Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

“Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar

Gharoghari Matichya Chuli मालिकेत जबरदस्त ट्विस्ट; रणदिवे कुटुंब ऐश्वर्यावर करणार

Rajinikanth : नाहीतर ‘दशावतार’मध्ये दिसले असते रजनीकांत !

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

तब्बल दोन महिन्याच्या अथक परिश्रमातून बनले ‘हे’ अजरामर प्रार्थना गीत!

 तब्बल दोन महिन्याच्या अथक परिश्रमातून बनले ‘हे’ अजरामर प्रार्थना गीत!
बात पुरानी बडी सुहानी

तब्बल दोन महिन्याच्या अथक परिश्रमातून बनले ‘हे’ अजरामर प्रार्थना गीत!

by धनंजय कुलकर्णी 13/06/2022

कलावंताची प्रतिभा कधी रुसेल आणि कधी जागृत होईल याचा काही नेम नसतो. त्यामुळे बऱ्याचदा एखादी कलाकृती साकार होण्यासाठी काही क्षणांपासून कित्येक वर्षांचा कालावधी लागू शकतो. गीतकार अभिलाष यांना एका गाण्यासाठी असेच तरसावे लागले. तब्बल दीड ते दोन महिना रोज एकाच सिच्युएशन वरील गाणे लिहीत होते. पण त्यांना हवे तसे शब्द सापडत नव्हते. अखेर दोन महिन्याच्या प्रदीर्घ तपश्चर्येनंतर त्यांच्या मनासारखे गाणे तयार झाले. (Lyricist Abhilash)

आज तीस पस्तीस वर्षांनंतर देखील हे गाणे भारतातील अनेक शाळा व महाविद्यालयांमधून प्रार्थना गीत म्हणून गायले जाते. कोणते होते हे गीत? काय होता हा किस्सा? हा किस्सा सांगण्यापूर्वी गीतकार अभिलाष यांच्याबाबत थोडीशी माहिती घेणे गरजेचे आहे. 

अत्यंत प्रतिभावान पण कमनशीबी गीतकार असे त्यांचे वर्णन करावे लागेल. गीतकार अभिलाष यांचे खरे नाव होते ओम प्रकाश. १३ मार्च १९४६ चा जन्म. दिल्लीचे रहिवासी. वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षापासूनच त्यांनी काव्यलेखन, गजल लेखनाचा प्रारंभ केला. गीतकार साहिर लुधियानवी यांच्या काव्याचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. 

एकदा दिल्लीत एका मुशायरामध्ये त्यांनी साहीर साहेबांना आपल्या कवितांची वही दाखवली. साहीर यांनी त्यांच्या या शायरीचे  कौतुक केले आणि त्यांना आणखी मेहनत करण्याचा आणि  भरपूर वाचन करण्याचा सल्ला दिला . गीतकार अभिलाष यांनी मग उर्दू हिंदी साहित्य वाचायचा सपाटाच लावला. साहीर यांनी  त्यांना सल्ला दिला होता “जादा पढो काम लिखो” त्याप्रमाणे त्याने सर्व साहित्य बारकाईने वाचायला सुरुवात केली. (Lyricist Abhilash)

काही वर्षानंतर ते मुंबईला आले. त्यांनी साहीर यांची भेट घेतली. काही निर्मात्यांची ओळख करून दिली. पण मुंबईचा संघर्ष मोठा होता. तो प्रत्येकाच्या वाट्याला येतो तसा त्यांच्या वाट्याला आला. साहीर यांनी  सांगितले, “माझ्यामुळे तुम्हाला पहिले काम नक्की मिळेल, पण नंतर मात्र तुमच्या कर्तुत्वाने तुम्हाला पुढे जावे  लागेल.” 

मुंबईत त्यांनी गीत लेखनासाठी ‘अभिलाष’ हे नाव घेतले. गीतकार अभिलाष यांना पहिला ब्रेक के महावीर यांनी दिला. ही गाणी लता मंगेशकर यांनी गायली होती. त्यांनी सलील चौधरींसोबत काम केले. १९७५ साली ‘रफ्तार’ या चित्रपटातील त्यांच्या गाण्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. हे गाणे होते ‘संसार है एक नदिया सुख दुख दो किनारे है..’ गाणे गाजले, पण चित्रपट फारसा न चालल्यामुळे अभिलाष यांचा संघर्ष चालूच राहिला. (Lyricist Abhilash)

१९८४ साली त्यांना एन. चंद्रा यांनी ‘अंकुश’ या चित्रपटातील गाणी लिहिण्यासाठी बोलावले. त्यांचा हा पहिलाच चित्रपट होता. तसेच नाना पाटेकर यांचा देखील हा पहिलाच चित्रपट होता. यातील बाकी गाणी लिहिली फक्त एक प्रार्थनागीत राहिले होते. एन चंद्रा यांनी सिच्युएशन सांगितली. या गाण्याने मात्र अभिलाष यांना खूप तरसवले. ते जंग जंग पछाडले. 

रोज तीन-चार गाणी लिहून म्युझिक रूम मध्ये जात असत. तेथे नाना पाटेकर ,संगीतकार कुलवंत सिंग  तसेच दिग्दर्शक एन चंद्रा उपस्थित असायचे. त्यांना काही केल्या अभिलाष यांनी लिहून आणलेले गाणे  पसंत पडत नव्हते. जवळ जवळपास दोन महिने दीड-दोनशे गाणी लिहिल्यानंतर शेवटी गीतकार अभिलाष कंटाळले. आणि हात जोडून त्यांना विनंती केली “कृपया आपण हे प्रार्थना गीत दुसऱ्या कोणाकडून तरी लिहून घ्या. मला आता जमणार नाही. शिवाय आता माझा आत्मविश्वास देखील कमी होत चालला आहे”. असे म्हणून ते उदास मनाने स्टुडीओ बाहेर पडले. ते स्वत: वरच चिडले होते. का साजेसे शब्द सुचत नाहीत? का जमत नाही? (Lyricist Abhilash)

संगीतकार कुलवंत सिंग त्यांच्या पाठोपाठ बाहेर आले. त्यांनी गाडीत अभिलाष यांना सांगितले, “अरे यार अभिलाष, तुम अपना विश्वास क्यू खो रहे हो? तुम्हारी काबिलीयत को मै जानता हूं. बहुत अच्छी है . तुम्हारी शब्दो में ‘शक्ती’ है. ‘मन’ मे दुबारा ‘विश्वास’ पैदा करो और गीत लिखो.” 

अभिलाष संगीतकार कुलवंतचा प्रत्येक शब्द ऐकत होते. त्याच वेळेला त्यांनी गाडी थांबवायला सांगितली. खिशातून डायरी काढली. आत्ता संगीतकाराने सांगितलेल्या शब्दातूनच त्यांना प्रार्थना गीताच्या ओळी सुचल्या! “इतनी शक्ती हमे दे न दाता मन का विश्वास कमजोर हो ना…”  त्यांनी  लगेच त्या ओळी  कुलवंत सिंगला सांगितल्या. कुलवंतला खूपच आवडल्या. (Lyricist Abhilash)

========

हे देखील वाचा – …यामुळे बिग बींनी बस स्टॉपवर असहाय्य अवस्थेत असलेल्या भारत भूषण यांना दिली नाही लिफ्ट

========

कुलवंत यांनी गाडी वळवली आणि परत म्युझिक रूमकडे नेली. एन चंद्रा आणि नाना पाटेकर ही मंडळी तिथे बसली होती. त्यांनाही या ओळी आवडल्या. सर्वांनी अभिलाषचे  कौतुक केले आणि “हेच तर आपल्याला हवे होते” असे म्हणत लवकर गाणे पूर्ण करायला सांगितले. त्या रात्रीच अभिलाश ते  संपूर्ण गाणे लिहून काढले. जवळपास दोन महिन्यांपासून चाललेली तळमळ, संघर्ष अखेर संपला. प्रतिभा पुन्हा जागृत झाली. ‘अंकुश’ चित्रपटातील हे प्रार्थना गीत  पुष्पा पागधरे, सुषमा श्रेष्ठ, मुरलीधर रोडे यांनी गायले. 

प्रार्थना गीत म्हणून भारतातील अनेक शाळा, कॉलेज मधून हे गीत आजही मोठ्या भक्ती भावाने गायले जाते. २७  सप्टेंबर २००० या दिवशी अभिलाष यांचे निधन झाले.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Celebrity Entertainment itni shakti hame dena data Lyricist Abhilash
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.