Aamir Khan : “बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा ‘पाकिस्तान’चं उघडपणे नाव माझ्याच चित्रपटात

Shahid-Kareena : इम्तियाज अलींनी ‘जब मी मेट २’ बद्दल केलं महत्वाचं विधान
काही चित्रपट कधीच काळबाह्य होत नाहीत. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे ‘जब वी मेट’ (Jab We Met). इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला आणि आजही १८ वर्षांनी त्या चित्रपटाची कथा आपलीशी वाटते. करिना कपूर-खान आणि शाहिद कपूर यांची गीत आणि आदित्य ही पात्र आजचा प्रत्येक तरुण स्वत:मध्ये शोधत असेल हे नक्कीच. शाहिद-करिनाच्या (Shahid-Kareena) ब्रेकअपनंतर बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा या दोघांचं IIFA Awards 2025 मध्ये रियुनियन झालेलं पाहायला मिळालं आणि लोकांनी पुन्हा एकदा या दोघांना एकत्र स्क्रिनवर पाहण्याची इच्छा व्यक्त केली. आता शाहिद-करिना म्हटलं की ‘जब वी मेट २’ या चित्रपटाशिवाय पर्याय आहे का? तर नाही. दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी ‘जब वी मेट २’ बद्दल एक महत्वाचं विधान केलं आहे. जाणून घेऊयात…(Shahid-Kareena)

नुकताच जयपूरमध्ये आयफा पुरस्कार (IIFA 2025) सोहळा संपन्न झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वच दिग्गज कलाकार या पुरस्कार सोहळ्याला हजर होते. यावेळी, शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि करिना कपूर (Kareena Kapoor-Khan) यांची भेट विशेष लक्षणीय ठरली. ब्रेकअपपूर्वी शाहिद-करिना जब वी मेट या चित्रपटात एकत्र दिसले होते. आणि आता पुन्हा दोघांनी एकत्र येत ‘जब वी मेट २’ चित्रपट यावा अशी मागणी त्यांचे चाहते करत आहेत.
यावर दिग्दर्शक इम्तियाज अली (Imtiyaz Ali)म्हणाले की, “शाहिद आणि करिनाला एकत्र पाहून छान वाटलं. परंतु जब वी मेटचा सीक्वल बनवण्याची माझी इच्छा नाही. जब वी मेट चित्रपटाला मी तिथेच सोडू इच्छितो. पुन्हा या चित्रपटावर काम करुन मला मूळ चित्रपटाची किंवा कथेची मजा खराब करण्याची इच्छा नाही आहे. आणि महत्वाचं म्हणजे शाहिद-करिनाला एकत्र घेऊन कोणताही नवा चित्रपट बनवण्याचाही माझा सध्या प्लॅन नाहीये. परंतु दोघांसोबत आधी काम करुन मला खूप चांगलं वाटलं होतं.” त्यामुळे शाहिद-करिनाच्या चाहत्यांना पुन्हा गीत-आदित्यला भेटला येणार नाही हे क्लिअर झालं असून ‘जब वी मेट २’ (Jab We Met 2) चित्रपट येणार नाही यावरही शिक्कामोर्तब झाला आहे. (Bollywood masala)

जब वी मेट चित्रपटाचा फॅन फॉलोईंग आजही आहे. या चित्रपटात गीत हे पात्र प्रत्येक चंचल मुलगी आणि प्रेमात धोका मिळाल्यानंतर तिची होणारी अवस्था याचं उत्तम प्रतिनिधित्व करते. तर, आदित्य हे पात्र जबाबदार, शांत आणि कम्पोस्ड मुलांचं प्रतिनिधीत्व अगदी तंतोतंत करणारं होतं. याशिवाय, चित्रपटातील प्रत्येक गाणी आजही आपल्या प्लेलिस्टवर नक्कीच आहेत.
===============================
हे देखील वाचा :Re-Release 2025 : जुनं ते सोनं; Re-release trend का होतोय व्हायरल?
===============================
सध्या सोशल मिडियावर जुन्या गाण्यांमधील काही पार्टवर मुलं रिल्स करतात; त्यात ‘मौजा ही मौजा’ या गाण्यातील करिना कपूरने शाहिद कपूरच्या गाण्यांच्या ओळींवर केलेलं लीप्सींग व्हायरल होतंय. त्यामुळे ९०च्या दशकातील बेस्ट रोमॅंटिक चित्रपटांच्या यादीत जब वी मेट हा चित्रपट नक्कीच येतो. (Bollywood Update)