
Jaya Bachchan : …म्हणून जया बच्चन ‘सिलसिला’च्या सेटवर रोज जायच्या!
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या जोडीचा प्रत्येक चित्रपट हिट ठरलाच. ‘मुक्कदर का सिकंदर’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘खुन पसिना’ अशी यादी मोठी आहे. जितकी त्यांच्या चित्रपटांची चर्चा आजही केली जाते तितकीच त्यांच्या नात्याबद्दलही केली जातेच. आज जाणून घेऊयात असाच एक खास किस्सा. लोकप्रिय लेखक हनीफ झवेरी यांनी एका मुलाखतीत अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन यांच्या ‘सिलसिला’ (Silsila) चित्रपटाबद्दल एक विशेष बाब शेअर केली आहे. जाणून घेऊयात…(Jaya Bachchan)
वळूयात अमिताभ-रेखा-जया या त्रिकूटाकडे. खरं तर जया आणि रेखा यांच्यात मनभेद होण्यापूर्वी घट्ट मैत्री होती. इतकंच नाही तर जया बच्चन यांनी रेखाला ‘दुनिया का मेला’ या चित्रपटात काम करण्यासाठी मनधरणी केली होती. शिवाय या चित्रपटात सुरुवातीला संजय खान काम करणार होते, मात्र काही कारणामुळे नंतर अमिताभ बच्चन यांची त्या चित्रपटात एन्ट्री झाली होती.

१९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘सिलसिला’ (Silsila) चित्रपटाची कथा अभिताभ बच्चन यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आधारित होती असं म्हटलं जातं. पण, हनिफ झवेरी यांनी मेरी सहेली या पॉडकास्टवर दिलेल्या मुलाखतीत सत्य वेगळंच आहे असं म्हटलं. ते म्हणाले की, “यश चोप्रा यांना स्क्रीनवर हा लव्ह ट्रँगल दाखवायचा होता. मात्र, जया बच्चन यांना ‘सिलसिला’मध्ये कामच करायचंच नव्हतं, कारण ती त्यावेळी त्या रेखाचा (Rekha) तिरस्कार करत होत्या. आणि म्हणूनच जया यांनी ठरवलं होतं की त्या सिलसिलामध्ये काम करणार नाही. मात्र, संजीव कुमार ज्यांना जया राखी बंधू मानत असल्यामुळे त्यांनी जया यांमाया चित्रपटात काम करण्यासाठी तयार केले आणि त्यांची समजूत घातली. जया तयार झाल्या खऱ्या पण त्यांनी एक अट घातली होती की की चित्रपटाचं शूटिंग होईपर्यंत ती रोज सेटवर हजर राहील. त्यांच्या सीनचे शूटिंग असेल किंवा नसेल तरी ती रोज हजर राहील”.(entertainment tadaka)
===========
हे देखील वाचा : Balasaheb Thackeray बाळासाहेब ठाकरेंनी अमिताभ बच्चनपासून ते संजय दत्तपर्यंत ‘या’ सर्व कलाकारांना केली मदत
===========
पुढे हनिफ यांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळाविषयी त्यांनी आठवणी सांगताना म्हटले, “हृषिकेश मुखर्जी यांनी अमिताभ बच्चन यांना ‘गुड्डी’ (Guddi) या चित्रपटासाठी फिक्स केलं होतं. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत जया भादुरी-बच्चन (Jaya Bachchan) होत्या. मात्र, काही काळाने अमिताभ बच्चन यांचा पत्ता त्या चित्रपटातून कट केला गेला. आणि मुख्य म्हणजे ही जया-अमिताभ बच्चन यांची पहिली भेट होती. त्यानंतर ‘एक नजर’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले, त्यावेळी जया भादुरी अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात पडल्या. खरं तर, अमिताभ बच्चन यांची यशस्वी अभिनेता म्हणून कारकीर्द सुरू होण्यात जया भादुरी मोठा वाटा होता. कोणतीही आघाडीची अभिनेत्री अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘जंजीर’ (Zanjeer) या चित्रपटात काम करण्यास तयार नव्हती. पण, जया यांनी आग्रह केला की अमिताभ बच्चनला चित्रपटात घ्या, मी त्यांच्याबरोबर काम करेन. जयाचा हा निर्णय योग्य ठरला आणि ‘जंजीर’ चित्रपट सुपर हिट ठरला.” (Bollywood mix masala)

अमिताभ बच्चन यांनी ‘कुली’, ‘अग्निपथ’, ‘शहेनशाह’, ‘काला पत्थर’, ‘शोले’, ‘सत्ते पे सत्ता’ असे अनेक दर्जेदार चित्रपट दिले. आत्ताच्या भाषेत या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही तुफान कमाई करत चित्रपटगृहात अनेक आठवडे हाऊसफुल्लचे बोर्ड झळकवले होते. पण त्यांच्या ‘सिलसिला’ या चित्रपटाला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. कालांतराने हा चित्रपट टी.व्हीवर प्रेक्षकांकडून पाहिला गेला खरा पण तरी बॉक्स ऑफिस कलेक्शन काही जमवू शकला नाही. महत्वाचं म्हणजे ‘सिलसिला’ चित्रपटातील प्रत्येक गाणी प्रेक्षकांना फार आवडली आणि याच चित्रपटाच्या माध्यमातून जावेद अख्तर (Javed AKhtar) यांनी गीतकार म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्यामुळे एकूणच सिलसिला हा चित्रपट प्रत्येक कलाकार आणि प्रेक्षकांसाठी नॉस्टेलॅजिया ठरला असं म्हणण्यास हरकत नाही.(Bollywood gossip)