Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bollywood : मुस्लिम अभिनेता पाळायचा श्रावण तर ‘ही’ मराठी अभिनेत्री

Rajesh Khanna यांचा ‘तो’ बोल्ड चित्रपट जो केवळ ९ थिएटर्समध्ये

चला Mehboob Studio मध्ये…

Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Tango Malhar Movie Trailer: सिनेमातून उलगडणार रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास

MHJ Unplugged पॉडकास्ट सिरीजमध्येमधून उलगडणार आपल्या लाडक्या हास्यवीरांचं विनोदापलीकडलं आयुष्य

Kurla To Vengurla Trailer: ग्रामीण वास्तवाला विनोदी रंग देणारा कौटुंबिक

‘अमानुष’ : उत्तमकुमार- Sharmila Tagore यांचा अप्रतिम सिनेमा!

Siddharth Ray : “त्याला उचकी आली आणि…”, ‘अशी ही बनवाबनवी’तील

Jolly LLB 3: अक्षय कुमार-अर्शद वारसी येणार आमनेसामने!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

नर्गीसने नाकारलेल्या भूमिका

 नर्गीसने नाकारलेल्या भूमिका
बात पुरानी बडी सुहानी

नर्गीसने नाकारलेल्या भूमिका

by धनंजय कुलकर्णी 31/05/2023

आयुष्यातील प्रत्येक फ्रेम सुघटीत असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं पण प्रत्येकाच्याच वाट्याला असं परीपूर्ण आयुष्य येईल असं नसतं. मग विधात्याकडून मिळालेलं जीणं अधिकाधिक परीपूर्ण कसं करता येईल याकडे सार्‍यांचा प्रवास सुरू होतो. मायावी दुनियेत तर याचा प्रत्यय ठायी ठायी येताना दिसतो. अभिनेत्री नर्गीसच्या (Nargis Role) जीवनालेख अभ्यासताना तिने उभारलेलं कर्तृत्व पाहतानाच आयुष्याची तिने केलेली मांडणी व प्रत्येक प्रसंगात तिने घेतलेले ठाम निर्णय याचा तिच्या जीवनावर पडलेला प्रभाव ठळकपणे दिसून येतो. ११ मार्च १९५८ ला तिने सुनील दत्त सोबत विवाह केला आणि आपला सारा भूतकाळ तिने एका क्षणात पुसून टाकला. राजकपूर हे नाव तिने डिलीट करताना तिने कुठेही कटूता ठेवली नाही. तिच्या मृत्युपर्यंत राज-नर्गीसच्या प्रेमकहाणीच्या किस्स्यांनी ती विचलीत झाली नाही. सुनील दत्तच्या मागे ती हिमालयासारखी उभी राहीली. लग्नाच्या वेळी तिच्या हातात असलेले ’अदालत’,’लाजवंती’, ’घरसंसार’ हे चित्रपट तिने आधी पूर्ण केले आणि रूपेरी पडद्यापासून निवृत्ती घेतली. आपली सिनेमातील मंडळी घटनांना कॅश करण्यासाठी इच्छुक असतात. दक्षिणेतील एक निर्माते वासन सुनील दत्त-नर्गीस यांना घेवून एक सिनेमा बनवनार होते व यासाठी दोघांना घसघसशीत असे पाच लाख मानधन द्यायला ते तयार होते!पण नर्गीसने ती ऑफर नाकारली. (Nargis Role)

अजंठा आर्टसच्या बॅनरखाली त्यांनी चित्रनिर्मिती सुरू केली. ’मुझे जीने दो’ (१९६१) या सिनेमा पासून सुनील निर्माता बनला. ’यादे’ हा जगातील पहिला एकपात्री सिनेमा निर्माण करण्याची कल्पना तिचीच होती. पण हा प्रयोग यशस्वी झाला नाही. मोठ्या आर्थिक नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी नर्गीसकडे (Nargis Role) पुन्हा निर्मात्यांनी सिनेमात काम कर्ण्यासाठी गळ घालण्याचे प्रकार सुरू झाले. बिमल रॉय यांनी ’बंदीनी’तील नूतनची भूमिका तिलाच आधी ऑफर केली होती. पण नर्गीस आपल्या ’उसुल की पक्की’ होती. खरं तर नर्गीस हा बंदा रूपया होता. तिची लोकप्रियता तिला कॅश करता येवू शकली असती पण तसे तिने केले नाही. राजकपूरला ‘संगम’च्या वेळी पुन्हां तिची आठवण झाली.’अंदाज’ चा प्रणयी त्रिकोण त्याला पुन्हा बनवायचा होता. सत्यजित रे यांनी त्यांच्या ’अभिजान’ साठी तिलाच विचारलं होतं. (पुढे हि भूमिका वहिदाने केली)(Nargis Role)

=======

हे देखील वाचा : सुनील दत्तचा एक ’पात्री’ प्रयोग

=======

मराठीत ’अन्नपूर्णा’ हा सिनेमा बनविणारे सदाशिव रावकवी यांना हाच सिनेमा हिंदीत बनवायचा होताव त्यातील सुलोचनाबाईंनी केलेली भूमिका नर्गीसला (Nargis Role) द्यायची होती. या सर्व सिनेमांना तिने नम्र नकार दिले. १९६७ साली नर्गीसचा एक सिनेमा आला होता ’रात और दिन’ हा सिनेमा स्विकारण्याचे कारण तो सिनेमा तिच्या भावाने जाफर हुसैन याने बनवला होता. या सिनेमा करीता तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९७१ साली अजंठा आर्टसचा ’रेशमा और शेरा’ आला. सिनेमाला हवं तितकं यश नाही मिळालं. ’मन का मीत’ कधी आला कधी गेला कळालेच नाही. त्या वेळी राज खोसला आणि गुलझार यांनी अनुक्रमे ’मै तुलसी तेरे आंगन की’ आणि ’आंधी’ करीता विचारले होते. नर्गीस आपल्या भूमिकेवर ठाम होती.सुनीलदत्तचे करीयर स्वत:च्या हिमतीने घडावे म्हणून तिने आपला निर्णय बदलला नाही. रसिक प्रेक्षक मात्र नर्गीसने नाकारलेल्या एवढ्या भूमिका पाहून नक्कीच हळहळले!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Bollywood bollywood update Celebrity Entertainment Featured nargis Roles rejected
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.