Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian singer mukesh

    Mukesh यांनी गीतकार नक्ष लायलपुरी यांना गुमनाम जिंदगीतून कसे बाहेर काढले!

    vidhu vinod chopra and lal krishna advani

    राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत वाद का घातला होता?

    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Yere Yere Paisa 3 : मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात पुन्हा ‘खळ्ळ

अभिनेता Shubhankar Tawde ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला ‘टीव्ही ऐवजी

Better Half Chi Love Story Teaser: “सुबोध भावे, रिंकू राजगुरू,प्रार्थना बेहरे २२

Saiyaara Movie : बॉलिवूडमध्येही काका-पुतण्या वाद? चंकी पांडेंची ओळख दाखवायला

आत्महत्या करायला निघालेली एक व्यक्ती;Anand Bakshi यांचे ‘हे’ गाणे ऐकून

NAFA : अमेरिकन संसदेने घेतली ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म फेस्टिव्हल

Zee Marathi वाहिनीवरील ही मालिका होणार बंद?; अभिनेत्रीची पोस्ट झाली

Siddharth Jadhav : “मला मराठी चित्रपटांसाठी मल्टिप्लेक्स बांधायचंय!”

War 2 : ‘मैं इन्सान नही, जंग का हथियार हू’;

अगदी खरं खरं सांगा, Saiyaara पाहून रडलात की नाही?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

मेहमूदने अमिताभला दिला होता ‘हा’ सल्ला

 मेहमूदने अमिताभला दिला होता ‘हा’ सल्ला
कलाकृती विशेष

मेहमूदने अमिताभला दिला होता ‘हा’ सल्ला

by Team KalakrutiMedia 26/05/2023

‘बाबूमोशाय जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहिये’ राजेश खन्नाच्या आवाजातील हा डायलॉग अजरामर होऊन गेलेला आहे. १९७१ साली प्रदर्शित झालेल्या ‘आनंद’ चित्रपटातील हा आणि याच्यासारखे कित्येक डायलॉग, कित्येक सिन्स प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून बसले आहेत.आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणून ‘आनंदी’ गुदगुल्या करण असो अथवा आयुष्यातील व्याकूळतेचे तंतोतंत चित्र दाखवून, पोटात खड्डा पाडत, डोळ्यांच्या कडा ओल्या करणे असो. आजही आनंद तेवढाच प्रभावी ठरतो. चित्रपटाचा शेवटचा सीन, ज्यात आनंद या जगातून निघून गेला हे जेव्हा पहिल्यांदा अमिताभ बच्चनच्या पात्राला कळून तो ज्या आर्ततेने आनंदला ‘तुम ऐसे नही जा सकते’ म्हणतो, ते बघून जवळच्या व्यक्तीचं निघून जाण्याची कल्पना किती भयावह असू शकते याची प्रचीती येते.

आनंद रिलीज झाला. लोकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं. राजेश खन्ना सुपरस्टार होतेच पण त्यांच्यासोबत नवख्या अमिताभ बच्चनचं (Amitabh Bachchan) देखील भरभरून कौतुक झालं. अमिताभ बच्चनच्या (Amitabh Bachchan) कारकिर्दीतील पूर्ण लांबीचा रोल असणारा हा पहिलाच चित्रपट होता. राजेश खन्ना सारख्या सुपरस्टार सोबत काम करतांना अमिताभ बच्चन यांनी आपल्या कामात आपल्या नवखेपणाचं जराही दडपण पडद्यावर जाणवू दिलं नाही. अमिताभच्या पूर्ण कामाचं एकंदरीत कौतुक झालंच परंतु आनंद मरतो त्या सीनमधील अमिताभचा (Amitabh Bachchan) परफॉरमन्स सगळ्यांकडून वाखाणला गेला. अमिताभने आपल्या अभिनयची कमाल दाखवत मृत्यूचा तो सीन अक्षरशः जिवंत केला. त्यांनी काम केलं, त्यांचं कौतुक झालं. परंतु राजेश खन्ना सोबत तो सीन करण अमिताभसाठी सोपं नव्हतं.

झालं असं की, तो सीन शूट होणार होता आणि अमिताभला (Amitabh Bachchan) तो सीन कसा परफॉर्म करायचा याची मात्र जराही कल्पना येत नव्हती. शूटच्या तीन चार दिवस अगोदर पासूनच ते याला घेऊन खूप अस्वस्थ होते. त्यांनी सगळं करून बघितलं पण त्यांना त्या सीनचा सूर काही गवसला नाही. आनंदचं मरण हा चित्रपटातील खूप महत्वाचा टप्पा होता. तो तेवढ्या तीव्रतेने, खरेपणाने प्रेक्षकांसमोर मांडणे गरजेचे होते. अमिताभ खूप अस्वस्थ होता.

त्याकाळी मेहमूद अमिताभच्या (Amitabh Bachchan) खूप जवळचे होते. अमिताभ आपली ही अडचण घेऊन मेहमूदकडे गेले. मरणाचा सीन कसा करायचा असतो याची काहीही कल्पना नसणाऱ्या अमिताभने आपली अडचण त्यांना सांगितली. मेहमूदने त्यांचं सगळं ऐकून घेतलं आणि शांतपणे म्हणाले, असं समज की राजेश खन्ना यांचा मृत्यू झाला आहे. या गोष्टीची गंभीरता लक्षात येतेय? सुपरस्टार राजेश खन्ना यांचा मृत्यू होणं ही खूप मोठी आहे. अमिताभने (Amitabh Bachchan) हीच गोष्ट लक्षात ठेवली आणि तो सीन परफॉर्म केला किंबहुना त्या सीनमध्ये जीव फुंकला. प्रेक्षकांनादेखील तो सीन बघून आपले अश्रू रोखता आले नाहीत. आनंदमधील कामगिरीनंतर अमिताभ बच्चन रातोरात स्टार झाले.

=====

हे देखील वाचा : ऑस्करवारी केलेले भारतीय सिनेमे!

=====

हृषीकेश मुखर्जी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले तर गुलझार यांनी सिनेमाचे संवाद लिहिले होते. चित्रपटात अमिताभ (Amitabh Bachchan) आणि राजेश खन्ना यांच्यासोबतच सुस्मिता सन्याल आणि रमेश देव यांनी देखील अभिनय केला आहे. गोष्ट सांगताना हृषीदाची हृदयाला थेट हात घालण्याची पद्धत, सुपरस्टार राजेश खन्ना सोबत नवख्या अमिताभची अफलातून केमिस्ट्री यामुळे ‘आनंद मरा नही, आनंद मरते नही’ म्हणत ‘आनंद’ अजरामर झाला.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Amitabh Bachchan Anand movie Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Entertainment Featured Hrishikesh Mukherjee Rajesh Khanna
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.