‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Akshay Kumar याचा ‘वेलकम टु द जंगल’ चित्रपट का अडकलाय?
अक्षय कुमार याच्या हाऊसफुल्ल ५ या मल्टि स्टारकास्ट चित्रपटानंतर लवकरच ‘वेलकम टु द जंगल’ (Welcome To the Jungle) हा चित्रपट लवकरच येणार आहे… या चित्रपटात १०-१२ नाही तर तब्बल २५ पेक्षा अधिक कलाकार एकत्र दिसणार आहेत… २०००मध्ये ‘हेरा फेरी’, ‘वेलकम’ अशा कॉमेडी चित्रपटांनी प्रेक्षकांना खळखळवून हसवलं त्या चित्रपटांचे सीक्वेल्सही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत… २००७ मध्ये आलेला वेलकम चित्रपट जसा अजरामप झाला त्यापेक्षाही जास्त मजनु आणि उदय शेट्टी ही जोडी आणि त्यांचे प्रत्येक डायलॉग झाले… याच चित्रपटाचा तिसरा भाग ‘वेलकम टु द जंगल’ लवकरच येणार असून या चित्रपटाच्या शुटींगबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे…

‘वेलकम’ आणि ‘वेलकम बॅक’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अनीझ बाजमी यांची होती तर आता तिसऱ्या भागाचं दिग्दर्शन अहमद खान करणार आहेत.दरम्यान, आर्थिक अडचण आणि कलाकारांचं मानधन न दिल्यामुळे या चित्रपटाचं शुटींग थांबल्याच्या बातम्या सगळीकडे पसरल्या होत्या.. मात्र आता दिग्दर्शक अहमद खान यांनी याबद्दल खुलासा केला असून चित्रपटाचे दोन मोठे स्केड्युल्स पुर्ण झाले असून पहलगाम हल्ल्यामुळे शुटींग थांबवल्याचं ते म्हणाले आहेत. अहमद म्हणाले की,”जूनमध्ये आम्ही काश्मीरमध्ये तिसरं शेड्यूल सुरू करणार होतो. मात्र, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला काश्मीरचं शूटिंग स्थगित करावं लागलं.आता आम्ही काश्मीरऐवजी कुल्लू किंवा इतर ठिकाणी शूटिंग करण्याचा विचार करत आहोत. मात्र, आता संपूर्ण वेळापत्रक नव्याने आखावं लागणार आहे. विशेष म्हणजे ३० पेक्षा जास्त कलाकारांच्या डेट्स आणि त्यांना एकत्र आणणं देखील मोठं आव्हान आहे”. त्यामुळे अक्षय कुमारचा ‘वेलकम टु द जंगल’ हा चित्रपट पैश्यांची अडचणींमुळे अडकला नसल्याचं दिग्दर्शकांच्या सांगण्यावरुन तरी स्पष्ट झालं आहे…
================================
हे देखील वाचा: Multi Star Cast Movies – भारतीय चित्रपटसृष्टीचा बदलता काळ!
=================================
दरम्यान, ‘वेलकम टु द जंगल’ या चित्रपटात ३० पेक्षा अधिक कलाकार दिसणार असून मल्टि स्टारकास्ट चित्रपटांचा हा बाप असणार असं म्हटलं जात आहे… या चित्रपटात अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पाटनी, संजय दत्त, रणदीप हुड्डा, श्रे.स तळपदे, लारा दत्ता, सुनील शेट्टी, परेश रावल, जॉनी लिव्हर, रवीना टंडन, राजपाल यादव, अर्शद वारसी, शारीब हाश्मी असे अनेक कलाकार झळकणार आहेत… मात्र, वेलकम चित्रपटाचा आत्मा असणारी दोन पात्र मजनू (अनिल कपूर) आणि उदय शेट्टी (नाना पाटेकर) या तिसऱ्या बागात नसल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे… आता दोन महत्वाची पात्र नसूनही अक्षय कुमारचा ‘वेलकम टु द जंगल’ चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पुर्ण करु शकणार का याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi