Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘मला माहीत नाही मी परत येईल की नाही…’ Neha Kakkar

Punha Ekda Saade Maade 3 Trailer : कुरळे बंधू परतले…

Shiv Thakare ‘या’ वर्षी करणार लग्न; स्वत:चं दिली वेडिंग अपडेट

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात येणार मोठा ट्विस्ट;

रणजीत गजमेर यांचे मादल वाद्य आणि त्यावरची R.D.Burmanची बेहतरीन गाणी!

Big Boss Marathi Season 6 च्या घरातील चावी चोराचा रितेश

Rajkumar Rao-Patralekha यांनी लेकीचं ठेवलंय ‘हे’ नाव, हिंदू संस्कृतीशी नावाचं

“Dilip Kumar यांनी पाकिस्तानातच राहाला जावं”; बाळासाहेब असं का म्हणाले

Maya Marathi Movie: नात्यांची निःशब्द कहाणी सांगणाऱ्या सिनेमाचे मोशन पोस्टर

SHATAK : RSS शताब्दीच्या निमित्ताने ‘शतक’ चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘व्यक्ती आणि वल्ली’साठी खुद्द पु. ल. देशपांडेनीच केली होती अतुल यांची निवड

 ‘व्यक्ती आणि वल्ली’साठी खुद्द पु. ल. देशपांडेनीच केली होती अतुल यांची निवड
आठवणींच्या पानावर

‘व्यक्ती आणि वल्ली’साठी खुद्द पु. ल. देशपांडेनीच केली होती अतुल यांची निवड

by Jyotsna Kulkarni 15/10/2024

अतुल परचुरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अतिशय हुशार, हरहुन्नरी, बहुआयामी अभिनेता अशी ओळख कमावलेल्या अतुल यांनी आपल्या अभिनयाने सर्वांचे भरभरून मनोरंजन केले. रंगभूमीवरील खरा रंगकर्मी म्हणून देखील त्यांना ओळखले जायचे. विनोदी अभिनेता अशी ओळख असलेल्या अतुल यांनी कधीच कोणत्याही एका भूमिकेत किंवा एक सारख्या भूमिकांमध्ये न अडकता विविधांगी भूमिका साकारल्या.

जवळपास चार दशकं या क्षेत्रात काम करणाऱ्या अतुल यांना खरी ओळख मिळाली ती पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या नाटकामुळे. या नाटकासाठी खुद्द पु. ल यांनीच अतुल यांची निवड केली होती. याबद्दल त्यांनी एका मुलाखतीमध्ये देखील भाष्य केले. अतुल यांना या नाटकामध्ये काम करण्याची संधी कशी मिळाली जाणून घेऊया.

‘ब्रँड अँबॅसिडर ऑफ पु.ल.देशपांडे’ अशी ओळख असलेल्या अतुल परचुरे यांनी १९९५ साली एकदा वृत्तपत्रामध्ये वाचले होते की, ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे नाटक रंगभूमीवर येत आहे. अतुल हे पु ल यांचे खूप मोठे चाहते होते. त्यातही पु ल यांचे ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे पुस्तक तर त्यांना तोंडपाठ होते. त्यांना जेव्हा समजले या पुस्तकावर नाटक येते तेव्हा त्यांना मनोमन वाटले की यात आपण एक भूमिका करावी. किंवा या नाटकात आपल्याला एक भूमिका मिळावी. अतुल यांनी या नाटकात मुख्य भूमिकेसाठी विक्रम गोखले किंवा दिलीप प्रभावळकर यांच्यापैकी एकाची निवड होईल असा विचार केला होता. त्यांना या नाटकातील भूमिका भूमिकेसाठी विचारणा होईल असे त्यांना कधीच वाटले नव्हते.

मात्र एक दिवस अतुल यांना निर्मात्याचा फोन आला आणि त्यांनी अतुल यांना ”तू व्यक्ती आणि वल्लीमधील पु.लं. रोल करशील का?” अशी विचारणा केली. यातली सर्वात महत्वाची बाब म्हणजे खुद्द पु ल यांनी देखील व्यक्ती आणि वल्ली नाटकासाठी अतुल यांच्या नावाला होकार दिला होता.

अतुल यांनी पुढे सांगितले होते की, त्याकाळी त्यांची पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व किंवा त्यांचे बाह्य व्यक्तिमत्व तरुण काळातील पु.ल. यांच्याशी मिळते जुळते होते. अतुल यांना विचारण्यापूर्वीच नाटकाच्या निर्मात्यांनी पु.ल. ना विचारले होते की अतुल परचुऱ्यांना ही भूमिका द्यायची का? त्यावर पु.ल. यांनी देखील लगेच होकार सुद्धा दिला होता. मात्र तेव्हा अतुल यांची पु.ल. यांच्याशी ओळख नव्हती. नेमका त्याच काळात पु. ल यांच्या आजारपणाला सुरुवात झाली होती.

=============

हे देखील वाचा : तब्बल अठरा वर्षाचा काळ लागला ‘हे’ गाणे बनायला

=============

मुख्य गोष्ट म्हणजे पुलंसमोर पु.ल साकारणारे अतुल परचुरे एकमेव अभिनेते होते. कारण, ९५ साली व्यक्ती आणि वल्ली नाटक आले आणि ते साधारण दोन-तीन वर्ष चालले आणि त्यानंतर ते नाटक थांबले गेले. २००१ मध्ये दुर्दैवाने पुलं यांचे निधन झाले. त्यानंतर पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आले मात्र तेव्हा ते नाटक आणि त्या नाटकातील पुलं पाहायला स्वतः पुलं समोर नव्हते.

दरम्यान अतुल परचुरे यांचे १४ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले. त्यांनी मराठीमध्ये नाटक, मालिका, चित्रपट अशा सर्वच माध्यमांमध्ये काम करत रसिकांचे मनोरंजन केले. यासोबतच त्यांनी अनेक हिंदी शो आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. अतुल यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे,

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Atul parchure Atul Parchure and p l deshpande atul parchure death p l deshpande vyakti ani valli अतुल परचुरे अतुल परचुरे आणि पुलं अतुल परचुरे आणि व्यक्ती वल्ली नाटक अतुल परचुरे निधन अतुल परचुरे माहिती
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.