Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…

मराठी नाटक पाहून भारावली Tabu, कलाकारांचं केलं तोंडभरून कौतुक!

Karishma Kapoor ने ‘दिल तो पागल है’ मध्ये माधुरी दीक्षितसोबत

Aranya Movie Teaser: हार्दिक जोशीच्या ‘अरण्य’ सिनेमाचा दमदार टीझर रिलीज प्रदर्शित

Bigg Boss 19: सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’ चे घर

Dastak : राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा मदनमोहन यांचा चित्रपट

Dada Kondke : “मी मांडीवर दादांचं प्रेत घेऊन…”

Vidya Balan नाही तर ‘या’ अभिनेत्री असत्या ‘परिणीता’मधील लोलिता!

Rajinikanth  आणि मिथुन चक्रवर्ती ३० वर्षांनी पुन्हा एकत्र दिसणार?

Kareena Kapoor : ‘जब वी मेट’ चित्रपटात ‘गीत’च्या भूमिकेत लागलेली

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

नवी सेन्सॉर‘बाधा’: अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा?

 नवी सेन्सॉर‘बाधा’: अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा?
कलाकृती विशेष

नवी सेन्सॉर‘बाधा’: अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा?

by प्रथमेश हळंदे 09/04/2021

कोरोनामुळे आलेलं आर्थिक संकट, लॉकडाऊनमुळे चित्रीकरणात येणारी तांत्रिक बाधा, डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर येऊ घातलेले निर्बंध आणि पायरसीचं वाढतं वर्चस्व अश्या एक ना दोन संकटांना तोंड देताना मनोरंजन क्षेत्र जेरीस आलेलं आहे. त्यात सेन्सॉरशिपची टांगती तलवार या क्षेत्राच्या पाचवीलाच पुजलेली. त्याच तलवारीला धार लावणारा नवा नियम भारत सरकारने नुकताच जाहीर केला असून, चित्रपट व्यवसाय आता चांगलाच कोंडीत अडकलेला आहे.


भारत सरकार आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या (Information & broadcasting ministry) आदेशानुसार हा नवा नियम लागू केला असून, या नियमानुसार चित्रपट प्रमाणपत्र अपिलीय लवाद (FCAT) बरखास्त करण्यात आलेले आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या (CBFC) अखत्यारीत असलेला हा अपिलीय लवाद अनेक चित्रपटनिर्मात्यांसाठी वरदान ठरला होता. या लवादाचा वापर करून सेन्सॉर बोर्डाच्या अस्वीकारार्ह निर्णयांविरुद्ध अपील आणि त्यांचे खंडन करण्याची प्रक्रिया चित्रपटनिर्मात्यांसाठी सहजसोपी झाली होती. पण आता नव्या नियमानुसार, सेन्सॉरशिपचे जाचक नियम हटवण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांना आता थेट उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागणार आहेत.

Censorship — Signature Theatre

एखादा सिनेमा बनवून पूर्ण झाल्यानंतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निर्माते व दिग्दर्शकांना सेन्सॉरशिपचं (Censorship) दिव्य पार करावं लागतं. सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले बदल जर चित्रपटाच्या मूळ आशयाला घातक ठरत नसतील, तर तसे बदल करून प्रेक्षकांपुढे तो सेन्सॉर्ड चित्रपट सादर केला जातो. पण बऱ्याचदा हे बदल चित्रपटाच्या आशय व निर्मितीमूल्याला बाधक ठरतात. अश्यावेळी अपिलीय लवादाच्या आधाराने आवश्यक त्या तडजोडी कमी वेळात करून चित्रपट प्रमाणित केले जात होते. पण आता या लवादाच्या बरखास्तीमुळे ही नाखुषी उच्च न्यायालयात मांडली जाणार असून, चित्रपट व्यवसायासाठी हा धोक्याचा इशारा समजला जात आहे. जिथे महत्त्वाचे खटलेही वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात, तिथे मनोरंजन क्षेत्राला कितपत प्राधान्य देण्यात येईल, याबद्दल चित्रपट व्यावसायिक साशंक आहेत. कोरोनाच्या उद्रेकामुळे कोलमडून पडलेलं मनोरंजन क्षेत्र पाहता, उच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत लांबणीवर पडत जाणारी रिलीज डेट आणि पोस्ट प्रोडक्शनच्या खर्चाची समीकरणे जुळवण्यासाठी चित्रपट व्यावसायिकांना प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे.

हे देखील वाचा: सेलिब्रिटीज, मतस्वातंत्र्य आणि मीडिया… !

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांनी ४ एप्रिल २०२१ रोजी या नव्या आदेशावर शिक्कामोर्तब केले. या नव्या अध्यादेशानुसार जुन्या सिनेमॅटोग्राफ कायद्यातील ‘अपिलीय लवादा’चा उल्लेख काढून त्याठिकाणी ‘उच्च न्यायालया’चा पर्याय देण्यात आलेला आहे. गेल्या काही वर्षांत ‘उडता पंजाब’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, ‘बाबूमोशाय बंदूकबाज’, ‘MSG-द मेसेंजर ऑफ गॉड’, ‘हरामखोर’ अश्या कैक वादग्रस्त आणि संवेदनशील चित्रपटांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेण्याबाबत अपिलीय लवादाने महत्त्वाची भूमिका निभावली असून, अचानकपणे झालेल्या या बरखास्तीने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्याची भावना सध्या चित्रपटसृष्टीतून व्यक्त केली जात आहे.

Such a sad day for cinema

FILM CERTIFICATION APPELLATE TRIBUNAL ABOLISHED | 6 April, 2021

https://t.co/MoqSGROdLP

— Vishal Bhardwaj (@VishalBhardwaj) April 6, 2021

सुप्रसिद्ध दिग्दर्शक, संगीतकार विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) यांनी सिनेजगतासाठी हा दुर्दैवी दिवस असल्याचं म्हणलं आहे. त्याचबरोबर अनुराग कश्यप (Anurag Kashyap), गुनीत मोंगा, करण अंशुमन, रिचा चड्ढा, जय मेहता इत्यादी सेलिब्रिटींनीही सरकारच्या या अध्यादेशावर टीका केली असून, प्रख्यात दिग्दर्शक हंसल मेहतांच्या मते, हा मनमानी आणि जाचक अध्यादेश चित्रपट निर्मात्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. अभिनेता वरुण ग्रोव्हरने या अध्यादेशाबद्दल आनंद व्यक्त करत सरकारने आता CBFC देखील बंद करावी, अशी खोचक टीका केली आहे. एकीकडे या अध्यादेशावर भरपूर टीका होत असताना दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्रींनी या निर्णयाचे समर्थन केले आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: CBFC Censorship Entertainment FCAT Government Kalakruti Media News Rules
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.