Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

‘जिंदगी प्यार का गीत है…’ हे गाणे गायला Kishor Kumar का तयार नव्हते ?
संगीतकार उषा खन्ना या भारतातील सर्वात लोकप्रिय आणि मोठी इनिंग खेळलेल्या महिला संगीतकार आहेत. त्यांच्याकडे सर्व गायक आणि गायिकांनी गायली. किशोर कुमार यांनी उषा खन्ना यांच्याकडे तशी संख्याने कमी गाणी गायलीत पण जी गाणी गायलेली ती अतिशय बहारदार आहेत. आठवणीत राहणारी अशी आहेत. सावनकुमार दिग्दर्शित ‘सौतन’ (१९८३) हा चित्रपट ३ जून १९८३ या दिवशी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे निर्माते सावन कुमार. या चित्रपटातील एका गाण्याच्या मेकिंगचा रेकॉर्डिंगचा किस्सा मध्यंतरी संगीतकार उषा खन्ना यांनी एकदा रेडिओवरील कार्यक्रमात सांगितला होता. खूप इंटरेस्टिंग असा किस्सा आहे.
गायक किशोर कुमार यांच्या हरहुन्नरी पणाची साक्ष देणारा हा किस्सा आहे. ‘सौतन’ चित्रपटाची निर्मिती जेव्हा होत होती; तेव्हा संगीतकार उषा खन्ना यांनी चित्रपटातील गाण्याच्या जागा ओळखून त्यावर काम करायला सुरुवात केली. चित्रपटाची गाणी सावन कुमार यांनीच लिहिली होती. या चित्रपटात राजेश खन्ना, टीना मुनीम ,पद्मिनी कोल्हापुरे आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपट म्युझिकली हिट झाला. राजेश खन्ना सुपरस्टार पदावरून पाय उतार झाल्यानंतर पुन्हा १९८० च्या पुढची ५ वर्षे त्याच्या सिनेमाना चांगले यश मिळत होते. त्यापैकी ‘सौतन’ हा सिनेमा होता.

या चित्रपटातील एका गाण्याचं रेकॉर्डिंग होतं. हे गाणं गाणार होते किशोर कुमार. संगीतकार उषा खन्ना यांनी या गाण्याचे डमी रेकॉर्डिंग करून किशोर कुमार यांच्याकडे पाठवले. चार दिवसानंतर गाण्याचे शूटिंग होतं त्यामुळे रेकॉर्डिंग करणं गरजेचं होतं. किशोर कुमार यांना फेमस स्टुडिओमध्ये बोलवण्यात आला होते. सर्व म्युझिशियनस तयार होते. पण तितक्यात स्टुडिओमध्ये किशोर कुमार यांचा फोन आला. उषा खन्ना यांना
==============
हे देखील वाचा : Sai Paranjpye यांच्या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी कलात्मक गाणे गायले!
==============
किशोर म्हणाला,” उषाजी मेरी तबीयत अचानक बिगड गई है. मै आज रेकॉर्डिंग को नही आ सकता. सॉरी.” त्या वर उषा खन्ना म्हणाल्या,” लेकिन दादा, यहा तो हम सब लोग आपका इंतजार कर रहे है और रेकॉर्डिंग स्टुडिओ सिर्फ आज के दिन के हम ले लिया है.” किशोर कुमार म्हणाले,” लेकिन उषाजी मै बिलकुल नही गा सकता. मेरी आवाज बिलकुल अच्छी नही निकलती. एक काम करो. तुम ट्रॅक रेकॉर्ड कर लो मैं बाद में डब करूंगा.” उषा खन्ना म्हणाल्या “दादा ये सुविधा इस रेकॉर्डिंग स्टुडिओ मे उपलब्ध नही है तुम्हे मालूम है. तुम्हे आना पडेगा.” किशोर कुमार म्हणाले,” नही उषाजी मुझे माफ करना.”

संगीतकार उषा खन्ना आणि सर्व म्यूझिशियन्स डोक्याला हात लावून बसले. काय करायचं ? तास दीड तासाने अचानक चमत्कार झाला. ‘किशोरदा .. किशोरदा’ असा जल्लोष ऐकायला आणि चक्क किशोर कुमार यांनी रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये एन्ट्री घेतली आणि उषा खन्ना यांना म्हणाला ,”चलो चलो चलो जल्दी गाना रेकॉर्ड करते है… मुझे जाना है.” उषा खन्ना यांनी लगेच सर्वाना सुचना केल्या. किशोर आल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण झाले. एक-दोन रिहर्सल झाल्या आणि गाण्याचा फायनल टेक घेतला. पहिल्या टेक मध्येच गाणे ओके झाले. गाणं होतं ‘जिंदगी प्यार का गीत है इसे हर दिल को गाना पडेगा…’

गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यानंतर उषा खन्ना यांनी किशोर कुमारला आपल्या रूममध्ये कॉफी पिण्यासाठी बोलावलं आणि म्हणाल्या,” दादा, सकाळी काय झालं होतं? हमारी तो जान हि निकल गई थी” त्यावर हसत हसत किशोर कुमार म्हणाला,” उषाजी, तुम्ही जी डमी गाण्याची टेप माझ्याकडे दिली होती. ती टेप न ऐकता मी दुसऱ्याच कुठल्यातरी संगीतकाराने पाठवलेली टेप ऐकली आणि त्या टेप मधील गाण्यात प्रचंड रागदारी होती, ताणेबाणे होते. और तुम तो जानती हो ये क्लासिकल रागदारी मेरे पल्ले नाही पडती. मुझे क्लासिकल तानेबाने कुछ आते नही आती. मुझे क्लासिकल सिंगिंग आतीही नही. इसलिये मैने बहाना बनाया और रेकॉर्डिंग टाल दिया. पण नंतर माझा असिस्टंट अब्दुलने तुम्ही पाठवलेली टेप माझ्या हातात दिली ती ऐकली आणि लगेच मी इकडे आलो. खूप सुंदर गाणं बनवलं आहे!”
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
उषा खन्ना यांनी कपाळाला हात लावला आणि दोघे भरपूर हसू लागले. अशा पद्धतीने एका लोकप्रिय गाण्याचा जन्म झाला. किशोर कुमार यांनी गायलेले हे गाणं खरंतर राग ‘भीमपलासी’ वर आधारित होते.. पण यात शास्त्रीय ताणेबाणे नव्हते. किशोर कुमार यांनी अतिशय सुंदर हे गाणं गायलं होतं. चित्रपटात हेच गाणं लता मंगेशकर यांनी स्वतंत्र्य गायलं होतं. या गाण्याला सर्वोत्कृष्ट गीताचे फिल्मफेअर नॉमिनेशन मिळाले होते. मॉरिशस या देशात चित्रित झालेला हा पहिला भारतीय चित्रपट होता. या चित्रपटाने चांगले यश कमावले. राजेश खन्नाच्या करिअरची सेकंड इनिंग या चित्रपटामुळे चांगली यशस्वी झाली!