Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

“लक्ष्मीकांत मला सेटवर त्याच्या धाकट्या बहिणीसारखाच”; Renuka Shahane यांनी सांगितली

यांचं ठरलंय! भर कार्यक्रमात Vijay Devarkonda नं दिली Rashmika Mandanna

DDLJ : ‘या’ लोकप्रिय गाण्याच्या आधी पंजाबी ओळी टाकण्याची आयडीया

“मी हिंदीत शिरण्याचा खूप प्रयत्न केला पण…”; Ajinkya Deo बॉलिवूडमधील

‘तुंबाड’ फेम दिग्दर्शक राही अनिल बर्वे घेऊन येणार Mayasabha; ‘हा’

“मुलं झोपू शकत नाहीयेत. त्यामुळे मी…” Dharmendra यांना डिस्चार्ज दिल्यानंतर

Aadinath Kothare दिसणार डिटेक्टिव्हच्या भूमिकेत!

याला म्हणतात कमबॅक! पिवळी साडी, पायात मराठमोळी कोल्हापुरी चप्पल; Priyanka

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

प्रेक्षकांची नस ओळखणारा अवलिया – दादा

 प्रेक्षकांची नस ओळखणारा अवलिया – दादा
कलाकृती विशेष

प्रेक्षकांची नस ओळखणारा अवलिया – दादा

by सौमित्र पोटे 08/08/2022

साधारण त्यावेळचा काळ होता तो १९७० चा जेव्हा खऱ्या अर्थाने मराठी इंडस्ट्रीला एक चेंज मिळाला. दादांच्या (Dada Kondke) रुपाने. म्हणजे आपल्याकडे व्ही. शांताराम, मा. विनायक, भालजी पेंढारकर, बाबूराव पेंटर आदी रथी-महारथींनी चित्रपटाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. प्रभात फिल्म कंपनीचे चित्रपटही लोकांना आवडत होते. सामाजिक आशय, तत्कालीन चालीरीती लक्षात घेऊन सिनेमाची निर्मिती होत होती. यात कुंकू, शेजारी, माणूस, संत तुकाराम आदी चित्रपटांची भर पडत होती. लोकांनाही ते सिनेमे आवडत होतेच. पण बदल ही एक सातत्याने घडणारी गोष्ट आहे, असं म्हणतात आणि तसं झालं. 

१८७० च्या शेवटाला दादा कोंडके सिनेसृष्टीत आले. त्या आधी ते नाट्यसृष्टीत होते. तिथून मराठी सिनेमाने आपली कूस बदलली. तिथून मराठीत ग्रामीण चित्रपट सुरू झाले. त्याचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो तो दादा कोंडके यांचा सोंगाड्या. 

या चित्रपटानं महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये तुफान यश मिळवलं. खरंतर या सिनेमाने राज्यातलं सिनेमाचं संपूर्ण वातावरण बदलून गेलं. सगळीकडे हवा होती ती फक्त दादांची आणि त्यांच्या गाण्यांची. दादांनी मराठी सिनेमाचं सगळं व्याकरणच बदलून टाकलं. दादांचा नायक येण्यापूर्वी मराठीत कसे हिरो होते? तर ते मर्दानी छातीचे.. फेटा घालून मिशीवर ताव मारणारे असे होते… मग काय.. पाखरू कुनीकडं उडतंय म्हणायचं.. असं हळूच विचारणारे होते. पण दादांच्या सिनेमातल्या नायकाने ही व्याख्या बदलली. (Memories of Dada Kondke)

अत्यंत बावळट दिसणारा.. अघळपघळ कपडे घालणारा.. पण भाबडा नायक दादांनी लोकांना दिला. दादांचं हे रूप लोकांना कमालीचं भावलं. दादा आपल्या सिनेमातून ज्या काही गमतीजमती करत होते त्या सगळ्या लोकांना जणू हव्या होत्या. त्यांच्या चित्रपटांनी महाराष्ट्रातल्या एका खूप मोठ्या जनवर्गाला आपलंसं केलं. दादांच्या प्रत्येक सिनेमाला हक्काचा प्रेक्षक होता. पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, ह्योच नवरा पाहिजे, आली अंगावर, मुका घ्या मुका, सासरचं धोतर असे एकापेक्षा एक सिनेमे दिले आणि लोकांनी ते तुफान चालवले. 

दादांच्या सिनेमाची जादू अशी की, आजही मुंबई-कोल्हापूरसह अनेक थिएटरमध्ये चालणारा सिनेमा नसेल, तर दादांचा सिनेमा काढून लावला जातो आणि तो आजही चालतो. अर्थात याला एक दुसरी आणि दुखरी बाजूही आहे. म्हणजे दादांनी जे सिनेमे बनवले त्यात त्यांनी मराठी भाषेचा यथेच्छ मोकळा उपयोग करून घेतला. विशेषत: द्वयर्थी संवादांचा. प्रत्येक सिनेमात हा वापर असे. लोकांना हा प्रकार आवडतोय म्हटल्यावर दादांनी तो प्रकार वापरलाच. पण नंतर नंतर हा प्रकार जरा जास्त होऊ लागल्याचा आरोपही त्यांच्यावर होतो. अर्थात आरोप म्हणजे ही काही कायदेशीर बाब नव्हती. शेवटी कलेचाच प्रकार तो.. (Memories of Dada Kondke)

दादा मात्र आपण बनवत असलेल्या सिनेमांवर ठाम होते. ते सिनेमा बनवत होते आणि लोक तो सिनेमा चालवत होते. यावर एकदा दादांनाच थेट प्रश्न विचारला गेला होता. प्रश्न साधाच होता की, तुमच्या यशस्वी वाटचालीचं गमक काय? यावर दादांचं उत्तर होतं, “पूर्वीच्या काळी मा. विनायक सिनेमे बनवत होते. त्याकाळचे अनेक दिग्दर्शक सिनेमे फार उत्तम बनवत होते. पण त्याचे विषय ठरलेले होते. त्यात समाजकारण होतं. उपरोध होता. टिपीकल पांढरपेशा लोकांसाठी ते सिनेमे बनले. त्यामुळे हे सिनेमे मुंबई-पुण्याबाहेर गेले नाहीत. राजा परांजपे यांनीही खूप चांगले सिनेमे काढले पण ते कर्ज बाजारी झाले. मी खेडोपाड्यातल्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून सिनेमे बनवले. दर दहा मिनिटांनी प्रेक्षक पोट धरून हसला पाहिजे. सिनेमातला एखादा विनोद, एखादं गाणं बघायला प्रेक्षक पुन्हा पुन्हा थिएटरमध्ये येतात. त्यांना डोळ्यासमोर ठेवून मी सिनेमा एडिट करतो.”

किती महत्वाचं निरिक्षण आहे हे. आता खेडोपाड्यातल्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून सिनेमा बनवणं हे काही खायचं काम नाही. आता पुढचा प्रश्न असा येतो की, दादांना गावागावांतल्या लोकांची ही नस कशी काय माहीती होती? याचं उत्तर त्यांनी केलेल्या नाटकात दडलं आहे. दादांचं ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक तुफान चाललं होतं. दादा हे नाटक घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात जात होते. तिथे त्यांना तुफान प्रतिसाद मिळत होता. तेव्हाही महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडामोड घडली की ती या नाटकात दादा घ्यायचे आणि तुफान हशा पिकायचा. हा प्रकार लोकांना नवा होता. म्हणून लोकांना काय आवडतं हे त्यांना माहीत होतं. नाटक करताना दादांनी जी काही प्रेक्षकांबद्दलची गणितं मांडली होती तीच त्यांना सिनेमा करताना कामी आली होती. (Memories of Dada Kondke)

दादांच्या कामातलं कन्व्हिक्शन कमाल होतं. म्हणून सेन्सॉरच्या कात्रीतून त्यांचे सिनेमे सुटायचे. एकदा ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ या सिनेमाचा सेन्सॉर चालू होता. त्या सेन्सॉरच्या समितीमध्ये कवियित्री शांता शेळकेही होत्या. बाईंनी, “ढगाला लागली कळ..” या गाण्यातल्या, “सशाला बीळ कोणी दाखवा..” या ओळीमधल्या ‘बीळ’ या शब्दाला आक्षेप घेतला. शांताबाई म्हणाल्या, “तो शब्द बदला.” दादा म्हणाले, “अहो बाई.. ससा बिळातच राहातो. तिथे गुहा, घर, जंगल असा कोणताही शब्द बसत नाही.” पण बाईंना हे काही पटेना. बाईंचा आग्रह होता शब्द बदलाच. 

मग दादांनी कमाल केली. त्यांनी लगेच संदर्भ सांगत बाईंनाच एक प्रश्न केला. ते म्हणाले, तुम्ही घरकुल सिनेमासाठी गाणी केलीत. त्यातलं हाऊस नंबर फिफ्टी फोर.. बांबूच्या वनात.. हे गाणं तुम्ही लिहिलंत. यात बांबूच्या घरात राहायला हवे.. बांबूवर बसायला हवे.. असे शब्द आहेत. तुम्हाला या ओळी अश्लील वाटल्या नाहीत का? यावर शांताबाई काहीही बोलू शकल्या नाहीत आणि सिनेमा पास झाला. अर्थात दादा कोंडके आणि शांताबाई ही फार मोठी माणसं. दादा स्वत: शांताबाईंच्या लिखाणाचे फॅन होते. पण शेवटी इथे प्रश्न सिनेमाचा होता. (Memories of Dada Kondke)

==========

हे देखील वाचा – दिलीप प्रभावळकर – कमालीचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ असलेले मिश्किल अभिनेते 

==========

तर असे होते दादा. लोकांवर प्रेम करणारे.. प्रेक्षकांचा आदर राखणारे आणि आपण जे काही करतो आहोत त्याचं पूर्णत: समर्थन करणारे. महाराष्ट्रात सिनेसंस्कृती रुजवण्यात दादांचा मोठा हातभार आहे तो त्यासाठीच. खरंतर दादांवर जेवढं लिहावं तेवढं कमी आहे. पण या एक दोन गोष्टींमधून दादांचं व्यक्तीमत्व समोर आलं असणार यात काही शंका नाही. दादांच्या जयंती निमित्त त्यांना त्रिवार वंदन. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Dada Kondke Entertainment
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.