Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prarthana  Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा

Mahesh Manjrekar पहिल्यांदाच दिसणार साधूच्या भूमिकेत; ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ लूक

कलात्मक चित्रपटाची नांदी देणारा : Bhuvan Shome!

लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न

Sandhya : ‘पिंजरा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम काळाच्या पडद्याआड

Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकला साखरपूडा; पण

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

या कारणामुळे रावांचा रंक झाले होते भगवान दादा!

 या कारणामुळे रावांचा रंक झाले होते भगवान दादा!
बात पुरानी बडी सुहानी

या कारणामुळे रावांचा रंक झाले होते भगवान दादा!

by धनंजय कुलकर्णी 04/02/2022

आज ४ फेब्रुवारी! भारतातील पहिला डान्सिंग स्टार मा. भगवान यांचा स्मृती दिन. त्यांनी आयुष्यात प्रचंड चढ उतार पहिले. एकेकाळी सात-आठ गाड्या आणि दोन दोन स्टुडीओज मालक असलेले भगवान दादा नंतर मात्र ‘डेली पेड आर्टिस्ट’ म्हणून काम करू लागले. रंकाचा राव आणि पुन्हा रावाचा रंक होण्याचे त्याचे रोलर कोस्टर लाईफ बेफाम होते.  

मास्टर भगवान तथा भगवान दादा पालव यांचे हिंदी सिनेमाच्या क्षेत्रातील कर्तृत्व फार मोठा आहे आहे तब्बल पासष्ट वर्ष ते या मायानगरी मध्ये होते. सिनेमाच्या बेहिशेबी दुनियेत त्यांनी कलेचं सर्वोच्च टोक गाठलं होतं. पण व्यवहारी आणि मतलबी दुनियेचे हिशेब त्यांना कधीच समजले नाही. त्यामुळे दादरच्या लल्लुभाई मेंशन या चाळीत लहानपण घालवलेले भगवान दादा वृद्धापकाळी पुन्हा तिथेच आले आणि त्यांच्या जीवनाच्या अखेर देखील याच शाळेत झाली. नियतीचं वर्तुळ पूर्ण झालं. 

मायानगरीतील बेहिशेबी दुनियेतील व्यवहार अनाकलनीय असतात. सामान्यातील असामान्यत्व टिपून यशोशिखरावर बसविणारी ही चमकती दुनिया एका क्षणात त्याला पुन्हा सामान्यत्व बहाल करते. मिळालेलं यश खरोखरचं स्वकर्तृत्वाचं देणं होतं की, नियतीचे मायाजाल होते हे ही समजत नाही. यशापयाशच्या या हिंदोळ्यावर हेलकावे खात कित्येक कलावंताचं आयुष्य पणाला लागतं. 

माया नगरीतला जीवघेणा चढ-उतार कित्येक कलावंताच्या पदरी येतो. बरेचजण त्याने खचून जातात, हताश होतात. आयुष्यातली ही खेळी पराभूत झाल्याने काही जण आयुष्यच संपवायला निघतात. पण यातही काही जिंदादिल, ताठ कण्याचे असतात जे पराभवाने विचलित न होता पुन्हा मार्गस्थ होतात आणि पुन्हा नव्याने डाव मांडू लागतात. भारतीय सिनेमाची शताब्दी आता सुरु आहे.आणि कचकड्याच्या दुनियेत तब्बल ६५ वर्षे घालवून रसिकांची मनमुराद करमणूक करणारे कलाकार मा.भगवान तथा भगवान दादा यांचा स्मृती  दिन आज आहे. आपल्या अनोख्या नृत्य शैलीने आणि स्टंटपटाने सार्‍या सिनेजगताला वेड लावणार्‍या मा.भगवान या मराठी कलावंताचं आयुष्य देखील याहून फार वेगळं नव्हतं. 

अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातील सूड नाट्याला जी ‘क्रेझ’ होती किंबहुना त्याहून अधिक ती भगवान दादा यांच्या चाळीसच्या दशकातील सिनेमांना होती. प्रचंड मारधाड असलेले हे सिनेमे तसे बी किंवा सी ग्रेडचे असायचे पण अशा सिनेमांना एक प्रकारचा वेगळा प्रेक्षक वर्ग लाभत असे. याचं दुसर कारण असं, त्या काळचे हिंदी सिनेमाचे हिरो हे तसे शामळू प्रवृत्तीचे असायचे (आठवा अशोक कुमार यांचे बॉम्बे टॉकीजचे सुरुवातीचे चित्रपट) नायिकेच्या प्रेमात पडायचे, तिच्यासाठी झुरायचे आणि त्यातच आयुष्याचा शेवट करायाचा अशी ’देवदास” प्रतिमा असलेले पुचाट नायक सर्वाना थोडेच आवडणार होते? त्यामुळे भगवान दादा आणि अन्य कलावंताच्या देमार सिनेमांना चिक्कार गर्दी असायची.

बदला, बहाद्दूर, जलन, दोस्ती, शेक हॅंड, मतलबी,जीते रहो, भेदी बंगला, बचके रहना हे सिनेमे म्हणजे चाळीस आणि पन्नासच्या दशकातील एक वेगळा मार्ग चोखाळणाऱ्या प्रवृत्तीचे प्रतिक होते. त्याकाळातील इतर स्टंटपटांशी तुलना करता (फियर लेस नादिया-जोन कावस यांचे चित्रपट) भगवान यांच्या सिनेमात भावनाप्रधानता असायची, आईच वात्सल्यमय कॅरेक्टर असायचं. त्यामुळे दादांच्या स्टंटपटाला सोशल सिनेमाचा कुटुंब वत्सल प्रेक्षक वर्ग लाभत असे.

Bhagwan Dada:

लोकप्रियतेच्या लाटेवर असताना भगवान यांनी १९४२ साली जागृती पिक्चर्स या बॅनरची स्थापना केली. तसेच स्वतःचा चेंबूर इथे जागृती स्टुडीओ १९४७ साली उभारला. मात्र पुढे गोरेगावला त्यांच्या गोडावूनला आग लागली आणि त्यात सर्व जळून भस्मसात झाले. ज्या सिनेमांनी दादाला वैभवाच्या शिखरावर नेले ते सर्व सिनेमे आगीच्या भक्ष्य स्थानी पडले. रसिकांच भाग्य थोर त्यात ‘अलबेला’ ची प्रिंट सुखरूप राहिली. त्यामुळे आज भगवान दादाच्या स्टंट सिनेमाची आठवण इतिहास जमा झाली असली तरी त्याच्या कारकिर्दीला ’चार चांद’ लावणारा ‘अलबेला’ शाबूत राहिला. 

मा. भगवानच्या ‘अलबेला’ने इतिहास घडविला. नृत्य संगीताचा अभिनव अविष्कार घडवीत भारतीय सिनेमाला पहिला डान्सिंग अ‍ॅक्टर मिळवून दिला. सोशल फिल्मद्वारे प्रथमच पडद्यावर आलेल्या दादांना प्रेक्षकानी स्वीकारले. पूर्वीच्या त्यांच्या सिनेमात नायिकेला फारस महत्व नसायचा. त्यामुळे कोणतीही मुलगी चालून जायची, पण अलबेलाची गोष्टच निराळी होती. दादांनी नायिकेच्या भूमिकेकरिता १९५० साली गीताबालीला ३५००० रुपये देवून साईन केले. सिनेमाचे कथानक तसे फारसे विशेष असे नव्हते. एक नाट्यवेडा कलंदर घर सोडून परिस्थितीशी झुंजत आपले ध्ये्य साध्य करतो. पण कथानकाकडे प्रेक्षकांचं लक्ष गेलंच कुठे? त्यांना मिळाली एकाहून एक सुपर डुपर हिट गाणी आणि त्यावरील खास भगवान डान्स!

सुरुवातीचेच ‘महफि्ल में मेरी कौन ये दिवाना आ गया दिवाना आगया ,जब शम्माने पुकारा तो परवाना आ गया’ या गीतावर प्रेक्षक निहायत खूष होवून दौलतजादा करू लागले. ‘बलमा बडा नादान रे’ या मुजरा गीताला दादांनी चक्क प्रेमगीत बनवून त्या पद्धतीने पिक्चराईज केले. ‘शाम ढले खिडकीतले तुम सिटी बजाना छोड दो’ या गीताने तर छेडछाडवाल्या गीतांचा आरंभ केला. ‘ओ बेटाजी किस्मत की हवा कभी नरम कभी गरम’ या गीतातील भाड्यांचा आवाज टाकण्याची कल्पना पूर्णतः दादाची होती. ‘भोली सूरत दिल के खोटे नाम बडे और दर्शन छोटे’ आणि ‘शोला जो भडके दिल मेरा धडके दर्द जवानीका सताये बढ बढ के’ या गाण्याने पुढच्या तीन पिढ्या नादावल्या. 

‘मेरे दिल कि घडी करे टिक टिक जब बजे रात के बारा हाय तेरी याद ने मारा’ हे गाणं देखील मस्त जमून आल होत. सिनेमातील अंगाई गीत सर्वात लोकप्रिय ठरले. ‘धीरेसे आजारे आखीयन में निंदिया धीरेसे आजा’ या लताच्या अंगाई गीताने आजही सर्वोत्कृष्ट अंगाई गीताचे स्थान कायम ठेवले आहे. यातील ‘शोला जो भडके’ हे गीत सिनेमाच्या अगदी शेवटी येते. खरं तर नायक नायिकांचे मिलन झाल्यावर सिनेमा संपायला हवा, पण नेमकं त्याच क्षणी हे गीत चालू होते. हा जुगार दादा खेळले कारण त्यांचा त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास होता. 

Bhagwan Dada:

गाणं सुरु होत असे आणि आख्ख थिएटर नाचू लागे. गीतकार राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार सी रामचंद्र यांच्या कारागिरीचा हा सर्वोच्य बिंदू ठरला. अण्णांनी संगीतात बोंगो ड्रम, बेंजो, क्लॅरोनेट, ट्रम्पेट, सॅक्सोफोन ही सारी पाश्चात्य वाद्ये वापरली होती. याचाच अर्थ भारतीय सिनेमात खर्‍या अर्थाने पाश्चात्य संगीत आणि डान्स रुजविण्याचे काम भगवान दादांच्या ‘अलबेला’ या चित्रपटाने केलं.

भगवानदादा याचं ‘अलबेला’ चित्रपटाचं हे यश मात्र शापित ठरलं .त्यानंतर त्यांनी कितीतरी सिनेमे बनवले .झमेला,कर भला, लाबेला, शोला जो भडके, रंगीला … पण एकालाही यश मिळाले नाही. सिनेमा निर्मिती उद्योगात हात पोळून घेतल्यावर भगवान दादांनी काळाची पावलं ओळखली आणि आपलं लक्ष पूर्णपणे ‘डान्स’वर केंद्रित केलं. पुढे कित्येक हिंदी आणि मराठी सिनेमात ते नाचू लागले. आपल्या दादा कोंडके सोबतही त्याची छान जोडी जमली होती (आठवा गंगू तारूण्य तुझं बेफाम..). 

खरं तर डान्स हाच त्यांचा ‘प्लस पॉईंट’ होता.’नाचता नाचता हळूवारपणे अलगद खांदे उडविण्याची त्यांची अफलातून शैली प्रचंड लोकप्रिय ठरली. सुपरस्टार अमिताभ बच्चन, कमल हसन आदी कलाकारांनी हिच डान्स शैली सही सही उचलली.चोरी चोरी, झनक झनक पायल बाजे या सिनेमातील त्यांच्या भूमिका गाजल्या. चोरी चोरी मध्ये तर त्यांच्यावर “तुम अरबोका हेर फेर करनेवाले रामजी सवा लाखकी लॉटरी भेजो अपने भी नामकी” हे मस्त गाणं चित्रित केलं होतं.

=====

हे देखील वाचा: भारतीय सिनेमात खर्‍या अर्थाने पाश्चात्य संगीत आणि डान्स रुजविण्यात महत्वाचा वाटा असणारे भगवान दादा

=====

दादा सिनेमे बनवत गेले पण त्यांना अलबेला नंतर पुन्हा काही यश मिळालं नाही. वैतागून त्यांनी ‘अलबेला’चे हक्क रणजित बुधकरांना विकून टाकले. आणि काय आश्चर्य पहा १९५१ साली प्रदर्शित झालेला अलबेला पुन्हा १९७५ साली रणजीत बुधकरानी पुन्हा एकदा रिलीज केला आणि तब्बल २४ वर्षानंतरही ‘शोले’ ला टक्कर देत अलबेला पुण्या -मुंबईत सुपरहिट ठरला. 

दादरच्या ज्या लल्लूभाई मेंशनमध्ये ते रहात होते, त्या भागात त्यांचा जबरदस्त बोलबाला होता. कोणत्याही धर्माचा समारंभ दादा शिवाय पुरा होत नसे. एकेकाळी एका स्टुडिओचे मालक असलेले दादा बंगला, गाडी असे सर्व काही ऐश्वर्य उपभोगत होते. पुढे काळ बदलला. दादा डेली पेड आर्टीस्ट म्हणून नवोदित कलाकारांसमवेत वावरू लागले. अहंकाराची अजिबात बाधा नसलेल्या दादांनी ऐश्वर्य आणि गरीबी एकाच मापात मोजली. कित्येक कलाकारांची आयुष्य त्यांनी घडवली. आनंद बक्षी यांनाही पहीली संधी त्यांनीच दिली.  

भारतीय सिनेमातील त्यांचे ’कॉंन्ट्रिब्युशन’ ही यशाची मोजपट्टी लावली, तर त्या अर्थाने ती कदाचित कमी असेल, पण त्यांच्यामुळेच सिनेसृष्टीला पहिला डांसिग स्टार मिळाला, हे कसे विसरता येईल? ज्या लल्लूभाई मेंशनमध्ये ते लहानपणापासून रहात होते तिथेच त्यांच्या जीवनाची अखेर झाली ४ फ़ेब्रुवारी २००२ रोजी. जिथून त्यांनी प्रवास सुरू केला तिथेच आय़ुष्याच्या अखेरीस येवून विसावले.अजब न्याय वर्तुळाचा!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Celebrity News Entertainment Marathi Movie
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.