक होता! राजेश खन्नाच्या डेट्स मिळणं खूप अवघड होतं. अमिताभ बच्चन यांच्याकडे डेट्सचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे ऋषिकेश मुखर्जी यांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांचे सोलो शॉट्स चित्रित करायचे ठरवले.

राजेश खन्ना त्यावेळी प्रचंड बिझी असल्यामुळे त्याचे खूप कमी शॉट तोपर्यंत चित्रित झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांचे दिल्लीमधील काही डिस्ट्रीब्युटर्स ऋषिकेश मुखर्जी यांना भेटण्यासाठी आले. त्यांनी ऋषिदांना त्यांच्या आगामी ‘नमक हराम’ चित्रपटाचे रशेस (अपूर्ण चित्रपटाचे झालेले शूट) दाखवायची मागणी केली. ऋषिकेश मुखर्जी यांनी आपल्या नमक हराम या चित्रपटाचे रशेस त्या लोकांना दाखवले. त्यात अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांचेच शॉट्स जास्त होते राजेश खन्नाचे त्या मानाने कमी शॉट्स होते.

डिस्ट्रीब्यूटरने विचारले,” या सिनेमाचा हिरो नक्की कोण आहे? राजेश की अमिताभ?” ऋषिकेश मुखर्जी म्हणाले ,”अर्थातच राजेश खन्ना!” डिस्ट्रीब्यूटरने विचारले,” राजेश खन्ना तर या चित्रपटात कुठे दिसत नाही?” तेव्हा ऋषिकेश मुखर्जी म्हणाले,” चित्रपटाच्या रशेस वरून तुम्हाला आता कल्पना येणार नाही. तुम्ही आता जे पाहत आहात तो केवळ अर्धवट बनलेला सिनेमा आहे. अजून अर्ध्या सिनेमाची शूटिंग बाकी आहे.” तेव्हा डिस्ट्रीब्युटर्स म्हणाले,” त्या अश्वमुखी अभिनेत्याला का घेतले? तो अभिनयातला ठोकळा आहे. त्याचा सिनेमातले रोल कमी करा. राजेश खन्नाचा रोल वाढवा”. मग ते डिस्ट्रीब्यूटर ! ऋषिकेश मुखर्जी शांतपणे सर्व ऐकून घेत होते. डिस्ट्रीब्यूटरचे ऐकून ते म्हणाले,” आपण याबाबत आता काहीच बोलायला नको. चित्रपट पूर्ण होवू द्या.”

या नंतर मात्र एक मोठा चमत्कार झाला. ११ मे १९७३ या दिवशी प्रकाश मेहरा यांचा ‘जंजीर’ हा चित्रपट झळकला. आणि पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाने देशभर मोठी हवा निर्माण केली. Angri young man चा जन्म झाला. ’ये पुलिस स्टेशन है. आपके बाप का घर नही.” या डायलॉग ने अमिताभ (Amitabh Bacchan) तरुणाईचा स्टार झाला. अमिताभ बच्चनचे नाव देशभर गाजू लागले. याच काळात नमक हरामचे उर्वरित शूटिंग देखील चालू होते. आता अमिताभ बच्चन यांच्या नावाला एक वलय प्राप्त झाले होते.

==============

हे देखील वाचा : ‘कभी कभी’ चे टायटल सॉंग अमिताभ बच्चन गाणार होते?

पुन्हा काही दिवसानंतर डिस्ट्रीब्यूटरस ऋषिकेश मुखर्जी यांना भेटायला आले. त्यावेळी ज्या डिस्ट्रीब्युटर्सने अमिताभची एकमुखाने टिंगल केली होती ते सर्व हृषिदांना म्हणू लागले, ”दादा अमिताभ बच्चन का रोल बढाव. उसे राजेश खन्ना के इक्वल का रोल दो.” एका ‘जंजीर’ ने सर्व हवा फिरवली होती. जे डिस्ट्रीब्युटर्स अमिताभ बच्चन वर अपशब्दा मध्ये टिंगल करत होते त्यांची शब्द त्यांच्याच घशात गेले. आणि ते सर्व अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांचे भक्त झाले. हा सर्व करिष्मा जंजीर चा होता. ऋषिकेश मुखर्जी फक्त शांतपणे हसले आणि म्हणाले “वक्त वक्त की बात होती है.” १८ नोव्हेंबर १९७३ रोजी ‘नमक हराम’ प्रदर्शित झाला आणि सुपर हिट झाला.

धनंजय कुलकर्णी  : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Amitabh Amitabh Bacchan Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.