Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Amir Khan : मुन्नाभाईतून संजयला रिप्लेस करणार होता आमिर खान?
‘रंग दे बसंती’, ‘अंदाज अपना अपना’, ‘राजा हिंदुस्थानी’, ’दंगल’, ‘पीके’ अशा अनेक चित्रपटातून आयकॉनिक भूमिका साकारणाऱ्या Mr Perfectionist आमिर खान याला बॉलिवूड इंडस्ट्रीत ३७ वर्ष पुर्ण झाली. बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी नाही तर प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी कंटेन्ट बेस्ड़ चित्रपट करणाऱ्या आमिर खानने नुकताच ‘आमिर खान : सिनेमा का जादुगार फिल्म फेस्टिवल’ लॉंच केला. इतकी वर्ष चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर काही अजरामर चित्रपटांना आमिरने नकार दिला होता त्याबद्दल त्यानेच खुलासा केला आहे. तुम्हाला माहित आहे का ‘लगे रहो मुन्नाभाई’ हा चित्रपट आमिरला ऑफर करण्यात आला होता? त्याने तो रिजेक्ट का केला होता? जाणून घेऊयात… (Untold Stories)
राजकुमार हिरानी यांच्या ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ (Munnabhai MBBS) चित्रपटाने इतिहास रचला आहे. असा एकही व्यक्ती सापडणार नाही जो मुन्नाभाई आणि सर्किटचा फॅन नसेल. पहिल्या भागाला मिळालेल्या सुपरहिट यशानंतर राजकुमार हिरानी यांनी ‘मुन्नाभाई २’ अर्थात ‘लगे रहो मुन्नाभाई’ करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट खरं तर आमिर खानला राजकुमार हिरानी यांनी ऑफर केला होता. याबद्दल बोलताना Amir Khan म्हणाला, “गांधीगिरी या संकल्पनेवर आधारित ‘मुन्नाभाई २’ हा चित्रपट तयार केला जाणार होता. मला ती संकल्पना आवडली पण होती पण त्यानंतर काही बदल करुन राजकुमार हिरानीने मला पुन्हा कथा ऐकवली. आणि त्यात बरेच बदल केल्यानंतर माझ्यासाठी किंवा माझ्या अभिनयाच्या स्टाईलनुसार कोणतं पात्र त्या चित्रपटात सामिल करता येत नव्हतं. आणि त्यामुळेच मी Lage Raho Munnabhai चा भाग होऊ शकलो नाही. (Bollywood Update)
===========
हे देखील वाचा : Indian Cinema : शुटींगसाठी लागली २३ वर्ष; वर्ल्ड रेकॉर्ड आणि बरंच काही….
===========
पुढे आमिर ‘लगे रहो मुन्नाभाई’ची आधीची स्क्रिप्ट काय होती हे सांगताना तो म्हणाला की, “चित्रपटाच्या जुन्या कथेत स्वातंत्र्यलढ्यात सामिल होणाऱ्या एका स्वातंत्र्यसैनिकाच्या डोक्यावर लाठीचार्जमुळे दुखापत होते आणि त्यामुळे तो कोमामध्ये जातो. बरीच वर्ष उलटून गेल्यानंतर जेव्हा तो कोमामधून बाहेर येतो त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं पण तरीही तो व्यक्ती पारतंत्र्य काळातच अडकला असतो. मात्र, नंतरचा कथेत बदलकरुन गांधीगिरी ही संकल्पना लिहीली गेली आणि समोर आला लगे रहो मुन्नाभाई हा चित्रपट”. (Entertainment Tadaka)

बरं असेही काही चित्रपट होते जे स्वत: आमिरने नाकारून इतर कलाकारांची नावं सजेस्ट केली होती. त्यापैकी एक चित्रपट होता ‘बजरंगी भाईजान’. या चित्रपटाबद्दल बोलताना आमिर खान म्हणाला की, ज्”यावेळी मी कथा ऐकली तेव्हाच मी लेखकाला सांगितलं की या रोलसाठी Salman Khan फिट होईल. मला कथा आवडली होती पण त्यात सलमान जास्त उत्तम काम करेल असं मला वाटल्यामुळे मी त्याचं नाव सुचवलं. पण लेखक कबीर खान यांच्याकडे गेला आणि मग कबीर खान यांनी सलमानला तो रोल ऑफर केला”. (Bajrangi Bhaijaan)

संजय दत्त, सलमान नंतर Shahrukh Khan ने साकारलेला ‘डर’ हा चित्रपट आधी आमिर खानला ऑफर झाला होता. “चित्रपटाचं कथानक आणि त्यात खलनायकाची भूमिका दिग्दर्शक यश चोप्रा ज्या दृष्टीने पाहात होते त्यात मी स्वत:ला पाहात नव्हतो. त्या भूमिकेसाठी शाहरुख अगदी योग्य अभिनेता वाटत होता. आणि डर चित्रपटात जो खलनायक शाहरुखने साकारला आहे तसा मी साकारु शकलो नसतो,”असं आमिर खान म्हणाला. (Amir Khan Movies)