Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’

‘राऊडी राठौर २’ चित्रपटातून Akshay Kumar याचा पत्ता कट?

 Asambhav Movie Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन रहस्य आणि थराराचा अनुभव

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास

Dharmendra यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ

‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwad ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘ सोशल मीडिया

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अमिताभ बच्चन राखीला ‘दिदी’ म्हणून का संबोधत होता?

 अमिताभ बच्चन  राखीला ‘दिदी’ म्हणून का संबोधत होता?
बात पुरानी बडी सुहानी

अमिताभ बच्चन राखीला ‘दिदी’ म्हणून का संबोधत होता?

by धनंजय कुलकर्णी 07/11/2022

हिंदी सिनेमाच्या इतिहासातील पाने आपण जेव्हा पुन्हा एकदा चाळू लागतो; जुनी मासिके जुने अंक, जुने वर्तमानपत्र आपण ज्यावेळेला पुन्हा एकदा वाचू लागतो त्यावेळेला काही गंमतीदार प्रसंग वाचून आज हसू येते. अशीच एक बातमी १९७५ सालच्या एका सिने मॅगझीनमध्ये आली होती. ती बातमी अशी होती. ‘अमिताभ बच्चन यांचा राखी सोबत नायक बनण्यास नकार!’ सर्वांना ही बातमी वाचून खूप आश्चर्य वाटले. या निर्णयाचे  कारण अमिताभनेच दिले होते. ते त्याच्या दृष्टीने जास्त ‘मिनिंग फुल’ होते. त्यात अमिताभने सांगितले होते ,”मी राखीला दिदी म्हणतो. मग या दिदी सोबत मी नायक म्हणून कसं काय भूमिका करू शकतो? तिच्या सोबत रोमांस कसा काय करू शकतो?” (Amitabh Bachchan Story)

नेमका काय होता हा किस्सा?

राखीचा पहिला  हिंदी सिनेमा १९७० साली  राजश्री प्रॉडक्शनच्या ‘जीवन मृत्यू’  हा होता. या चित्रपटात तिचा नायक धर्मेंद्र होता. त्यापूर्वी १९६७  साली ‘बोधू बोरन’ या एका बंगाली सिनेमातून तिने आपला सिने प्रवास सुरू केला होता. १९७१  साली राखीने ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटात भूमिका केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनेते सुनील दत्त होते. याच सिनेमात अमिताभ बच्चन यांची देखील एक छोटी भूमिका होती. या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान राखी आणि अमिताभ यांची ओळख झाली. अमिताभच्या उंचीवरून राखी त्याची चांगलीच खेचत असे. यातूनच दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली. राखी त्या अर्थाने अमिताभला सीनियर होती. त्यामुळे अमिताभ तिला ‘दिदी’ या नावाने सेटवर संबोधत असे. (अमिताभ हा पहिल्यापासून च सुसंस्कृत वर्तनाचा कलावंत म्हणून सिने क्षेत्रात मशहूर होता.)  चित्रपट पूर्ण झाला. अमिताभ आणि राखी यांची मैत्री वाढत गेली.दोघे एकमेकांसोबत आपल्या भावना शेअर करीत असत. (Amitabh Bachchan Story)

१९७३  सालच्या ‘जंजीर’ नंतर अमिताभ सुपरस्टार बनला.याच वर्षी आलेल्या ‘दाग’,’ ब्लॅक मेल’ या सिनेमातून राखी देखील सक्षम अभिनेत्री म्हणून रसिकांच्या समोर आली होती.  १९७५ साली दिग्दर्शक यश चोप्रा अमिताभ बच्चन आणि राखी यांना घेऊन ‘कभी कभी’ या चित्रपटाची निर्मिती करणार होते. या चित्रपटात शशी कपूर आणि वहिदा रहमान तसेच ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या देखील भूमिका होत्या. ज्या वेळी यश चोप्रा यांनी अमिताभच्या सोबत राखीला कास्ट करण्याचे ठरवले त्यावेळेला अमिताभने त्याला स्पष्ट नकार दिला आणि त्याने सांगितले “जिला मी कायम दीदी म्हणून बोलावतो तिच्यासोबत मी रोमांस कसा काय करू शकतो?” यश चोप्रा यावर हसले. ते म्हणाले,” राखी सोबत तुझी चांगली मैत्री आहे. तिच्यासोबत तुला काम करायला काय अडचण आहे? दीदी हे तिला तू आदराने म्हणतोस.” नंतर राखीला जेव्हा हा प्रसंग कळाला, त्यावेळेला तिने अमिताभला फोन करून सांगितले,” आपण दोघेही प्रोफेशनल कलाकार आहोत. आपले रिल लाईफ आणि रियल लाईफ हे वेगवेगळे असते. रियल लाईफ मध्ये भले तू मला दीदी म्हणतोस. मला त्याचा आदरच आहे. पण एक कलाकार म्हणून याकडे पाहायला पाहिजे. त्यामुळे आपण एकत्र काम करणे अजिबात गैर नाही.”(Amitabh Bachchan Story)

=======

हे देखील वाचा : पिक्चर हिट है तो दिवाली है!

=======

राखीच्या या अधिकार वाणीच्या समजावणीने अमिताभ चित्रपटात काम करायला तयार झाले. ‘कभी कभी’ या चित्रपटाला माफक यश मिळाले. पण अमिताभ आणि राखी यांची जोडी मात्र पुढे चांगली जमली. कसमे वादे, त्रिशूल, मुकद्दर का सिकंदर, जुर्माना, काला पत्थर, लावारीस बरसात की एक रात, बेमिसाल  या चित्रपटातून हे दोघे प्रेक्षकांच्या समोर आले आणि हिट पेयर म्हणून ते लोकप्रिय झाले. (Amitabh Bachchan Story)

१९८०  साली  ज्या वेळी रमेश सिप्पी ‘शान’ या चित्रपटाची निर्मिती करत होते, त्या चित्रपटात राखी अमिताभच्या मोठ्या भावाची बायको म्हणजे वहिनीच्या भूमिकेत होती. प्रेक्षकांनी त्यांचे हे नाते इथे एक्सेप्ट केले होते. यानंतरचा रमेश सिप्पी  यांचा चित्रपट होता ‘शक्ती’ या चित्रपटात तर राखी अमिताभची चक्क आई बनली होती!

धनंजय कुलकर्णी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Bollywood bollywood update Entertainment Featured
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.