
Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….
९०च्या दशकातील क्वीन अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच तिच्या एक्स नवऱ्याचं संजय कपूरचं (Sunjay Kapoor) निधन झालं असून पुन्हा एकदा करिश्मा कपूरच्या नात्याबद्दल आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. मात्र, संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधण्यापूर्वी करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या नात्याबद्दल सगळ्यांनाच माहित होतं… मात्र, करिश्मा-अभिषेकचा साखरपुडा का मोडला? याचं कारण आजही गुलदस्त्यातआहे… जाणून घेऊयात करिश्मा-अभिषेकच्या नात्याबद्दल…(Abhishek Bachchan and Karishma Kapoor relationship)

बॉलिलूडमध्ये कपूर आणि बच्चन कुटुंब यांचा एक दबदबा होता आणि आजही आहे… एकेकाळी ही दोन्ही कुटुंब एकमेकांची व्याही होणार होते. करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन सिरीयस रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांचा साखपूडा देखील झाला होता. इतकंच नाही तर जया बच्चन सगळ्याच सोशल इव्हेंट्समध्ये करिश्माची ओळख होणारी सून अशीच करुन देत होत्या…(Bollywood news)

दरम्यान, ५ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अभिषेक व करिश्मा लग्न करणार होते. त्यांच्या लग्नाची घोषणा खुद्द जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी अमिताभ बच्चन यांच्या ६० व्या वाढदिवशी केली होती. मात्र, साखपपूड्यानंतर काही महिन्यांमध्येच करिश्मा व अभिषेकमध्ये दुरावा आला आणि दोघांचं ब्रेकअप झालं. त्यांचं नातं का तुटलं याची बरीच कारणं समोर आली. यापैकी लग्नानंतर करिश्माने चित्रपटांमध्ये काम करू नये, अशी बच्चन कुटुंबाची इच्छा होती, म्हणून लग्न मोडल्याचं बोललं गेलं. शिवाय अशीहीअफवा होती की करिश्माची आई बबिता कपूर (Babita Kapoor) यांच्यामुळे या दोघांचं ब्रेकअप झालं. बबिता कपूर यांनी बच्चन कुटुंबापुढे काही अटी ठेवल्या. त्यामधील एक अट म्हणजे बच्चन कुटुंबाने लग्नाआधी संपत्तीचा काही भाग अभिषेक याच्या नावावर करायचा अशी होती. मात्र, ही अट अमान्य झाल्यामुळे त्यांचं नातं तुटलं असं म्हटलं गेलं…(Bollywood gossip)
================================
=================================
मात्र, कधीच अधिकृतपणे करिश्मा किंवा अभिषेकने त्यांचं ब्रेकअप का झालं याचं कारण सांगितलं नाही… अभिषेकसोबत ब्रेकअप झाल्यानंतर काही महिन्यांनी करिश्मानं दिल्लीतील उद्योगपती संजय कपूरशी लग्न केलं होतं, आणि त्यांचा काही वर्षांनी घटस्फोट झाला. तर अभिषेकने ऐश्वर्या राय (Aishwerya Rai) हिच्यासोबत लग्न केलं…(Entertainment)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi