Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Makadchale Marathi Drama: बाल प्रेक्षकांना मनसोक्त आनंद देणाऱ्या ‘माकडचाळे’ नाट्याचा दिवाळीत शानदार

Manthan Movie : काय कनेक्शन होते ‘या’ गाण्याचे प्रिन्स चार्ल्स

तुझा पाहूनी सोहळा । माझा रंगला अभंग ।।; Abhanga Tukaram

Chiranjeevi Hanuman – The Eternal या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार राजेश

…जेव्हा नीतू कपूर यांनी Rishi Kapoor यांच्या अफेअर्सना One Night

Prasad Jawade आणि अमृताने अचानक सोडले राहते घर,व्हिडिओ पोस्ट करत

डॉ. प्रेमानंद रामाणी यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा ‘ताठ कणा’ २८ नोव्हेंबरला होणार

Red Soil Stories च्या शिरीष गवसला नेमकं काय झाल होत?

Onkar Bhojane ची घर वापसी; ‘या’ दिवसापासून पुन्हा दिसणार हास्यजत्रेत… 

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

जेव्हा चार दिग्गज स्वर एका गाण्यासाठी एकत्र येतात…

 जेव्हा चार दिग्गज स्वर एका गाण्यासाठी एकत्र येतात…
बात पुरानी बडी सुहानी

जेव्हा चार दिग्गज स्वर एका गाण्यासाठी एकत्र येतात…

by धनंजय कुलकर्णी 05/08/2024

हिंदी सिनेमा प्लेबॅक सिंगिंगची प्रथा तीसच्या दशकात सुरू झाली. १९३५ सालच्या ‘धूप छाव’ या सिनेमासाठी पहिल्यांदा हा प्रयोग केला गेला. संगीतकार होते पंकज मलिक आणि आर सी बोराल. चाळीसच्या दशकात ती कला खऱ्या अर्थाने बहरली. स्वातंत्र्यानंतर हळूहळू चार प्रमुख स्वरांनी या क्षेत्रात आपलं स्थान पक्क केलं. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि मुकेश. अर्थात आशा भोसले, तलत महमूद, हेमंत कुमार, मन्ना डे, सुमन कल्याणपूर, उषा मंगेशकर यांचे स्वर देखील सोबतीला होतेच पण भारतीय चित्रपट संगीतातील चार प्रमुख गायक कलावंतांची नावे सांगायची तर वर सांगितलेलीच चार नावे आधी घ्यावी लागतील. (Manmohan Desai)

अर्थात या सर्व गायक कलाकारांच्या स्वरांनी भारतीय चित्रपट संगीत अधिकाधिक समृद्ध होत गेले हे नक्की. पण या चार प्रमुख गायकांना घेऊन एकत्र गाणं करावं असा प्रयत्न आधी झाला होता की नाही माहित नाही पण तो सफल झाला सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात. या चार दिग्गजांना एकत्र आणून एक गाणं बनवण्याचं क्रेडिट जातं दिग्दर्शक मनमोहन देसाई (Manmohan Desai) यांना. दिग्दर्शक मनमोहन देसाई हे नाव सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील मसाला मनोरंजक सिनेमासाठी अग्रक्रमाने घ्यावे असे होते. अमिताभ बच्चन यांची कलाकार कारकीर्द घडवण्यामध्ये मनमोहन देसाई यांचा मोठा हात होता.

१९७७ साली त्यांचा एक चित्रपट आला होता ज्याची निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांनी स्वत: केले होते. या चित्रपटाचे नाव ते ‘अमर अकबर अँथनी’.  हा एक मल्टीस्टारर मसाला इंटरटेनमेंट सिनेमा होता. त्यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा तो चित्रपट होता. अमिताभ बच्चन याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार याच चित्रपटासाठी मिळाला होता. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, ऋषी कपूर, परवीन बाबी, शबाना आजमी, नीतू सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या. एवढे मोठे स्टार असल्यामुळे सिनेमाला एक वेटेज आले होते.

मनमोहन देसाई यांना वाटलं की एवढ्या मोठ्या स्टारला घेऊन आपण एक गाणं बनवावे. आता एवढे कलाकार आहेत तर आवाज देखील तेवढे लागतील. पण मनमोहन देसाई (Manmohan Desai) यांनी सहा ऐवजी चार स्वर गाण्यांमध्ये वापरायचे ठरवले. पुरुष गायकांमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासाठी किशोर कुमार, ऋषी कपूर यांच्यासाठी मोहम्मद रफी, आणि विनोद खन्नासाठी मुकेश तर तिन्ही नायिका परवीन बाबी, नीतू सिंग आणि शबाना आजमी या तिघींसाठी फक्त एकाच म्हणजे लता मंगेशकर यांचा स्वर यांनी वापरायचे ठरवले. चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच हे चार स्वर एकत्र आले होते. आनंद बक्षी यांनी हे गाणं लिहिलं होतं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी त्याला साजेस संगीत दिलं.

हे गाणं होतं ‘हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे….’ या सिनेमात ऋषी कपूरने एका कव्वालचा रोल केला होता त्यामुळे या गाण्यातील त्याच्या वाट्याला आलेले कडव्यात देखील कव्वालीचा ठेका पकडला आहे. ही आयडीया मनमोहन देसाई (Manmohan Desai) यांची होती. विनोद खन्नासाठी धीर गंभीर आवाजामध्ये मुकेश गातो तर किशोर कुमार अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातील अँथनीच्या स्टाईलमध्ये गातो. या गाण्याच्या रेकॉर्डिंगला खरोखरच धमाल आली असणार. हे चार दिग्गज स्वर केवळ या एकाच गाण्यात एकत्र आले पुन्हा कधीच एकत्र आले नाहीत.

==========

हे देखील वाचा : फोनवरील एका संवादातून गुलशन बावरा यांना सुचले रोमॅण्टिक गाणे!

==========

या गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर काही दिवसातच मुकेश यांचे निधन झालं. हा चित्रपट १९७७ साली प्रदर्शित झाला. प्रचंड हिट झाला. हे गाणं देखील प्रचंड चाललं. यानंतर चार वर्षांनी १९८१ साली मनोज कुमार यांचा ‘क्रांती’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटात देखील तीन दिग्गज गायक एकत्र आले होते. किशोर कुमार, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी गाण्याचे बोल होते ‘चना जोर गरम बाबू मै लाया मजेदार …’ या गाण्यात आणखी एक चौथा स्वर होता तो होता नितीन मुकेश यांचा! त्या वेळी मुकेश यांचे निधन झाले होते म्हणून मुकेशच्या ऐवजी नितीन मुकेश यांचा स्वर वापरला गेला. जर इथे देखील मुकेशचा स्वर वापरला असता तर हे दुसरं गाणं झालं असतं ज्यात हे चार प्रमुख स्वर वापरले गेले.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Amar Akbar Anthony Amitabh Bacchan Bollywood bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Kishore Kumar lata mangeshkar Mohammed Rafi Mukesh
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.